शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आपलं नाव... आपली आकृती अन् उत्तरही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:28 IST

भूमिती विषय म्हटला की, आकृत्यांना देण्यात येणारी पीक्यूआर, एबीसी ही ठरलेली नावे डोळ्यासमोर येतात. ही परंपरागत पद्धत वापरल्याने अध्ययनात एकसारखेपणा येऊन त्या आकृतीत साचेबद्धता होतो.

ठळक मुद्दे दीपक शेटे यांचा भूमिती विषयात नवोपक्रमनव्या उपक्रमामुळे ३१.५८ टक्के यशस्वीतेचे प्रमाण वाढले.

भरत बुटालेलक्षात ठेवणे हा मानवी जीवन व्यवहारातला आवश्यक भाग आहे. त्यासाठी स्वविचार, कौशल्यातून क्लृप्त्या वापरल्या जातात. त्यातही ओढ आणि कुतूहल वाढल्यास त्याचा अधिक फायदा होतो. हेच सूत्र भूमितीय आकृत्यांना वापरल्यानंतर त्या आकृत्यांच्या संकल्पना लक्षात ठेवण्यास मदत होतेच, शिवाय त्याची मनातली भीतीही कमी होते. हे मिणचे सावर्डे येथील आदर्श विद्यानिकेतनचे सहायक शिक्षक दीपक शेटे यांनी उपक्रमातून सिद्ध करून दाखविले.

भूमिती विषय म्हटला की, आकृत्यांना देण्यात येणारी पीक्यूआर, एबीसी ही ठरलेली नावे डोळ्यासमोर येतात. ही परंपरागत पद्धत वापरल्याने अध्ययनात एकसारखेपणा येऊन त्या आकृतीत साचेबद्धता होतो. त्यामुळे परीक्षेत आलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिताना अचूकता येत नाही. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या वैचारिकतेला संधी मिळत नाही आणि आपलेपणाही जाणवत नाही. याचाच अर्थ, आपण ती आकृती समजून न घेता तिला एका चौकटीपुरतेच बंदिस्त करतो. त्यामुळे त्या विषयाचे आकलन होईलच असे नाही.

गणिताच्या अध्यापनातला दीर्घ अनुभव असलेल्या दीपक शेटे यांनी यासाठी वेगळी संकल्पना तयार केली. विद्यार्थ्यांची आकृतीशी मैत्री व्हावी व त्यातून त्यांच्यात त्या संकल्पना दृढ व्हाव्यात, हा उद्देश समोर ठेवून ‘आपलं नाव, आपली आकृती आणि आपलं उत्तर’ हा उपक्रम राबविला. प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन क्षमता वाढू शकते, हे सिद्ध करून दाखविले.त्यांनी हा उपक्रम प्रथम नववीच्या वर्गात राबविला. भूमिती विषयातील आकृतीस स्वत:चे, वडिलांचे व आडनाव यांतील अद्याक्षर घेऊन नाव द्यावे. चौथे अक्षर आवश्यक असल्यास गावाच्या नावातील अद्याक्षर द्यावे.

अद्याक्षर समान असल्यास त्यातील अनुक्रमे त्या नावातील दुसऱ्या किंवा तिसºया क्रमांकाचे अक्षर वापरावे, अशी पद्धत विद्यार्थ्यांना सांगून त्यांना आकृतीस नाव द्यायला सांगितले. प्रत्येकाने त्याप्रमाणे आकृत्यांना नावे दिली. त्यामुळे प्रत्येकाच्या आकृतीचे नाव वेगवेगळे आले. विशेष म्हणजे स्वत:चे नाव तिथे आल्याने त्यांना भूमितीय आकृतीत आपलेपणा जाणवला. त्यांच्यात उत्सुकता निर्माण होऊन आवडीने तो प्रमेय ते लिहू लागले. परिणामी, त्यांचे उत्तर अचूक आलेच शिवाय त्यांच्या विचारांना व वैचारिकतेला चालना मिळाल्याचे दिसले. त्यांच्यात आत्मविश्वासही वाढला. साहजिकच त्यामुळे त्यांना परीक्षेतील प्रश्नांना सामोरे जाण्याचे बळ मिळाले आणि न समजता एकमेकांची उत्तरे बघून लिहिण्याचे प्रमाण अत्यल्प राहिले. विद्यार्थ्यांना समजावून घेऊनच उत्तर लिहावे लागत असल्यामुळे आकलन क्षमतेबरोबरच अन्य विषयांच्या प्रश्नाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे बळ व रुची वाढल्याचे निदर्शनास आले.उपक्रमाची यशस्वितापारंपरिक पद्धत आणि नवीन उपक्रमातील पद्धत अशा दोन प्रकारे चाचणी घेतली. पहिल्या पद्धतीत ५७.८९ टक्के विद्यार्थ्यांची योग्य उत्तरे आली. नवीन उपक्रमाचा वापर करून चाचणी घेतल्यानंतर ८१.४७ टक्के विद्यार्थ्यांची उत्तरे अचूक आली.फायदे असे...

  • विद्यार्थ्यांच्या विचारांतील
  • चालना वाढली.
  • प्रमेय समजावून घेण्यातील उत्सुकता वाढली.
  • विषयाची भीती कमी झाली.
  • कॉपीचे प्रमाण कमी झाले.
  • आकलनक्षमता व रुची वाढली.
टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षण