शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सुषमा अंधारेंचं भाषण सुरू असतानाच अचानक वानराची एन्ट्री; पुढे काय घडलं? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 09:02 IST

भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुषमा अंधारे यांची संवाद यात्रा पोहचली असून त्याठिकाणी अंधारेंनी भाजपासह देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला.

मुंबई - शिवसेना उबाठा गटाची मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी संवाद यात्रा सुरू असून ही यात्रा भिवंडी लोकसभा मतदारसंघात पोहचली. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर निशाणा साधला. सुषमा अंधारे यांचे भाषण सुरू होते त्यावेळी अचानक एका वानराची एन्ट्री झाली. या वानराच्या करामती मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. 

या सभेत सुषमा अंधारे म्हणाल्या की, तपास यंत्रणाचा गैरवापर करून देशाची लोकशाही धोक्यात आणणाऱ्यांच्या विरोधात आम्ही उभे आहोत. निवडणूक लागली नाही, आचारसंहिता लागली नाही. महाराष्ट्राच्या कुठल्याही मतदारसंघात मी निवडणुकीला उभी नाही तरीही मी इथे आहे. कारण जर मी ठामपणे सांगते, कायदा माझ्या बापाने लिहिलाय, तर तो कायदा वाचवण्याची जबाबदारी माझी आहे. जे संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करतायेत त्यांच्याविरोधात मी उभी आहे. तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा. पण यावेळी कमळावर ठपका मारला तर २०२९ ला ठपका मारण्यासाठी निवडणूक असेल हे विसरून जा. इतक्या गलिच्छ पद्धतीचे राजकारण सुरू आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळता आला नाही, बाळासाहेब नव्हते म्हणून उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळण्यात अडचण आली असं काही बदमाश सांगतात हे बोलताना मागे उभे असणारा वानर थेट सुषमा अंधारे यांच्यासमोर येऊन बसला. तरीही अंधारे यांनी भाषण सुरू ठेवले. जनतेने हे नीट समजून घ्यावे, जे म्हणतात, बाळासाहेब नव्हते म्हणून ही घटना घडली हे वाक्य म्हटलं, पण वानरामुळे सभेत काही काळ गोंधळ उडाला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आणून दिली केळी अंधारे यांनी व्यासपीठाखाली फेकली. मात्र तरीही वानराने अंधारेंच्या दिशेने उडी मारली. तेव्हा सुषमा अंधारे स्वत:ला वाचवलं त्यानंतर पुन्हा भाषणाला सुरुवात केली. 

दरम्यान, बाळासाहेब हयात नाही म्हणून तुम्ही पक्ष ताब्यात घेतला असं काहींचे म्हणणं असेल मग शरद पवार हयात असताना शरद पवारांचा पक्ष कसा काय गेला? जो पक्ष शरद पवारांनी घडवला, वाढवला त्यांचाही पक्ष भाजपा ताब्यात घेते. समान प्रक्रिया वापरली जाते. या सर्व गोष्टीवरून एकच स्पष्ट होते की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेता नाही. व्हिजन नसलेले नेते फडणवीसांकडे आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडेंचे राजकारण ज्यांनी संपवले ते बावनकुळेंचे राजकारण संपवायलाही मागे पुढे बघणार नाही. कारण त्यांच्याही लक्षात आलंय फडणवीस यांनी फक्त महाराष्ट्राचे नाही भाजपाचेही नुकसान केले आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेBJPभाजपा