शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
2
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
3
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
4
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
5
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
6
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
7
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
8
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
9
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
10
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
11
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
12
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
13
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
15
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
16
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
17
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
18
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
19
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
20
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
Daily Top 2Weekly Top 5

पदवी परीक्षांना ‘६०:४०’ प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 03:17 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखेर प्रत्यक्षात

नागपूर विद्यापीठ : विद्वत् परिषदेची मान्यता, पुढील सत्रापासून अंमलबजावणीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखेर प्रत्यक्षात येणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल होणार असून सर्व पदवी परीक्षा ६०:४० या ‘पॅटर्न’नुसार होणार आहेत. प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला व विद्वत्त परिषदेने याला मान्यता दिली. २०१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून परीक्षेची ही प्रणाली राबविण्यात येणार आहे.आजच्या परीक्षा प्रणालीमुळे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर प्रचंड ताण वाढला आहे. परीक्षा विभाग हा विद्यापीठाचा पाठीचा कणा असतो, परंतु तो कोलमडायला आला आहे. अशा स्थितीत विद्यापीठाला खरोखरच प्रगती करायची असेल तर नवीन परीक्षा प्रणालीची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचा मानस कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी पदग्रहण करताना बोलून दाखविला होता. त्यासंदर्भात पुढे विचार सुरू झाला व प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली सर्वच पदवी अभ्यासक्रमांना ६०:४० परीक्षा प्रणालीचा आराखडा तयार करण्यासाठी समिती बसविण्यात आली. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा खरा कस लागणार आहे. शिवाय विद्यापीठावरील ताणदेखील कमी होईल. याची अंमलबजावणी पुढील सत्रापासूनच करण्यात येईल, असे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)अभियांत्रिकीच्या प्राचार्यांचा अगोदरच होकार४सुरुवातीला नागपूर विद्यापीठाकडून अभियांत्रिकीच्या परीक्षांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची तयारी सुरू झाली होती. त्यानुसार पुढील सत्रापासून विद्यापीठाकडून केवळ ६० टक्के गुणांचीच वस्तुनिष्ठ परीक्षा घेतली जाईल, तर ४० टक्के परीक्षांचा भार महाविद्यालयांवर असेल असे ठरविण्यात आले होते. विद्यापीठात सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांचीदेखील या नव्या प्रणालीला लागू करण्यासंदर्भात होकार दिला होता.अशी आहे ‘६०:४०’ प्रणालीया ‘६०:४०’ प्रणालीनुसार विद्यार्थ्यांच्या दोन परीक्षा होतील. यातील ४० टक्के गुणांची परीक्षा ही महाविद्यालयाकडून घेण्यात येईल व त्यात विस्तारपूर्वक उत्तरे लिहिण्याची संधी असेल. विद्यापीठाकडून ६० टक्के गुणांची वस्तुनिष्ठ पद्धतीची परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना यात केवळ अचूक उत्तरांना खूण करावी लागेल. विद्यापीठाच्या परीक्षेसाठी प्रश्नांची ‘बँक’ तयार करण्यात येतील व विद्यार्थ्यांना विविध प्रश्नपत्रिकांचे संच देण्यात येतील. याचे मूल्यांकन ‘आॅनलाईन’ पद्धतीनेच होईल व आठ दिवसात निकाल जाहीर होऊ शकतील. विद्यार्थ्यांच्या मनात शंका असेल तर त्यांना योग्य उत्तरांसोबतच ‘आॅनलाईन’ उत्तरपत्रिका पुरविण्यात येतील.विद्यार्थ्यांपुढील आव्हान वाढणारआताच्या परीक्षा प्रणालीनुसार ‘इंटर्नल’ गुणांच्या आधारावर विद्यार्थी सहजपणे उत्तीर्ण होऊन जातात. परंतु जर ‘६०:४०’ प्रणाली लागू झाली तर विद्यार्थ्यांसमोरील अडचणी वाढणार आहेत. दोन्ही परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. दरम्यान,नागपूर विद्यापीठात विविध विद्याशाखांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी निरनिराळे नियम आहेत. कुठे उत्तीर्ण होण्यासाठी ५० टक्के गुण आवश्यक आहेत, तर काही अभ्यासक्रमांमध्ये ३५ टक्के गुण घेतलेला विद्यार्थी उत्तीर्ण होतो. विद्यापीठात उत्तीर्ण होण्यासाठी समान पद्धत लागू करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली ६ मे रोजी विशेष बैठक होणार आहे. यात संबंधित निर्णय घेण्यात येईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के तर पदवी अभ्यासक्रमांत उत्तीर्ण होण्यासाठी ४० टक्के गुण आवश्यक असल्याच्या प्रस्तावावर या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.प्रणालीचे फायदे४परीक्षा विभागावरील ताण कमी होईल.४निकालांचा वेग वाढेल.४फेरमूल्यांकनाची प्रणालीच बंद होईल.४गैरप्रकार कमी होतील.४विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी तयार होतील.४प्राध्यापकांना देण्यात येणारा मानधनाचा खर्च वाचेल.