शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

एवढा पाऊस पडूनही राज्यात १२०० गावे कोरडीच; ३५५ पैकी ७४ तालुक्यांत तूट

By निशांत वानखेडे | Updated: March 23, 2023 11:33 IST

जलस्तर १ ते ३ मीटरपर्यंत घटला

नागपूर : २०२२ चा पावसाळा न विसरण्यासारखा आहे. महाराष्ट्राला पावसाने अक्षरश: झाेडपले आणि बहुतेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र, एवढा पाऊस पडूनही राज्यातील अनेक तालुके मात्र सुकली आहेत. राज्यातील ३५५ पैकी ७४ तालुके प्रभावित असून ५८ तालुक्यांतील जलस्तर घटले आहेत व ११९६ गावे प्रभावित झाली आहेत. अहवालात नागपूर विभागाची स्थिती मात्र दिलासादायक आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे राज्यातील ५ मुख्य खाेऱ्यांचे १५३५ पाणलाेट क्षेत्रामध्ये विभाजन करून या परिसरातील पाणवहन, पुनर्भरण आणि साठवण उपक्षेत्रातील भूजल पातळीचे प्रतिनिधित्व करेल अशा ३९२० निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. त्यापैकी राज्यातील ३७०३ निरीक्षण विहिरींचे ऑक्टाेबरमधील भूजल पातळीच्या नाेंदीच्या आधारे संभाव्य पाणीटंचाईचा अभ्यास केला आहे. २०२२ मध्ये माहे सप्टेंबरमध्ये भूजल पातळीचा मागील ५ वर्षांतील माहे सप्टेंबर महिन्यातील भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास करून अहवाल तयार करण्यात आला आहे. यानुसार ३७०३ पैकी ३०८९ निरीक्षण विहिरींमध्ये भूजल पातळीत वाढ झाली असून ६१४ विहिरींमध्ये सरासरीपेक्षा घट झाल्याचे आढळून आले आहे. ही घट चार गटांत विभागली आहे. त्यानुसार १ ते ३ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त घट झाल्याचे दिसून येत आहे. जलस्तर घटण्याबाबत ठाणे, पुणे आणि नाशिक विभागातील जिल्हे प्रभावित आहेत. अमरावती विभागाचे ८ तालुक्यांतील १६२ गावे प्रभावित आहेत. नागपूर विभागाची स्थिती सर्वाधिक समाधानी असून केवळ ७ गावे प्रभावित असल्याचे दिसून येत आहे.

जलस्तर घटलेल्या गावांची स्थिती

*विभाग - प्रभावित तालुके - ३ मीटरपेक्षा अधिक - २ ते ३ मीटर - १ ते २ मीटर - १ मीटरपेक्षा कमी*

  • ठाणे - ८ - ० - ० - १०१ - १०१
  • पुणे - १४ - ११ - ७८ - १४४ - २३३
  • नाशिक - १५ - ०१ - ११ - १२० - १३२
  • छ. संभाजीनगर - ८ - ०० - ०६ - ३८ - ४४
  • अमरावती - १० - २४ - १८ - ३८ - ८१
  • नागपूर - ०३ - ०० - ०० - ०७ - ०७

एकूण - ५८ - ३६ - ११३ - ४४९ - ५९८

मुख्य गाेष्टी

  • राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २८१ तालुक्यांत जलस्तर सरासरीपेक्षा वर. ७४ तालुक्यांत तूट.
  • ७४ पैकी ६० तालुक्यांत २० टक्के, १२ तालुक्यांत २० ते ३० टक्के व दाेन तालुक्यांत ३० ते ५० टक्के तूट (काेल्हापूर व सातारा जिल्हा)
  • पुण्याच्या ११ गावी व अमरावती विभागात अकाेल्यातील २४ गावांत जलस्तर ३ मीटरपेक्षा खाली आला.
  • ठाणे विभागात रत्नागिरीच्या ९२ गावांत जलस्तर १ ते २ मीटरपर्यंत घटला व ९२ गावांत १ मीटरपेक्षा कमी घटला.
  • नागपूर विभागातील ६३ पैकी केवळ ३ तालुके प्रभावित. यातील नागपूर व चंद्रपूरच्या १४ गावांत जलस्तर घटला पण नियंत्रणात.
टॅग्स :environmentपर्यावरणweatherहवामानRainपाऊसnagpurनागपूरwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात