शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

एवढा पाऊस पडूनही राज्यात १२०० गावे कोरडीच; ३५५ पैकी ७४ तालुक्यांत तूट

By निशांत वानखेडे | Updated: March 23, 2023 11:33 IST

जलस्तर १ ते ३ मीटरपर्यंत घटला

नागपूर : २०२२ चा पावसाळा न विसरण्यासारखा आहे. महाराष्ट्राला पावसाने अक्षरश: झाेडपले आणि बहुतेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र, एवढा पाऊस पडूनही राज्यातील अनेक तालुके मात्र सुकली आहेत. राज्यातील ३५५ पैकी ७४ तालुके प्रभावित असून ५८ तालुक्यांतील जलस्तर घटले आहेत व ११९६ गावे प्रभावित झाली आहेत. अहवालात नागपूर विभागाची स्थिती मात्र दिलासादायक आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे राज्यातील ५ मुख्य खाेऱ्यांचे १५३५ पाणलाेट क्षेत्रामध्ये विभाजन करून या परिसरातील पाणवहन, पुनर्भरण आणि साठवण उपक्षेत्रातील भूजल पातळीचे प्रतिनिधित्व करेल अशा ३९२० निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. त्यापैकी राज्यातील ३७०३ निरीक्षण विहिरींचे ऑक्टाेबरमधील भूजल पातळीच्या नाेंदीच्या आधारे संभाव्य पाणीटंचाईचा अभ्यास केला आहे. २०२२ मध्ये माहे सप्टेंबरमध्ये भूजल पातळीचा मागील ५ वर्षांतील माहे सप्टेंबर महिन्यातील भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास करून अहवाल तयार करण्यात आला आहे. यानुसार ३७०३ पैकी ३०८९ निरीक्षण विहिरींमध्ये भूजल पातळीत वाढ झाली असून ६१४ विहिरींमध्ये सरासरीपेक्षा घट झाल्याचे आढळून आले आहे. ही घट चार गटांत विभागली आहे. त्यानुसार १ ते ३ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त घट झाल्याचे दिसून येत आहे. जलस्तर घटण्याबाबत ठाणे, पुणे आणि नाशिक विभागातील जिल्हे प्रभावित आहेत. अमरावती विभागाचे ८ तालुक्यांतील १६२ गावे प्रभावित आहेत. नागपूर विभागाची स्थिती सर्वाधिक समाधानी असून केवळ ७ गावे प्रभावित असल्याचे दिसून येत आहे.

जलस्तर घटलेल्या गावांची स्थिती

*विभाग - प्रभावित तालुके - ३ मीटरपेक्षा अधिक - २ ते ३ मीटर - १ ते २ मीटर - १ मीटरपेक्षा कमी*

  • ठाणे - ८ - ० - ० - १०१ - १०१
  • पुणे - १४ - ११ - ७८ - १४४ - २३३
  • नाशिक - १५ - ०१ - ११ - १२० - १३२
  • छ. संभाजीनगर - ८ - ०० - ०६ - ३८ - ४४
  • अमरावती - १० - २४ - १८ - ३८ - ८१
  • नागपूर - ०३ - ०० - ०० - ०७ - ०७

एकूण - ५८ - ३६ - ११३ - ४४९ - ५९८

मुख्य गाेष्टी

  • राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २८१ तालुक्यांत जलस्तर सरासरीपेक्षा वर. ७४ तालुक्यांत तूट.
  • ७४ पैकी ६० तालुक्यांत २० टक्के, १२ तालुक्यांत २० ते ३० टक्के व दाेन तालुक्यांत ३० ते ५० टक्के तूट (काेल्हापूर व सातारा जिल्हा)
  • पुण्याच्या ११ गावी व अमरावती विभागात अकाेल्यातील २४ गावांत जलस्तर ३ मीटरपेक्षा खाली आला.
  • ठाणे विभागात रत्नागिरीच्या ९२ गावांत जलस्तर १ ते २ मीटरपर्यंत घटला व ९२ गावांत १ मीटरपेक्षा कमी घटला.
  • नागपूर विभागातील ६३ पैकी केवळ ३ तालुके प्रभावित. यातील नागपूर व चंद्रपूरच्या १४ गावांत जलस्तर घटला पण नियंत्रणात.
टॅग्स :environmentपर्यावरणweatherहवामानRainपाऊसnagpurनागपूरwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात