शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

१.२३ लाख विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 21:07 IST

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे एससी, ओबीसी, एसबीसी व व्हिजेएनटीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१७-१८ मध्ये नागपूर विभागातून १,५०,२४१ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. यातील १,२३,९७९ विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहे. तर २४७३२ अर्ज महाविद्यालयीन व जिल्हा पातळीवर प्रलंबित आहे, तर १५३० अर्ज विविध कारणांनी नाकारले आहे. विभागात सर्वाधिक शिष्यवृत्तीचे वाटप चंद्रपूर जिल्ह्यात झाले असून, चंद्रपूर जिल्ह्याची टक्केवारी ९० आहे.

ठळक मुद्देनागपूर विभागातून १.५ लाख अर्ज प्राप्त : चंद्रपुरात सर्वाधिक शिष्यवृत्तीचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे एससी, ओबीसी, एसबीसी व व्हिजेएनटीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१७-१८ मध्ये नागपूर विभागातून १,५०,२४१ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. यातील १,२३,९७९ विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहे. तर २४७३२ अर्ज महाविद्यालयीन व जिल्हा पातळीवर प्रलंबित आहे, तर १५३० अर्ज विविध कारणांनी नाकारले आहे. विभागात सर्वाधिक शिष्यवृत्तीचे वाटप चंद्रपूर जिल्ह्यात झाले असून, चंद्रपूर जिल्ह्याची टक्केवारी ९० आहे.२०१७-१८ मध्ये नागपूर विभागात अनुसूचित जातीच्या ४८,३६८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. यापैकी ४१,७२९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. ओबीसीच्या ८१,९२८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. यातील ६६४७९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या ७२१७ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. यापैकी ५८२७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. तर व्हीजेएनटीच्या १२७२८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी ९९४४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. २०१७-१८ या वर्षात शासनाने शिष्यवृत्ती योजनेचा समावेश डीबीटीमध्ये केला होता. परंतु डीबीटीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जुन्याच पद्धतीने शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.- सर्वात जास्त अर्ज नागपूर जिल्ह्यातूनविभागातील सहाही जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज नागपूर जिल्ह्याचे आहे. ७२७३६ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. यातील ६३५०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. चंद्रपूरमध्ये २२०१४ अर्ज आले. १९८१२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. वर्धा १८१३४ अर्ज आले, १६२३७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. भंडारा १९७९१ अर्ज आले. १४,१४२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप झाले. गोंदिया ११६१३ अर्ज आले. ६६६८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. गडचिरोलीतून ५९५३ अर्ज आले. ३६२० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप झाले. गडचिरोली जिल्ह्यातील अर्जांची संख्या लक्षात घेता, उच्च शिक्षणात गडचिरोली जिल्हा मागास असल्याचे दिसत आहे.- २४ हजारावर अर्ज महाविद्यालय व जिल्हा पातळीवर प्रलंबितकाही महाविद्यालयाने अजूनही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज सहा. आयुक्त कार्यालयाला पाठविले नाही. तर काही अर्जाला आवश्यक कागदपत्राची पूर्तता विद्यार्थ्यांनी न केल्यामुळे सहा. आयुक्त कार्यालय स्तरावर सुद्धा अर्ज प्रलंबित आहे. यात महाविद्यालयीन स्तरावर १०६८० अर्ज असून, जिल्हापातळीवर १४०५२ अर्ज प्रलंबित आहे. सर्वाधिक प्रलंबित अर्ज हे गोंदिया जिल्ह्यातील आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक लागतो.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर