शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: ...ही काय पद्धत झाली का? शिंदे-फडणवीसांना हे पटतं का? त्या मुद्द्यावरून अजित पवार संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 17:20 IST

Ajit Pawar Criticize Shinde Government: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांबाबत अजित पवार यांनी संताप व्यक्त  केला आहे.

मुंबई - राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांबाबत अजित पवार यांनी संताप व्यक्त  केला आहे.  तसेच राजकारण करताना संस्कार कसे झाले पाहिजेत, हे शिकवणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी घडवलेल्या महाराष्ट्रात तोडा, फोडा, मारा अशा भाषेत धमक्या दिल्या जात आहेत. ही बाब एकनाथ शिंदे यांना पटते का, देवेंद्र फडणवीसांना पटतं, भाजपाला पटतं का, अशी विचारणा अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार म्हणाले की, हे सरकार येऊन काही दिवस झाले आहेत. असं असाताना यांच्यातील काही आमदार हे महाराष्ट्रात संघर्ष पेटेल, अशी भाषा बोलताहेत. शिवसैनिकांना ठोकून काढा. हात तोडा, हात तोडता आले नाही तर तंगड्या तोडा, आरे ला कारे म्हणा, कोथळा काढा, अरे ही काय पद्धत झाली का. कुठे शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र, आपले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ज्यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला. ज्यांनी नेहमी काम करताना राजकारण करताना संस्कार कसे झाले पाहिजेत, हे शिकवणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी घडवलेल्या महाराष्ट्रात तोडा, फोडा, मारा ही पद्धत, ही बाब एकनाथ शिंदे यांना पटते का, देवेंद्र फडणवीसांना पटतं, भाजपाला पटतं का, असा सवाल अजित पावर यांनी उपस्थित केलाय.

अजित पवार पुढे म्हणाले की, शिंदे गटाच्या एका बहाद्दर आमदाराने सरकराच्या कर्मचाऱ्याला मारलं. म्हणजे तुम्ही कायदा हाती घेऊ लागला आहात. सत्ता आली म्हणजे मस्ती आली आहे का तुम्हाला. शेवटी कुणीही व्यक्ती असली तरी तिला कायदा नियम सारखे आहेत. कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कुणीही मोठा नाही. या पद्धतीची भाषा अजून सुरुवात झाली नाही, एवढी मस्ती कशी आली आहे. यांना दोन गोष्टी समवजावून सांगण्याचं काम संबंधितांचं नाही का. महाराष्ट्र हे उघड्या डोळ्यांनी बघतोय. १५ ऑगस्ट रोजी एक आमदार अशी भाषा करतोय, तीही मुंबईसारख्या ठिकाणी. मग चांद्यापासून बांद्यापर्यंत सामन्य माणसांची अवस्था काय होईल, असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.   

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना