शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:47 IST

MNS Avinash Jadhav News: आमच्या मोर्चाला सरकारकडून विरोध होता. मराठी माणूस एकवटला आणि मोर्चा निघाला. मीरा रोड येथे जे काही झाले, ते सगळ्या महाराष्ट्राने, देशाने पाहिले, असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

MNS Avinash Jadhav News: परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाविरोधात मराठी भाषिकांकडून मीरारोडमध्ये मोर्चाची हाक देण्यात आली. या मोर्चात मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समितीसह विविध मराठी भाषिक संघटना रस्त्यावर उतरणार होत्या. मात्र या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. त्याशिवाय मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेकांना नोटीस बजावल्या होत्या. १० वाजता मोर्चा स्थळी कार्यकर्ते जमू लागले तेव्हा पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू झाली. त्यातूनच मीरारोडमध्ये संघर्ष वाढला. या सर्व विरोधाला झुगारून मराठी माणसांनी मोठ्या संख्येने मोर्चाला हजेरी लावली. मनसे नेते अविनाश जाधव यांना मध्यरात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ११ तासांत नेमके काय-काय घडले, याबाबत अविनाश जाधव यांनी माहिती दिली. 

पोलिसांनी कितीही अडवले तरी मोर्चा होणारच असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. पोलिसांनी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला परंतु मोर्चातील लोकांच्या संख्येमुळे त्यांना अडवणे अशक्य झाले. या मोर्चात मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते यांनी हजेरी लावली. मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अभिजित पानसे या मोर्चात सामील झाले होते. तत्पूर्वी, पोलिसांनी अविनाश जाधव यांना नोटीस बजावली होती. पण, ते मोर्चामध्ये जाण्यास ठाम असल्यानंतर पहाटे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी अविनाश जाधव यांना मंगळवारी पहाटे ३ वाजता त्यांच्या घरी जाऊन ताब्यात घेतले. त्यानंतर अविनाश जाधव यांना काशिमीरा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. 

व्यापारी विना परवानगी मोर्चा काढू शकतात, तर आम्ही भूमिपूत्र आहोत

पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले. जवळजवळ दीड ते दोन हजार महाराष्ट्र सैनिकांना ताब्यात घेण्यात आले होते. खरेतर याची गरज नव्हती. व्यापारी विना परवानगी मोर्चा काढू शकतात, तर आम्ही भूमिपूत्र आहोत. आम्ही महाराष्ट्रातील आहोत, मीरा भाईंदर महाराष्ट्रात आहे, मग आम्हाला मोर्चाची परवानगी द्यायला काय अडचण होती. पोलिसांकडून सांगण्यात येत आहे की, या मार्गाने नको, त्या मार्गाने मोर्चा काढा. पण पोलीस आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याशी असे बोलले नाहीत, पोलीस चुकीची माहिती देत आहेत, असा आरोप अविनाश जाधव यांनी मीडियाशी बोलताना केला. 

आमच्या मोर्चाला सरकारकडूनच विरोध

आमच्या मोर्चाला सरकारकडून विरोध होता. स्थानिक आमदार आणि गृहखात्याने मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. मराठी माणूस एकवटला आणि मोर्चा निघाला. मीरा भाईंदरमध्ये ७ ते ८ तास जे चालले ते महाराष्ट्राने पाहिले, देशाने पाहिले, असे अविनाश जाधव म्हणाले. अविनाश जाधव यांना पोलिसांनी ११ तासांनी सोडल्याचे म्हटले जात आहे. 

पोलीस अधिकारी म्हणतात की माझ्यावर दबाव आहे

माझ्या घरी सकाळी पोलीस आल्यानंतर माझा पोलिसांना पहिला प्रश्न होता की, मराठी माणसांचा हा मोर्चा आहे, अधिवेशन चालू असताना तुम्ही मला घेऊन जात आहात, या मोर्चाला विरोध करत आहात मग हे सरकारच्या विरोधात जाईल, असे तुम्हाला वाटत नाही का? तेव्हा पोलीस अधिकारी म्हणतात की माझ्यावर दबाव आहे, असा दावा अविनाश जाधव यांनी केला.

दरम्यान, मीरा रोड येथील मोर्चाला मंत्री प्रताप सरनाईक गेले होते. या मोर्चात प्रताप सरनाईक पोहोचले, तेव्हा मोठ्या संख्येने त्यांना विरोधाला सामना करावा लागला. त्यांनी निघून जावे, अशी घोषणाबाजी संतप्त कार्यकर्त्यांनी केली. परंतु काही लोक या मोर्चात राजकारण करत आहेत, असा आरोप मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. ठाकरे गट आणि मनसेचे हे राजकारण सुरूच राहणार आहे. मी मीरा-भाईंदरमधील लोकांसोबत राहणार आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले. मी मंत्री, आमदार नंतर आहे, आधी मराठी आहे, अशी स्पष्ट भूमिका मंत्री सरनाईक यांनी मांडली. 

 

टॅग्स :MNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवmira roadमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदरShiv Senaशिवसेनाmarathiमराठीhindiहिंदी