शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

सुषमा अंधारेंचं भाषण सुरू असतानाच अचानक वानराची एन्ट्री; पुढे काय घडलं? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 09:02 IST

भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुषमा अंधारे यांची संवाद यात्रा पोहचली असून त्याठिकाणी अंधारेंनी भाजपासह देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला.

मुंबई - शिवसेना उबाठा गटाची मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी संवाद यात्रा सुरू असून ही यात्रा भिवंडी लोकसभा मतदारसंघात पोहचली. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर निशाणा साधला. सुषमा अंधारे यांचे भाषण सुरू होते त्यावेळी अचानक एका वानराची एन्ट्री झाली. या वानराच्या करामती मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. 

या सभेत सुषमा अंधारे म्हणाल्या की, तपास यंत्रणाचा गैरवापर करून देशाची लोकशाही धोक्यात आणणाऱ्यांच्या विरोधात आम्ही उभे आहोत. निवडणूक लागली नाही, आचारसंहिता लागली नाही. महाराष्ट्राच्या कुठल्याही मतदारसंघात मी निवडणुकीला उभी नाही तरीही मी इथे आहे. कारण जर मी ठामपणे सांगते, कायदा माझ्या बापाने लिहिलाय, तर तो कायदा वाचवण्याची जबाबदारी माझी आहे. जे संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करतायेत त्यांच्याविरोधात मी उभी आहे. तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा. पण यावेळी कमळावर ठपका मारला तर २०२९ ला ठपका मारण्यासाठी निवडणूक असेल हे विसरून जा. इतक्या गलिच्छ पद्धतीचे राजकारण सुरू आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळता आला नाही, बाळासाहेब नव्हते म्हणून उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळण्यात अडचण आली असं काही बदमाश सांगतात हे बोलताना मागे उभे असणारा वानर थेट सुषमा अंधारे यांच्यासमोर येऊन बसला. तरीही अंधारे यांनी भाषण सुरू ठेवले. जनतेने हे नीट समजून घ्यावे, जे म्हणतात, बाळासाहेब नव्हते म्हणून ही घटना घडली हे वाक्य म्हटलं, पण वानरामुळे सभेत काही काळ गोंधळ उडाला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आणून दिली केळी अंधारे यांनी व्यासपीठाखाली फेकली. मात्र तरीही वानराने अंधारेंच्या दिशेने उडी मारली. तेव्हा सुषमा अंधारे स्वत:ला वाचवलं त्यानंतर पुन्हा भाषणाला सुरुवात केली. 

दरम्यान, बाळासाहेब हयात नाही म्हणून तुम्ही पक्ष ताब्यात घेतला असं काहींचे म्हणणं असेल मग शरद पवार हयात असताना शरद पवारांचा पक्ष कसा काय गेला? जो पक्ष शरद पवारांनी घडवला, वाढवला त्यांचाही पक्ष भाजपा ताब्यात घेते. समान प्रक्रिया वापरली जाते. या सर्व गोष्टीवरून एकच स्पष्ट होते की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेता नाही. व्हिजन नसलेले नेते फडणवीसांकडे आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडेंचे राजकारण ज्यांनी संपवले ते बावनकुळेंचे राजकारण संपवायलाही मागे पुढे बघणार नाही. कारण त्यांच्याही लक्षात आलंय फडणवीस यांनी फक्त महाराष्ट्राचे नाही भाजपाचेही नुकसान केले आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेBJPभाजपा