शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे पूल वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:13 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रामटेकनजीकच्या हिवरी-हिवरी मार्गातील पूल वाहून गेला. या भागात मंगळवारी (दि.१४) ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रामटेकनजीकच्या हिवरी-हिवरी मार्गातील पूल वाहून गेला. या भागात मंगळवारी (दि.१४) पाच तासांत ८५ मिमी पाऊस पडला. पावसामुळे पूल खचल्याने जि. प. बांधकाम विभागाने या मार्गावरील चारचाकी वाहतूक बंद केली आहे. केवळ दुचाकी वाहने ये-जा करीत आहेत. मागील वर्षी ९ सप्टेंबर २०२० ला अर्धा अधिक पूल खचला हाेता. त्यावेळी जि. प. बांधकाम विभागाने तात्पुरती दुरुस्ती केली हाेती, हे विशेष.

पूल वाहून गेल्याने मार्गावरील वाहतूक बंद झाली असून, या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन पुलाची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तीन वर्षांपूर्वी रामटेक ते हिवरा-हिवरी मार्गावरील नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलाचे बांधकाम निकृष्ट झाल्याने अल्पवधीतच पुलाला भगदाड पडण्यास सुरुवात झाली. परंतु, संबंधित विभागाने त्याची दखल घेतली नाही. याबाबत ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले हाेते. मात्र, प्रशासन वा लाेकप्रतिनिधींनी त्याकडे लक्षच दिले नाही.

परिसरात १४ सप्टेंबरला जाेरदार पाऊस पडला. पाण्याच्या तेज प्रवाहामुळे अर्धाअधिक पूल एका बाजूच्या भिंतीसह वाहून गेला. या मार्गावर कन्हान, माैदा, नागपूर, तसेच परिसरातील गावात ये-जा करणाऱ्यांची वर्दळ सुरू असते. परंतु, हा पूल खचल्याने चारचाकी वाहतूक बंद झाली आहे. केवळ ३ किमी अंतरावरील रामटेकला चारचाकीने यायचे कसे, शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची कामे करायची कशी, असे प्रश्न उभे ठाकले आहे. याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता पाटील यांना विचारले असता, कार्यकारी अभियंत्यांची मंजुरी घेऊन पाऊस थांबल्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचे काम करावे लागेल. काम अधिक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सध्या चारचाकी वाहतूक बंद केली असून, या ठिकाणी नवीन पूल बांधावा लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.

या पुलाची तत्काळ दुरुस्ती करून जड वाहतूक बंद करावी, तसेच नवीन पुलाचे बांधकाम करण्याची मागणी सरपंच रेखा मल्लेवार, माजी सरपंच दिलीप काठाेके, उपसरपंच विष्णू काठाेके, माधाे मल्लेवार, लाेकेश डहाके, अण्णाभाऊ चाफले, कमलाकर हिंगे, रमेश नाटकर यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे प्रशासन आता काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.