शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

Air India plane crash; अखेर दीपक यांची सरप्राईज भेट झालीच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 20:49 IST

शनिवारी आईचा वाढदिवस असल्याने तिला सरप्राईज भेट देण्याचा मानस कॅप्टन दीपक साठे यांनी बाळगला होता. दुबईतून एअर इंडियाचे विमान घेऊन ते शुक्रवारी भारतात पोहचले पण कोझिकोडे येथील करीपूर विमानतळावर त्यांचे विमान क्रॅश झाले.

ठळक मुद्देआईच्या वाढदिवसाला विमान अपघातात गमावला जीवसाठे कुटुंबीयात हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ११ मार्चपासून आईवडिलांची भेट झाली नव्हती. शनिवारी आईचा वाढदिवस असल्याने तिला सरप्राईज भेट देण्याचा मानस कॅप्टन दीपक साठे यांनी बाळगला होता. दुबईतून एअर इंडियाचे विमान घेऊन ते शुक्रवारी भारतात पोहचले पण कोझिकोडे येथील करीपूर विमानतळावर त्यांचे विमान क्रॅश झाले. यात दीपक साठे यांचे निधन झाले. या दुर्दैवी अपघाताने दीपक साठे यांची आईसोबत अखेरची सरप्राईज भेट होऊ शकली नाही.

भारतीय वायुसेनेतून निवृत्त झाल्यानंतर कॅप्टन दीपक साठे एअर इंडियात वैमानिक म्हणून कार्यरत होते. कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दुबईतून परत आणणाऱ्या विमानाचे सारथ्य त्यांच्याकडे होते. मूळचे नागपूरचे असलेले दीपक साठे यांचे वडील वसंत साठे हे भारतीय सेनेत कर्नल होते. टिळकनगर व भरतनगर येथे त्यांचे वास्तव्य अजूनही आहे. वसंत साठे यांचा मोठा मुलगा विकास हासुद्धा भारतीय सेनेत होता. त्यांचेसुद्धा अपघातीच निधन झाले. वडील वसंत साठे हे सेनेत जेथे जेथे वास्तव्यास होते तेथे तेथे दीपक यांचे शिक्षण झाले. दीपक यांनी एनडीए केल्यानंतर भारतीय वायुसेनेत रुजू झाले. त्यांनी सोअर्ड ऑफ ऑनर यासह भारतीय वायुसेनेची सर्व पदके मिळविली होती.नागपुरात दीपक यांचे चुलत भाऊ सुनील साठे वास्तव्यास असतात. दीपक यांच्या मोठ्या मुलाचे लग्न झाल्यानंतर त्यांनी ११ मार्चला नागपुरात एक पार्टी ठेवली होती. तेव्हा आई नीला व वडील वसंत साठे यांची अखेरची भेट झाली. लॉकडाऊनमुळे त्यांनाही जाणे शक्य झाले नाही. शनिवारी त्यांच्या आईचा ८३ वा वाढदिवस होता. तिला सरप्राईज भेट द्यायची दीपक यांची इच्छा होती. पण विमान अपघातात त्यांचा घात झाला.देवाने तारले कुणाला आणि मारले कुणाला८३ वर्षीय नीला साठे मुलाच्या दुर्दैवी निधनामुळे हळव्या झाल्या होत्या. मुलाबद्दल गौरवोद्गार काढताना त्या म्हणाल्या देव तारी त्याला कोण मारी... पण माझ्या मुलाने १७० लोकांचे प्राण वाचविले. या अपघातात देवाने तारले कुणाला आणि मारले कुणाला. परमेश्वरापुढे डोकं टेकविण्याशिवाय काहीच बोलू शकत नाही. आमचा मुलगा देशासाठी शहीद झाला आहे. मुलगा गेल्याचे दु:ख असलेतरी त्याने अनेकांचे प्राण वाचविले याचा अभिमान आहे.

 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया