शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया उपक्रमाने गोड्या पाण्याच्या वापरात ६.३% कपात 

By नरेश डोंगरे | Updated: June 20, 2023 15:41 IST

मध्य रेल्वेचा दावा : नागपूरसह १० ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र 

नागपूर : पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया उपक्रमामुळे गोड्या पाण्याच्या वापरात ६.३% कपात झाल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. मध्य रेल्वेचा पर्यावरण आणि संरक्षण व्यवस्थापन (ईएनएचएम) विभाग विविध उपाययोजनांद्वारे पर्यावरणीय शाश्वतेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. जलसंधारणाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एन जी टी) आणि रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या नियमांनुसार हे उपाय केले जात आहेत.

मध्य रेल्वेकडे सांडपाणी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२  हून अधिक जलशुद्धीकरण संयंत्रे आहेत. ज्याद्वारे दररोज एक कोटी लिटरपेक्षा जास्त पाण्यावर प्रक्रिया केली जाते. वाढत्या जलसंकटाला नियंत्रित करण्यासाठी त्याचा वापर होतो. प्रदूषित पाण्याचा पर्यावरणातील विसर्ग दूर करन्यासाठीही ते उपयुक्त ठरते. हे प्रक्रिया केलेले पाणी नंतर ट्रॅक धुणे, स्टेशनचे मजले पुसणे इत्यादी स्वच्छतेचया कामासाठी त्याचा वापर केला जातो.

२०२२ मध्ये, १५७५  किलोलिटर प्रतिदिन (केएलडी) पाणी तयार करण्याची क्षमता असलेले १०  नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. त्यात लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रत्येकी १२० केएलडी क्षमतेचे २  वॉटर रिसायकलिंग प्लांट,४०  केएलडी क्षमतेचा अजनी, नागपूर येथे एसटीपी, १५ केएलडी क्षमतेचे साईनगर शिर्डी सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी), अहमदनगर येथे ५० केएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र, २००  क्षमतेचा नाशिक रोड एस्टीपी, अकोला एसटीपी ५००  केएलडी क्षमता, खांडवा एसटीपी, कोपरगाव, सोलापूर एसटीपी आदींचा समावेश आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेWaterपाणी