शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसाय कराच्या चौदा हजार कोटींचे महाराष्ट्र सरकारने केले तरी काय?  माहिती अधिकारातून उघड झाली धक्कादायक माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 22:15 IST

राज्यात व्यवसाय कर संकलन विक्रीकर विभागामार्फत करण्यात येते. मात्र, जमा झालेल्या या भल्या मोठ्या रकमेचा विनियोग रोजगार हमी योजनेसाठी करणेच आवश्यक असताना तो नेमका कसा  केला याची माहितीच सरकारकडे उपलब्ध नाही.

मुंबई -  महाराष्ट्र राज्यात गेल्या सात वर्षात व्यवसाय कराच्या माध्यमातून १४,०४७ कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. राज्यात व्यवसाय कर संकलन विक्रीकर विभागामार्फत करण्यात येते. मात्र, जमा झालेल्या या भल्या मोठ्या रकमेचा विनियोग रोजगार हमी योजनेसाठी करणेच आवश्यक असताना तो नेमका कसा  केला याची माहितीच सरकारकडे उपलब्ध नाही.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात लागू केलेल्या व्यवसाय कराची माहिती मागितली होती. वित्त विभागाने अनिल गलगली यांस कळविले की राज्यात व्यवसाय कराचं संकलन विक्रीकर विभागाच्या मार्फत करण्यात येते. गेल्या 7 वर्षात महाराष्ट्र राज्यात 14047 कोटींचा व्यवसाय कर जमा झाला आहे.

2010-11             1683.16 कोटी

2011-12           1768.01 कोटी  

2012-13            1817.22 कोटी

2013-14             2146.68 कोटी

2014-15             2166.34 कोटी

2015-16             2169.13 कोटी

2016-17             2295.92 कोटी

सात वर्षात          14047 कोटी

व्यवसाय कराची जमा झालेली रक्कम कोणत्या कामासाठी वापरली, याबाबत अनिल गलगली यांनी माहिती विचारली होती. याबाबत गलगली यांना सरकारने  कळविले आहे की व्यवसाय कर हा राज्याच्या एकत्रित निधीमध्ये जमा होतो. एकत्रित निधीत जमा झालेली रक्कम विविध कामासाठी वापरली जाते त्यामुळे व्यवसाय करामधून जमा झालेली रक्कम नेमकी कोणत्या कामासाठी वापरली गेली   अशी स्वतंत्रपणे माहिती देता येणार नाही. अनिल गलगली यांच्या मते हा निधी रोजगार हमी योजनेसाठी खर्च करणे आवश्यक असताना एकत्रित निधीत जमा करणे गैर आहे. सरकारने याबाबत सर्व माहिती उघड करणे आवश्यक आहे.

श्रमजिवी संघटनेचे नेते माजी आमदार विवेक पंडित यांनी सरकार व्यवसाय कराच्या रकमेचा अप्रत्यक्ष गैरवापरच करत असल्याचं मत व्यक्त केले. त्यांनी लोकमत ऑनलाइनशी बोलताना मुळात ज्या उद्देशाने कर आकारणी सुरु झाली त्या उद्देशासाठीच जमा झालेल्या रकमेचा विनियोग होणं आवश्यक असतं. मात्र आम्हीही प्रयत्न केला तरी माहिती मिळाली नव्हती असंही ते म्हणाले.

रोजगार हमीसाठी व्यवसाय कर   

महाराष्ट्रात १९७२मध्ये रोजगार हमी योजना सुरु करण्यात आली. ही योजना राबवण्यासाठी निधी जमवण्यासाठी संघटित क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांवर कर लावून पैसा जमा केला गेला. व्यवसाय करातून जेवढा निधी संकलित होईल तेवढाच निधी सरकार स्वत:चा वाटा उचलेल आणि रोजगार हमी योजना राबवली जावी असा उद्देश होता. बदलत्या काळानुसार रोजगार हमीची कामे कमी होत गेली. स्वाभाविकच खर्चही कमी झाला. मात्र त्याचवेळी काळानुरुप पगार वाढत गेल्याने व्यवसाय करातून संकलित होणारा निधी मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत गेला. मधील काळात सरकारने आपला वाटा देणेही बंद केले. आता नेमकी काय स्थिती आहे ते स्पष्ट होत नाही.

टॅग्स :Employeeकर्मचारीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार