शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

१.२३ लाख विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 21:07 IST

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे एससी, ओबीसी, एसबीसी व व्हिजेएनटीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१७-१८ मध्ये नागपूर विभागातून १,५०,२४१ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. यातील १,२३,९७९ विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहे. तर २४७३२ अर्ज महाविद्यालयीन व जिल्हा पातळीवर प्रलंबित आहे, तर १५३० अर्ज विविध कारणांनी नाकारले आहे. विभागात सर्वाधिक शिष्यवृत्तीचे वाटप चंद्रपूर जिल्ह्यात झाले असून, चंद्रपूर जिल्ह्याची टक्केवारी ९० आहे.

ठळक मुद्देनागपूर विभागातून १.५ लाख अर्ज प्राप्त : चंद्रपुरात सर्वाधिक शिष्यवृत्तीचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे एससी, ओबीसी, एसबीसी व व्हिजेएनटीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१७-१८ मध्ये नागपूर विभागातून १,५०,२४१ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. यातील १,२३,९७९ विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहे. तर २४७३२ अर्ज महाविद्यालयीन व जिल्हा पातळीवर प्रलंबित आहे, तर १५३० अर्ज विविध कारणांनी नाकारले आहे. विभागात सर्वाधिक शिष्यवृत्तीचे वाटप चंद्रपूर जिल्ह्यात झाले असून, चंद्रपूर जिल्ह्याची टक्केवारी ९० आहे.२०१७-१८ मध्ये नागपूर विभागात अनुसूचित जातीच्या ४८,३६८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. यापैकी ४१,७२९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. ओबीसीच्या ८१,९२८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. यातील ६६४७९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या ७२१७ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. यापैकी ५८२७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. तर व्हीजेएनटीच्या १२७२८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी ९९४४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. २०१७-१८ या वर्षात शासनाने शिष्यवृत्ती योजनेचा समावेश डीबीटीमध्ये केला होता. परंतु डीबीटीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जुन्याच पद्धतीने शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.- सर्वात जास्त अर्ज नागपूर जिल्ह्यातूनविभागातील सहाही जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज नागपूर जिल्ह्याचे आहे. ७२७३६ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. यातील ६३५०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. चंद्रपूरमध्ये २२०१४ अर्ज आले. १९८१२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. वर्धा १८१३४ अर्ज आले, १६२३७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. भंडारा १९७९१ अर्ज आले. १४,१४२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप झाले. गोंदिया ११६१३ अर्ज आले. ६६६८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. गडचिरोलीतून ५९५३ अर्ज आले. ३६२० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप झाले. गडचिरोली जिल्ह्यातील अर्जांची संख्या लक्षात घेता, उच्च शिक्षणात गडचिरोली जिल्हा मागास असल्याचे दिसत आहे.- २४ हजारावर अर्ज महाविद्यालय व जिल्हा पातळीवर प्रलंबितकाही महाविद्यालयाने अजूनही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज सहा. आयुक्त कार्यालयाला पाठविले नाही. तर काही अर्जाला आवश्यक कागदपत्राची पूर्तता विद्यार्थ्यांनी न केल्यामुळे सहा. आयुक्त कार्यालय स्तरावर सुद्धा अर्ज प्रलंबित आहे. यात महाविद्यालयीन स्तरावर १०६८० अर्ज असून, जिल्हापातळीवर १४०५२ अर्ज प्रलंबित आहे. सर्वाधिक प्रलंबित अर्ज हे गोंदिया जिल्ह्यातील आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक लागतो.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर