शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

सिंचन घोटाळ्याचा आरोप तथ्यहीन ; इंजिनियर्स वेलफेयर असोसिएशनचा अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 20:10 IST

विदर्भातील सिंचन प्रकल्पांमध्ये ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचा दावा इंजिनियर्स वेलफेयर असोसिएशनने केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सिंचन घोटाळ्यासंदर्भात प्रलंबित जनमंच संस्थेच्या जनहित याचिकेमध्ये असोसिएशनने मंगळवारी मध्यस्थी अर्ज दाखल केला. त्यात हा दावा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजनमंचच्या याचिकेतील मुद्दे निरर्थक असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील सिंचन प्रकल्पांमध्ये ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचा दावा इंजिनियर्स वेलफेयर असोसिएशनने केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सिंचन घोटाळ्यासंदर्भात प्रलंबित जनमंच संस्थेच्या जनहित याचिकेमध्ये असोसिएशनने मंगळवारी मध्यस्थी अर्ज दाखल केला. त्यात हा दावा करण्यात आला आहे.राज्य सरकारने घोटाळ्याची खुली चौकशी करण्याची ग्वाही दिल्यानंतर उच्च न्यायालयाने १२ डिसेंबर २०१४ रोजी जनमंचची समान विषयावरील याचिका निकाली काढली होती. त्यानंतर या संस्थेने त्यावेळी उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन २०१६ मध्ये समान मुद्यांसह नवीन याचिका दाखल केली. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे १८ मोठे, ५४ मध्यम व २४८ लघु असे एकूण ३२० सिंचन प्रकल्प आहेत. त्यामध्ये राजकारणी, अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमताने ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा केल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. राज्य सरकारने विविध उद्देशांकरिता स्थापन केलेल्या नंदकुमार वडनेरे, एच.टी. मेंडीगिरी आदी समितींचे अहवाल, विरोधी पक्षांची भाषणे, वृत्तपत्रांतील बातम्या इत्यादीच्या आधारावर हा आरोप करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांनी स्वत: काही संशोधन केलेले नाही. त्यांनी विविध अहवालांचा स्वत:च्या मनाला भावणारा अर्थ काढून चुकीची चित्र उभे केले असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.कंत्राटदारांनी स्वत:ची पात्रता नसताना बोगस कागदपत्रांच्या आधारे सिंचन प्रकल्पांची कंत्राटे मिळविल्याचा आरोप तथ्यहीन आहे. कंत्राटदारांनी कायदेशिर प्रक्रियेनुसार कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यावर कुणाचीही तक्रार नसताना त्याच्या सत्यतेवर अविश्वास व्यक्त करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. या प्रकरणामध्ये प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत फसविले जात आहे. परिणामी, अधिकाऱ्यांनी धोका पत्करणे बंद केले आहे. त्यांच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण झाले आहे. त्या कारणाने गेल्या चार वर्षापासून सिंचन प्रकल्पांच्या कामात समाधानकारक प्रगती झाली नाही. प्रकल्पांचा खर्च मात्र सतत वाढत आहे याकडे असोसिएशनने लक्ष वेधले आहे. असोसिएशनच्या वतीने अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर कामकाज पाहणार आहेत.७० हजार कोटी आणले कुठूनविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला स्थापनेपासून म्हणजे, १९९७-९८ पासून ते २०१४-१५ पर्यंत राज्य सरकारकडून २७ हजार ४८ कोटी ५५ लाख, सेक्युरिटीजमधून १ हजार ६७८ कोटी ९९ लाख व इतर स्रोतांकडून २४४ कोटी ५९ लाख असे एकूण २८ हजार ९७२ कोटी १३ लाख रुपये मिळाले. तसेच, या काळात प्रकल्प बांधकामावर १९ हजार ९१ कोटी ५३ लाख, भूसंपादनावर ५ हजार १४१ कोटी ९४ लाख, पुनर्वसनावर १ हजार ५५९ कोटी ८ लाख व अन्य काही कामे मिळून एकूण २७ हजार ८२८ कोटी ९६ लाख रुपये खर्च झाले. त्यामुळे सिंचन प्रकल्पांमध्ये ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा कसा झाला हे याचिकाकर्त्यांनी आधी स्पष्ट करायला पाहिजे असेही असोसिएशनने अर्जात म्हटले आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प