शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जलद न्यायासाठी

By admin | Updated: October 4, 2014 19:10 IST

देशात येत्या पाच वर्षांत १८00 जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. मात्र, ज्या कारणांमुळे निकाल प्रलंबित राहतात, त्या प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढल्यास खटले अधिक जलदगतीने निकाली निघतील व सरकारी तिजोरीवर ताणदेखील येणार नाही.

- अँड. प्रदीप घरत

 
न्यायदानाला फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी केंद्रीय विधी व न्याय विभागाने देशभरात १८00 फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तब्बल चार हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. पण सद्य:स्थितीतील सुनावणी न्यायालयाच्या मूळ प्रश्नांकडे सर्रास काणाडोळा केला जातोय, यावरही विचार करणे आवश्यक आहे. मुळात हे प्रश्न निकाली निघाले तर फास्ट ट्रॅक न्यायालयांपेक्षाही सध्याच्या सुनावणी न्यायालयात खटले अधिक जलदगतीने निकाली निघतील. 
खरे तर न्यायदान हे एक पवित्र कार्य आहे. म्हणून न्यायास विलंब म्हणजे न्यायास नकार असे म्हटले जाते. न्यायास होणार्‍या विलंबाचा प्रश्न वेगवेगळ्या माध्यमांतून चर्चेस येतो व यामागची कारणमीमांसा केली जाते. न्यायालयीन प्रक्रियेस होणार्‍या विलंबामुळे न्यायालयीन प्रक्रिया जलद कशी करता येईल, यासाठी होणार्‍या विचारमंथनातून जलदगती न्यायालय ही संकल्पना उदयास आली. विशेषत: डिसेंबर २0१२ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या निर्भया बलात्कार आणि खून खटल्यापासून जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली.
मात्र, यातील वास्तव तपासले तर वेगळे चित्र बघायला मिळते. अशी न्यायालये स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने न्यायालयीन आस्थापनेचे नियोजन करणार्‍या आणि न्यायालयास आवश्यक निधी उपलब्ध करून देणार्‍या अर्थ समितीस एक तपशीलवार सूचनापत्र पाठवले. वास्तविक १५३४ जलदगती न्यायालयांची स्थापना केंद्र सरकारने २000मध्येच केली होती.  
पाच वर्षांसाठी सदर न्यायालयांना आर्थिक निधी पुरवण्याची तरतूद पुढे २0११पर्यंत वाढवण्यात आली. प्रत्यक्षात मार्च २0१४ अखेरपर्यंत त्यांपैकी केवळ ९७६ जलदगती न्यायालये कार्यरत होती. ज्यामध्ये सर्वाधिक १७९ न्यायालये बिहारमध्ये, १५३ उत्तर प्रदेशमध्ये, ९२ महाराष्ट्रात व पश्‍चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात अनुक्रमे ८५ व ८४ न्यायालये कार्यरत होती.
ही आकडेवारी बघितली तर यातील मूलभूत प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष जात नाही. कारण केवळ जलदगती न्यायालये स्थापन केल्यानेच खटले जलदगतीने चालवले जातात का, जर जलदगती न्यायालयात खटले जलदगतीने चालू शकतात तर सामान्य न्यायालयात न्यायदानास होणार्‍या विलंबनाची कारणे काय... हेही तपासायला हवे.
मुळात माझ्या फौजदारी न्यायालयातील अनुभवावरून खटल्यांचा जलदगती निपटारा होण्यासाठी लागणारी मानसिकताच आपल्याकडे नाही. उदाहरणार्थ, बोलण्याची संधी दिल्याशिवाय निर्णय देऊ नये, हा पक्षकाराचा अधिकार आहे. पण त्याचा कोणी दुरुपयोग केला तर त्याला काय म्हणावे. तसेच दंडाधिकारी न्यायालयात काही खटले तर औपचारिक किंवा फारच थोड्या अगदी चार ते पाच साक्षीदारांचे असतात. अशा खटल्यांत आरोपीने दोषमुक्तीसाठी अर्ज केला तर तो तत्काळ निकाली निघायला हवा;पण प्रत्यक्षात तसे होत नाही. असे अर्ज दोन ते तीन वर्षे प्रलंबित राहतात.
याचे एक प्रचलित कारण म्हणजे न्यायाधीश व  सरकारी वकिलांची होणारी बदली. बदली झाल्यानंतर येणारा सरकारी वकील नव्याने त्या खटल्याचा व आरोपीच्या गुन्ह्यांचा अभ्यास करून अशा अर्जावर प्रत्युत्तर सादर करतो. तर न्यायाधीश बदल्यानंतर त्या खटल्याची नव्याने सुनावणी होते. यात अनेक दिवस जातात. याचे दुसरे कारण म्हणजे आरोपीची गैरहजेरी हेही आहे. आणि याची कारणेदेखील स्वतंत्र आहेत. पोलीस फौजेचे कमी मनुष्यबळ, वाहनांची कमतरता यामुळे सरकारी पक्षाला आरोपी हजर करता येत नाही आणि खटला आपोआपच प्रलंबित राहतो. पण याला व्हीडीओ कॉन्फरन्सचा पर्याय अगदी सहज, सोपा व कमी खर्चाचा आहे. याने आरोपीला थेट न्यायालयात हजर करता येते व आरोपी त्याची बाजूही मांडू शकतो. यासाठी विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयाची गरज नाही.
 याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर अब्दुल करीम तेलगी या आरोपीविरोधात चाललेला बहुचर्चित स्टॅम्प घोटाळ्याचा खटला व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच चालला. त्यामुळे फास्ट ट्रॅक न्यायालयापेक्षा या पर्यायाचा सखोल विचार करणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही.
तर खटले तुंबण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे न्यायालयात एकाच दिवशी शंभर ते दीडशे खटल्यांच्या सुनावणीचा बोर्ड लावला जातो. एवढय़ा खटल्यांची सुनावणी एका दिवसात शक्य नाही, हे संबंधितांना पक्के ज्ञात असते. तसेच खटल्यांचा पुकारा करण्यातच अर्धा दिवस जातो. या समस्येसोबतच न्यायाधीश व सरकारी वकिलांची कमतरता, न्यायालयातील पायाभूत सुविधांचा अभाव याचादेखील कोणी विचार करत नाही. 
तेव्हा या सर्व बाजूंचा विचार केला तर जलदगती न्यायालयांपेक्षा या प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढल्यास खटले अधिक जलदगतीने निकाली निघतील व याने सरकारी तिजोरीवर ताणदेखील येणार नाही, हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. 
(लेखक विधिज्ञ आहेत.)