शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया उपक्रमाने गोड्या पाण्याच्या वापरात ६.३% कपात 

By नरेश डोंगरे | Updated: June 20, 2023 15:41 IST

मध्य रेल्वेचा दावा : नागपूरसह १० ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र 

नागपूर : पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया उपक्रमामुळे गोड्या पाण्याच्या वापरात ६.३% कपात झाल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. मध्य रेल्वेचा पर्यावरण आणि संरक्षण व्यवस्थापन (ईएनएचएम) विभाग विविध उपाययोजनांद्वारे पर्यावरणीय शाश्वतेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. जलसंधारणाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एन जी टी) आणि रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या नियमांनुसार हे उपाय केले जात आहेत.

मध्य रेल्वेकडे सांडपाणी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२  हून अधिक जलशुद्धीकरण संयंत्रे आहेत. ज्याद्वारे दररोज एक कोटी लिटरपेक्षा जास्त पाण्यावर प्रक्रिया केली जाते. वाढत्या जलसंकटाला नियंत्रित करण्यासाठी त्याचा वापर होतो. प्रदूषित पाण्याचा पर्यावरणातील विसर्ग दूर करन्यासाठीही ते उपयुक्त ठरते. हे प्रक्रिया केलेले पाणी नंतर ट्रॅक धुणे, स्टेशनचे मजले पुसणे इत्यादी स्वच्छतेचया कामासाठी त्याचा वापर केला जातो.

२०२२ मध्ये, १५७५  किलोलिटर प्रतिदिन (केएलडी) पाणी तयार करण्याची क्षमता असलेले १०  नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. त्यात लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रत्येकी १२० केएलडी क्षमतेचे २  वॉटर रिसायकलिंग प्लांट,४०  केएलडी क्षमतेचा अजनी, नागपूर येथे एसटीपी, १५ केएलडी क्षमतेचे साईनगर शिर्डी सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी), अहमदनगर येथे ५० केएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र, २००  क्षमतेचा नाशिक रोड एस्टीपी, अकोला एसटीपी ५००  केएलडी क्षमता, खांडवा एसटीपी, कोपरगाव, सोलापूर एसटीपी आदींचा समावेश आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेWaterपाणी