विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:44 IST2025-06-17T12:36:33+5:302025-06-17T12:44:40+5:30
कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे, इंडिगोच्या विमानाचे नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्याविमानाचे नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. या विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती. यामुळे सुरक्षा यंत्रणेने या विमानाचे लँडिंग करुन प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले असून विमानाची तपासणी सुरू केली आहे.
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
विमानात बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर, निर्धारित प्रोटोकॉलनुसार तात्काळ एक आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली, यामध्ये धमकी गंभीर असल्याचे निश्चित करण्यात आले कारण त्यात फ्लाइट नंबर देखील स्पष्टपणे नमूद करण्यात आला होता. तोपर्यंत फ्लाइट कोचीहून उड्डाण करत होती, ती सुरक्षेच्या कारणास्तव नागपूर विमानतळावर वळवण्यात आली होती. सध्या विमान आणि प्रवाशांची चौकशी सुरू आहे.
याआधी दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी थायलंडमधील फुकेतहून नवी दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय-379 ला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. फुकेत विमानतळ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आपत्कालीन प्रक्रियेनंतर सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले. एअर इंडियाच्या विमानात १५६ प्रवासी होते, असे निवेदनात म्हटले आहे.
#WATCH | An IndiGo flight 6E 2706 from Muscat - Kochi - Delhi made an emergency landing at Nagpur airport after a bomb threat was received. All passengers have been deboarded, investigation is underway, nothing suspicious has been found so far.
— ANI (@ANI) June 17, 2025
Visuals from Nagpur airport in… https://t.co/QQax2PkdN2pic.twitter.com/ANzfaJzm2U
मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी
गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेला काही तास उलटले तोच, एअर इंडियाने १३ जून रोजी सकाळी मुंबईहू लंडनला जाणाऱ्या विमानाला अर्ध्यातूनच माघारी बोलावून घेतले. त्यानतंर उलटसुलट चर्चांना उधाण आले. याबाबत एअर इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आले.
एअर इंडियाने एक्स हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, "इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही विमाने वळवण्यात आली. तर, काही विमानांना पुन्हा परतण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत एअर इंडियाने यादी जाहीर केली. या यादीत मुंबई लंडन फ्लाइट एआय १२९ विमानाचाही समावेश आहे. हे विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आहे."