शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

विदर्भाचा मुद्दा डावलल्याने भाजपची घसरण : विदर्भ राज्य आंदोलन समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 11:42 PM

भाजपने विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन देऊन २०१४ मध्ये सत्ता मिळविली. मात्र मागील पाच वर्षात या मुद्याला सातत्याने बगल दिली. विदर्भातील जनतेने भाजपाला मतदानातून धडा शिकविला, अशी प्रतिक्रिया विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपने विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन देऊन २०१४ मध्ये सत्ता मिळविली. मात्र मागील पाच वर्षात या मुद्याला सातत्याने बगल दिली. या वेळीही या विषयावर ते काहीच बोलले नसल्याने विदर्भातील जनतेने भाजपाला मतदानातून धडा शिकविला, अशी प्रतिक्रिया विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केली आहे.२४ ऑक्टोबरच्या निकालानंतर विदर्भ आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून विदर्भातील जनतेने भाजपाचे ४४ आमदार निवडून दिले. त्यामुळेच महाराष्ट्र राज्यात भाजपची सत्ता बसली. १२३ आमदारांपैकी ४४ आमदारांचा मोठा गट विदभार्तून निवडून जाऊनही या आमदारांनी विदर्भाबद्दल कोणतीही भूमिका घेतली नाही. सत्ता मिळताच भाजपाने विदर्भातील जनतेला धोका दिला. विदर्भ राज्याची निर्मिती केली नाही. विदर्भाच्या प्रश्नासोबतच शेतकरी, बेरोजगार, आर्थिक मंदी या प्रश्नावरसुद्धा भाजपाने लक्ष दिले नाही, त्याचाच हा परिणाम असल्याचा दावा त्यांनी केला आहे.विदर्भ राज्य आंदोलन समितीने गेल्या पाच वर्षभर भाजपविरोधात वातावरण तयार केले. २०१९ च्या निवडणुकीआधी विदर्भ द्या, अन्यथा विदर्भातील जनता भाजपला विदर्भातून हद्दपार करेल, असे प्रत्येक वेळी ठणकावून सांगितले होते. या जनजागृतीचा हा परिणाम असून भाजपाच्या १५ जागा विदभार्तून कमी करण्यासाठी मात्र विदर्भाचा मुद्दाच कारणीभूत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भाजपाने या निकालापासून धडा घ्यावा. विदर्भ राज्य आंदोलन समिती पुन्हा स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vidarbhaविदर्भBJPभाजपा