शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

सुषमा अंधारेंचं भाषण सुरू असतानाच अचानक वानराची एन्ट्री; पुढे काय घडलं? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 09:02 IST

भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुषमा अंधारे यांची संवाद यात्रा पोहचली असून त्याठिकाणी अंधारेंनी भाजपासह देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला.

मुंबई - शिवसेना उबाठा गटाची मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी संवाद यात्रा सुरू असून ही यात्रा भिवंडी लोकसभा मतदारसंघात पोहचली. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर निशाणा साधला. सुषमा अंधारे यांचे भाषण सुरू होते त्यावेळी अचानक एका वानराची एन्ट्री झाली. या वानराच्या करामती मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. 

या सभेत सुषमा अंधारे म्हणाल्या की, तपास यंत्रणाचा गैरवापर करून देशाची लोकशाही धोक्यात आणणाऱ्यांच्या विरोधात आम्ही उभे आहोत. निवडणूक लागली नाही, आचारसंहिता लागली नाही. महाराष्ट्राच्या कुठल्याही मतदारसंघात मी निवडणुकीला उभी नाही तरीही मी इथे आहे. कारण जर मी ठामपणे सांगते, कायदा माझ्या बापाने लिहिलाय, तर तो कायदा वाचवण्याची जबाबदारी माझी आहे. जे संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करतायेत त्यांच्याविरोधात मी उभी आहे. तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा. पण यावेळी कमळावर ठपका मारला तर २०२९ ला ठपका मारण्यासाठी निवडणूक असेल हे विसरून जा. इतक्या गलिच्छ पद्धतीचे राजकारण सुरू आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळता आला नाही, बाळासाहेब नव्हते म्हणून उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळण्यात अडचण आली असं काही बदमाश सांगतात हे बोलताना मागे उभे असणारा वानर थेट सुषमा अंधारे यांच्यासमोर येऊन बसला. तरीही अंधारे यांनी भाषण सुरू ठेवले. जनतेने हे नीट समजून घ्यावे, जे म्हणतात, बाळासाहेब नव्हते म्हणून ही घटना घडली हे वाक्य म्हटलं, पण वानरामुळे सभेत काही काळ गोंधळ उडाला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आणून दिली केळी अंधारे यांनी व्यासपीठाखाली फेकली. मात्र तरीही वानराने अंधारेंच्या दिशेने उडी मारली. तेव्हा सुषमा अंधारे स्वत:ला वाचवलं त्यानंतर पुन्हा भाषणाला सुरुवात केली. 

दरम्यान, बाळासाहेब हयात नाही म्हणून तुम्ही पक्ष ताब्यात घेतला असं काहींचे म्हणणं असेल मग शरद पवार हयात असताना शरद पवारांचा पक्ष कसा काय गेला? जो पक्ष शरद पवारांनी घडवला, वाढवला त्यांचाही पक्ष भाजपा ताब्यात घेते. समान प्रक्रिया वापरली जाते. या सर्व गोष्टीवरून एकच स्पष्ट होते की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेता नाही. व्हिजन नसलेले नेते फडणवीसांकडे आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडेंचे राजकारण ज्यांनी संपवले ते बावनकुळेंचे राजकारण संपवायलाही मागे पुढे बघणार नाही. कारण त्यांच्याही लक्षात आलंय फडणवीस यांनी फक्त महाराष्ट्राचे नाही भाजपाचेही नुकसान केले आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेBJPभाजपा