शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वाराणशीत ‘आप’का क्या होगा?

By admin | Updated: May 11, 2014 00:37 IST

साधनसामुग्री नाही आणि महत्वाचे म्हणजे जाती धर्माच्या नावावर मिळणारा हक्काचा मतदार नाही. अशा वेळी केजरीवाल निवडून येतील तरी कसे ? हा प्रश्न आहे.

गजानन जानभोर - वाराणशी
परिश्रम, प्रामाणिक कार्यकर्त्यांची सोबत, सामान्यांतून सामान्य माणसापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न, मतदारांच्या थेट हृदयात हात घालणारा संवाद एवढय़ा जमेच्या बाजू असुनही अरविंद केजरीवाल वाराणशीच्या रणांगणात बाजी मारतीलच, याची शाश्‍वती देता येत नाही.  कारण, फारसा निधी नाही, संघटित कार्यकर्त्यांची फळी नाही, साधनसामुग्री नाही आणि महत्वाचे म्हणजे जाती धर्माच्या नावावर मिळणारा हक्काचा मतदार नाही. अशा वेळी केजरीवाल निवडून येतील तरी कसे ? हा प्रश्न आहे. 
नरेंद्र मोदी यांनाच निवडून द्यायचे या निष्कर्षाप्रत वाराणशीची जनता येऊन पोहोचली आहे, असा दावा भाजपा करत आहे. सुरुवातीला मोदींपुढे अडथळ्यांचे अनेक घाट होते. पण हळुहळू ते पूर्ण करण्यात मोदींना यश आले. वाराणशीची हवा आता त्यांच्यासाठी अनुकूल झाली आहे, असे मोदी सर्मथकांचे म्हणणे आहे. अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणशीच्या लढाईत उतरून ही निवडणूक देशभरात चर्चेला आणली. केजरीवाल मोदींच्या विरोधात येथून उभे राहिले नसते तर या निवडणुकीची एवढी चर्चाही झाली नसती ही वस्तुस्थिती आहे. 
नेत्यांच्या सभांना, रोड शो ला उसळणार्‍या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होत नाही. हा निवडणुकांमधील सार्वत्रिक अनुभव आहे. केजरीवालांच्या सभांना, रोड शो ला लोक गर्दी करतात. त्यात उत्सुकता असते, शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याची भावनाही असते.  ‘यावेळी आपल्याला बदल हवा आहे, असे सार्‍यांना सांगणारा सामान्य माणूस आपली बांधिलकी सिद्ध करण्यासाठी, स्वत:च्या मनाला बजावून सांगण्यासाठी केजरीवालांच्या नुक्कड सभेला उपस्थिती लावतो, पांढरी टोपी घालून फिरण्यात त्याला कमालीचा आनंदही मिळतो. ‘मी प्रामाणिक आहे आणि चांगल्या माणसाच्या पाठीशी उभा आहे’ हे त्याला सुचवायचे असते. आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी पाच वर्षांतून एकदाच मिळणारी संधी तो सोडणार तरी कसा? पण मतदान करताना त्याची जात आणि धर्म आड येतो. आपले मत वाया तर जाणार नाही ना? असा नफ्या-तोट्याचा व्यवहार त्यात असतो. लाटेचा, अस्मितेचा, नातेसंबंधांचा त्याच्यावर एवढा दबाव असतो की, मतदान करताना तो व्यवहारच बघतो. केजरीवालांच्या बाबतीत वाराणशीत नेमके हेच होत आहे. 
या निवडणुकीत वाराणशीत ‘छतसभा’ हा एक आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळाला. दाटीवाटीच्या मोहल्ल्यात नुक्कड सभाही घेता येत नाही. अशा ठिकाणी केजरीवालांच्या कार्यकर्त्यांनी घरावरच्या छतांवर सभा घेतल्या. हे काँग्रेस आणि भाजपवाल्यांनाही जमले नाही. वाराणशीच्या मुख्य रस्त्यांवर आणि चौकात हातात झाडू घेतलेले तरुण तासनतास उभे असल्याचे दिसतात. ते कुणाशी बोलत नाहीत. भाषणही देत नाहीत. ते फक्त शांत उभे असतात. रस्त्याने जाणार्‍या येणार्‍यांचे लक्ष गेले की, झाडूकडे लक्ष वेधून नमस्कार करतात. दरवेळी धार्मिक, जातीय अस्मितेभोवतीच गुरफटणार्‍या वाराणशीकरांना यावेळी प्रथमच त्यांच्या प्रश्नांची, समस्यांची जाणीव करून देण्यात आली. याचे श्रेय कुणाला आवडो न आवडो पण ते केजरीवालांनाच द्यावे लागेल. वाराणशीचे दुखणे, गार्‍हाणे प्रथमच या निमित्ताने सार्‍या जगासमोर आले. 
 
वाराणशीचा एक वेगळा स्वभाव आहे. ती आपला स्वभाव कधीच बदलत नाही. ‘परिवर्तन’ हवे पण ‘क्रांती’ नको, असे या स्वभावाचे वर्णन करता येईल. मोदींच्या रुपाने ते परिवर्तन होईल, पण केजरीवालांच्या रुपाने क्रांती करायला ही नगरी धजावणार नाही.
 
केजरीवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांना मिळालेला पाठिंबा आणि शुक्रवारच्या रोड शोमध्ये उसळलेला जनसमुदाय बघितल्यानंतर केजरीवाल शंभर टक्के निवडून यायला हवेत. पण तसे होणार नाही. याचे कारण असे की, वाराणशीच्या मतदारांनी कौल कुणाला द्यायचा हे ठरवून टाकले आहे. प्रेम, सहानुभूती केजरीवालांबद्दल परंतु मत मोदींनाच असा हा वाराणशीकरांचा हिशेब आहे.