शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:47 IST

MNS Avinash Jadhav News: आमच्या मोर्चाला सरकारकडून विरोध होता. मराठी माणूस एकवटला आणि मोर्चा निघाला. मीरा रोड येथे जे काही झाले, ते सगळ्या महाराष्ट्राने, देशाने पाहिले, असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

MNS Avinash Jadhav News: परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाविरोधात मराठी भाषिकांकडून मीरारोडमध्ये मोर्चाची हाक देण्यात आली. या मोर्चात मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समितीसह विविध मराठी भाषिक संघटना रस्त्यावर उतरणार होत्या. मात्र या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. त्याशिवाय मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेकांना नोटीस बजावल्या होत्या. १० वाजता मोर्चा स्थळी कार्यकर्ते जमू लागले तेव्हा पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू झाली. त्यातूनच मीरारोडमध्ये संघर्ष वाढला. या सर्व विरोधाला झुगारून मराठी माणसांनी मोठ्या संख्येने मोर्चाला हजेरी लावली. मनसे नेते अविनाश जाधव यांना मध्यरात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ११ तासांत नेमके काय-काय घडले, याबाबत अविनाश जाधव यांनी माहिती दिली. 

पोलिसांनी कितीही अडवले तरी मोर्चा होणारच असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. पोलिसांनी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला परंतु मोर्चातील लोकांच्या संख्येमुळे त्यांना अडवणे अशक्य झाले. या मोर्चात मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते यांनी हजेरी लावली. मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अभिजित पानसे या मोर्चात सामील झाले होते. तत्पूर्वी, पोलिसांनी अविनाश जाधव यांना नोटीस बजावली होती. पण, ते मोर्चामध्ये जाण्यास ठाम असल्यानंतर पहाटे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी अविनाश जाधव यांना मंगळवारी पहाटे ३ वाजता त्यांच्या घरी जाऊन ताब्यात घेतले. त्यानंतर अविनाश जाधव यांना काशिमीरा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. 

व्यापारी विना परवानगी मोर्चा काढू शकतात, तर आम्ही भूमिपूत्र आहोत

पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले. जवळजवळ दीड ते दोन हजार महाराष्ट्र सैनिकांना ताब्यात घेण्यात आले होते. खरेतर याची गरज नव्हती. व्यापारी विना परवानगी मोर्चा काढू शकतात, तर आम्ही भूमिपूत्र आहोत. आम्ही महाराष्ट्रातील आहोत, मीरा भाईंदर महाराष्ट्रात आहे, मग आम्हाला मोर्चाची परवानगी द्यायला काय अडचण होती. पोलिसांकडून सांगण्यात येत आहे की, या मार्गाने नको, त्या मार्गाने मोर्चा काढा. पण पोलीस आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याशी असे बोलले नाहीत, पोलीस चुकीची माहिती देत आहेत, असा आरोप अविनाश जाधव यांनी मीडियाशी बोलताना केला. 

आमच्या मोर्चाला सरकारकडूनच विरोध

आमच्या मोर्चाला सरकारकडून विरोध होता. स्थानिक आमदार आणि गृहखात्याने मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. मराठी माणूस एकवटला आणि मोर्चा निघाला. मीरा भाईंदरमध्ये ७ ते ८ तास जे चालले ते महाराष्ट्राने पाहिले, देशाने पाहिले, असे अविनाश जाधव म्हणाले. अविनाश जाधव यांना पोलिसांनी ११ तासांनी सोडल्याचे म्हटले जात आहे. 

पोलीस अधिकारी म्हणतात की माझ्यावर दबाव आहे

माझ्या घरी सकाळी पोलीस आल्यानंतर माझा पोलिसांना पहिला प्रश्न होता की, मराठी माणसांचा हा मोर्चा आहे, अधिवेशन चालू असताना तुम्ही मला घेऊन जात आहात, या मोर्चाला विरोध करत आहात मग हे सरकारच्या विरोधात जाईल, असे तुम्हाला वाटत नाही का? तेव्हा पोलीस अधिकारी म्हणतात की माझ्यावर दबाव आहे, असा दावा अविनाश जाधव यांनी केला.

दरम्यान, मीरा रोड येथील मोर्चाला मंत्री प्रताप सरनाईक गेले होते. या मोर्चात प्रताप सरनाईक पोहोचले, तेव्हा मोठ्या संख्येने त्यांना विरोधाला सामना करावा लागला. त्यांनी निघून जावे, अशी घोषणाबाजी संतप्त कार्यकर्त्यांनी केली. परंतु काही लोक या मोर्चात राजकारण करत आहेत, असा आरोप मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. ठाकरे गट आणि मनसेचे हे राजकारण सुरूच राहणार आहे. मी मीरा-भाईंदरमधील लोकांसोबत राहणार आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले. मी मंत्री, आमदार नंतर आहे, आधी मराठी आहे, अशी स्पष्ट भूमिका मंत्री सरनाईक यांनी मांडली. 

 

टॅग्स :MNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवmira roadमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदरShiv Senaशिवसेनाmarathiमराठीhindiहिंदी