शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया उपक्रमाने गोड्या पाण्याच्या वापरात ६.३% कपात 

By नरेश डोंगरे | Updated: June 20, 2023 15:41 IST

मध्य रेल्वेचा दावा : नागपूरसह १० ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र 

नागपूर : पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया उपक्रमामुळे गोड्या पाण्याच्या वापरात ६.३% कपात झाल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. मध्य रेल्वेचा पर्यावरण आणि संरक्षण व्यवस्थापन (ईएनएचएम) विभाग विविध उपाययोजनांद्वारे पर्यावरणीय शाश्वतेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. जलसंधारणाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एन जी टी) आणि रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या नियमांनुसार हे उपाय केले जात आहेत.

मध्य रेल्वेकडे सांडपाणी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२  हून अधिक जलशुद्धीकरण संयंत्रे आहेत. ज्याद्वारे दररोज एक कोटी लिटरपेक्षा जास्त पाण्यावर प्रक्रिया केली जाते. वाढत्या जलसंकटाला नियंत्रित करण्यासाठी त्याचा वापर होतो. प्रदूषित पाण्याचा पर्यावरणातील विसर्ग दूर करन्यासाठीही ते उपयुक्त ठरते. हे प्रक्रिया केलेले पाणी नंतर ट्रॅक धुणे, स्टेशनचे मजले पुसणे इत्यादी स्वच्छतेचया कामासाठी त्याचा वापर केला जातो.

२०२२ मध्ये, १५७५  किलोलिटर प्रतिदिन (केएलडी) पाणी तयार करण्याची क्षमता असलेले १०  नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. त्यात लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रत्येकी १२० केएलडी क्षमतेचे २  वॉटर रिसायकलिंग प्लांट,४०  केएलडी क्षमतेचा अजनी, नागपूर येथे एसटीपी, १५ केएलडी क्षमतेचे साईनगर शिर्डी सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी), अहमदनगर येथे ५० केएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र, २००  क्षमतेचा नाशिक रोड एस्टीपी, अकोला एसटीपी ५००  केएलडी क्षमता, खांडवा एसटीपी, कोपरगाव, सोलापूर एसटीपी आदींचा समावेश आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेWaterपाणी