शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

काटोलच्या संत्रा प्रक्रिया प्रकल्पाला बूस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 03:13 IST

काटोल-नरखेड या संत्रा उत्पादक भागात पतंजली योगपीठातर्फे स्वामी रामदेवबाबा यांच्या पुढाकाराने काटोल येथे संत्रा उत्पादन प्रक्रिया कारखाना उभारणार असून ...

पतंजली योगपीठाला २०० एकर जागा : गडकरी यांनी घेतली आढावा बैठक नागपूर : काटोल-नरखेड या संत्रा उत्पादक भागात पतंजली योगपीठातर्फे स्वामी रामदेवबाबा यांच्या पुढाकाराने काटोल येथे संत्रा उत्पादन प्रक्रिया कारखाना उभारणार असून त्यासाठी एमआयडीसीची २०० एकर जागा ताब्यात घेणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संयुक्त पत्रपरिषदेत दिली.काटोलप्रमाणेच अमरावतीतही पतंजली योगपीठ जागा घेणार आहे. या संदर्भातील एक आढावा बैठक केंद्रीय रस्ते व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने झाली. या बैठकीला पतंजली पीठातर्फे आचार्य बाळकृष्णन, खासदार कृपाल तुमाने, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार अनिल सोले, आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. आशिष देशमुख, महापौर प्रवीण दटके, मल्लिकार्जुन रेड्डी, विकास कुंभारे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व विविध विभागाचे सचिव उपस्थित होते.काटोलचा संत्रा प्रक्रिया कारखाना १९९७ मध्ये सुरू झाला होता. फेब्रुवारी १९९७ ते मे २००१ पर्यंत प्रकल्प सुरू होता. त्यावेळी ११.४७ कोटी रुपये खर्च या प्रकल्पावर झाला. शासन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने संयुक्तपणे हा प्रकल्प सुरू केला होता. कालांतराने महामंडळाने मे. अलायन्स अ‍ॅग्रो इंडिया प्रा. लि. यांच्याशी करार करून त्यांना चालविण्यास हा कारखाना हस्तांतरित केला. २००१ नंतर हा प्रकल्प बंद पडला.काटोलच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या संत्रा कारखान्यासाठी पतंजली योगपीठाला वीज व पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे काटोल-नरखेड-अमरावती या भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्र्याला चांगली किंमत मिळणार आहे.शेतकऱ्यांना दिलासा नागपूर : मोठ्या प्रमाणात होणाऱ्या संत्रा उत्पादनाला या कारखान्यामुळे चांगले दिवस येतील. संत्र्यापासून निर्माण होणारी विविध प्रकारची शुद्ध उत्पादने या भागातील नागरिकांना उपलब्ध होतील. स्वामी रामदेवबाबा आणि केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. नितीन गडकरी यांनी स्वामी रामदेवबाबा यांना विदर्भ व मराठवाडा या शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात पतजंलीचे उत्पादन सुरू करावे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याची तयारी व्यक्त केली.त्यामुळे स्वामीजींनी या भागात पतंजलीचे उत्पादन असलेले कारखाने सुरू करण्याची तयारी दर्शविली. हा कारखाना व अन्य उपक्रमाने सुमारे १० हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.विदर्भातील वनात २०० प्रकारच्या जडीबुटीयावेळी पतंजली समूहाचे आचार्य बाळकृष्णन यांनी सांगितले की, आयुर्वेदामध्ये एकूण ३०० प्रकारच्या जडीबुटींची आवश्यकता असते. विदर्भ आणि गडचिरोली भागातील वनसंपत्ती पाहता २०० प्रकारची आयुर्वेदिक औषधे येथे उपलब्ध आहेत. तसेच जी औषध या भागात नाहीत त्या औषधांचे उत्पादन येथे होऊ शकते. ते लक्षात घेता त्या भागात विविध औषधे तयार करण्याची व्यवस्था आम्ही करणार. जडीबुटी औषध निमार्णासाठी या भागातील वातावरण पोषक असल्याचेही आचार्य बाळकृष्णन यांनी सांगितले.गडचिरोलीमध्ये होणार ‘अ‍ॅग्रोहॅक ’वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत सांगितले की, राज्यात ७५ टक्के जमीन ही वन विभागाची असून ती जमीन आदिवासी गडचिरोली व इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून एकट्या गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ९० हजार हेक्टर जमीन आहे. या जमिनीवर उपलब्ध असलेल्या वनऔषधींवर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प तयार करून अ‍ॅग्रोहॅक तयार करण्यात येणार आहे. यामध्ये ३२५ औषधांची निर्मिती करण्यात येणार असून त्यामुळे परिसरातील आदिवासी बांधवांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. आदिवासी गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकासावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा लागणार असून यासाठी राज्यात २६५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. पतंजलीचे आचार्य बाळकृष्णन यांनीसुद्धा गडचिरोली येथे औषध निर्मितीचे एक युनिट लावण्यात येईल, तसेच तेथील आदिवासींना प्रशिक्षिण देऊन रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट केले.