शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या आर्यनला पाळण्याचा फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 02:45 IST

आर्यन आता एक वर्षाचा झाला होता. नुकताच ९ फेब्रुवारीला त्याचा वाढदिवसही झाला. बोबडे शब्द बोलत घरात खेळणारा, बागळणारा तान्हा आर्यन सर्वांना हवाहवासा झाला होता.

मंगर कुटुंबीयांवर शोककळा : सोमलवाडा परिसरात घडली घटनानिशांत वानखेडे  नागपूरआर्यन आता एक वर्षाचा झाला होता. नुकताच ९ फेब्रुवारीला त्याचा वाढदिवसही झाला. बोबडे शब्द बोलत घरात खेळणारा, बागळणारा तान्हा आर्यन सर्वांना हवाहवासा झाला होता. वडील त्याच्या भविष्यासाठी मेहनत घेत होते. पतीसोबत घराला आर्थिक आधार मिळावा म्हणून आर्यनची आईही घरकाम करायला जात होती. त्याही दिवशी ती नेहमीप्रमाणे अंगाईगीत गाऊन आर्यनला पाळण्यात झोपवून कामाला गेली, मात्र ज्या पाळण्यात टाकताच रडणारे बाळ शांत होते तोच पाळणा आपल्या बाळाला कायमचा शांत करेल हे त्या माऊलीला कुठे माहीत होते. परतली तेव्हा तिचे काळीजच फाटले होते. नियतीने याच पाळण्याला बांधलेला दुपट्टा फास बनवून चिमुकल्या आर्यनचे प्राण हरले.हृदयाला चटका लावणारी ही घटना सोमलवाड्याच्या राहुलनगर परिसरात घडली. आर्यन गोपाल मंगर असे या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव. काळाने येथील मंगर कुटुंबीयावर मोठा घाव घातला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आर्यनचे वडील गोपाल विठ्ठल मंगर एका कंपनीत मार्केटिंगच्या कामाला आहेत. लग्नाला सहा वर्षे झाली व संसाराला दोन फुलेही आली. मोठा अनिकेत व लहान आर्यन. त्यांच्या घरीच गोपालची बहीण आणि जिजा सोबत राहतात. तेही दररोज कामाला जातात. गोपालच्या कमाईसह मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक आधार मिळावा म्हणून गोपालची पत्नी सीमा आसपासच्या परिसरात घरकाम करायला जाते. बाळाला पाळण्यात झोपवायचे आणि कामाला जायचे, असा तिचा नित्यक्रम. शुक्रवारीही रोजच्या प्रमाणे सर्व कामावर निघून गेले होते. सीमानेही आर्यनला पाळण्यात झोपविले. सवयीप्रमाणे बाळ पाळण्यातून पडू नये म्हणून कमरेजवळ तिने दुपट्टा बांधला. मात्र हाच दुपट्टा आर्यनसाठी काळ ठरला. अचानक आर्यनला जाग आली आणि तो पाळण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडू लागला. निष्काळजीपणा की कुटुंबाची गरज?नागपूर : मात्र आर्यनचा हंबरडा ऐकायला तिथे कुणीही नव्हते. या प्रयत्नात पाळणा उलटा झाला आणि कमरेभोवतीचा सैल झालेला दुपट्टा गळ्यापर्यंत सरकला आणि त्यानेच फास लागला. घटना दुपारी १२ ते १२.३० वाजता घडल्याचे गोपाल यांनी सांगितले. १ वाजताच्या दरम्यान आर्यनची आत्या कामे आटोपून घरी पोहचली तेव्हा तिनेही हंबरडा फोडला. मात्र स्वत:ला सावरत तिने भाऊ गोपालला फोन केला आणि तातडीने आर्यनला जवळच्या रुग्णालयातही नेले. मात्र आर्यन कायमचा हरवला होता. आर्यन आता सोडून गेला. मात्र यात चूक कुणाची हा प्रश्न निर्माण होतो. पाळण्याला दुपट्टा बांधून आणि त्याहीपेक्षा बाळाला एकटे सोडून जायला नको होते. या निष्काळजीपणातूनच आर्यनचा मृत्यू झाला, असे चर्चिले जात आहे. मात्र हा त्या माऊलीचा निष्काळजीपणा की, कुटुंबाची गरज भागविण्याची धडपड हा प्रश्न आहे. कारण सायंकाळच्या भाकरीची व्यवस्था करण्यासाठी ती कामावर निघून गेली. घरी गेल्यावर तान्हुल्या आर्यनला चिऊचा घास देऊ, असे तिचे स्वप्नरंजन होते. मात्र नियतीला वेगळेच मंजूर होते.-आर्यनची आई सीमा निपचित पडली होती. बोलायची इच्छा नसतानाही वडील गोपाल यांनी घडलेली हकीकत सांगितली. मात्र हे सांगताना बापाच्या डोळ्यांच्या कडांचा ओलावा थांबत नव्हता. (प्रतिनिधी)