शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

आपण काय करू शकतो़

By admin | Updated: October 4, 2015 01:22 IST

जागतिक बँकेने केलेल्या व्यापारविषयक पाहणीचे निष्कर्ष काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले. व्यापार-उद्योगविषयक ९८ सुधारणांची अंमलबजावणी करण्याबाबतची ही पाहणी होती.

- सतीश रानडे (लेखक हे अर्थतज्ज्ञ आहेत.)जागतिक बँकेने केलेल्या व्यापारविषयक पाहणीचे निष्कर्ष काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले. व्यापार-उद्योगविषयक ९८ सुधारणांची अंमलबजावणी करण्याबाबतची ही पाहणी होती. हे निष्कर्ष आपल्या भारतीयांना व महाराष्ट्राला भूषणावह नाहीत. १८९ देशांच्या क्रमवारीत आपला १२५ कोटी लोकसंख्या असलेला देश १४२ क्र मांकावर आहे. ११ कोटी लोकसंख्या असलेला आपला महाराष्ट्र देशात ३२ राज्यांमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेचे सकल राष्ट्रीय उत्पन्न १७ बि. डॉलर, चीनचे १0 बि. डॉलर तर भारताचे फक्त २ बि. डॉलर इतके आहे. महाराष्ट्राचे दरडोई वार्षिक सकल उत्पन्न अंदाजे फक्त दोन लाख रुपये आहे, ही विचार करायला लावणारी परिस्थिती आहे.आपला देश व आपले राज्य दुष्काळ, पायाभूत सुविधांचा अभाव, शिक्षणाची दुरवस्था, धार्मिक पगडा, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, राजकीय अनास्था, भोगवादाचा बेगडीपणा, वैयक्तिक शिस्तीचा अभाव, जातीव्यवस्था, विषमता, पर्यावरणाचा ऱ्हास अशा अनेक प्रकारच्या समस्यांमध्ये अडकून पडला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा काही मोजक्या शहरांत झालेले लोकसंख्येचे ध्रुवीकरण व तथाकथित समृद्धी ही प्रगती नसून सूज असल्याचे लक्षात येते. संस्कार, नीती वगैरेंची समृद्ध परंपरा असलेल्या आपल्या देशात स्वच्छतेसाठी पंतप्रधानांना पुढाकार घ्यावा लागतो. ही वैयक्तिक जबाबदारी व कर्तव्य नाही का? अशावेळी काही गोष्टी आपोआप घडतील, त्याची वाट दैववादी पद्धतीने बघत बसण्यापेक्षा प्रत्येकाने स्वत: जबाबदारी घेऊन नवीन उद्यमशीलता अमलात आणण्याची गरज आहे. जमेची बाजू म्हणजे ४३ टक्के लोकसंख्या २0 ते ५0 या तरुण व क्रि याशील वयातील आहे. आपणा सर्वांना सर्व सुखसोयी हव्या आहेत, त्यासाठी काम मात्र आपल्यालाच करायला हवे. अनेक वर्षे नोकरी शोधत बसण्यापेक्षा नवीन उद्योग, कल्पनाशक्ती, जोखीम घेण्याची तयारी या गुणांचा वापर करून देशातच असलेल्या १२५ कोटी एवढ्या प्रचंड मागणीला पुरवता येईल अशी उत्पादने व सेवा निर्माण करण्याची संधी प्रत्येकाला आहे. परकीय कंपन्या येथे येऊन आपल्याकडील प्रचंड मागणीचा फायदा घेतात आणि आपण मात्र त्या कंपनीत नोकरी करण्यात धन्यता मानतो. विचार करा, भारताचा विकासदर ७.५ टक्के आहे, तर अमेरिकेचा ३.१ टक्के आहे. मग कुठे आहेत जास्त संधी व कोण त्याचा फायदा घेतंय? वेगवान बदलाची राजकीय इच्छाशक्ती जरी क्षीण असली तरी जास्तीत जास्त जनता त्यांच्या वैयक्तिक इच्छाशक्तीने चमत्कार घडवू शकते. केवळ सरकारवर अवलंबून राहण्यात कोणतेही शहाणपण नाही. गंमत पाहा की ३0 - ४0 वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्राची/भारताची औद्योगिक प्रगती इंजिनीअरिंग कॉलेजेस कमी असताना झाली. आज ज्या प्रमाणात इंजिनीअरिंग व इतर शैक्षणिक संस्था वाढल्या आहेत, त्या प्रमाणात औद्योगिक व आर्थिक प्रगती झाली आहे का?आपण सगळ््यांनी नवनवीन कल्पना, तंत्रज्ञान, धाडस, पारदर्शकता, उद्योगशीलता, सहकार्याची भावना अंगीकारून व्यक्ती व समाजाचा विकास घडविण्याची गरज आहे, त्यासाठी अमाप संधी उपलब्ध आहेत. चांगल्या, नैतिक व समाजोपयोगी कल्पनेला प्रत्यक्षात आणायला आज कोणत्याही साधनांची कमतरता नाही. गरज आहे ती सर्व क्षेत्रांत पुढाकार घेऊन व्यवसाय करण्याची जिद्द दाखविण्याची. आपल्याकडे काय नाही याचा पाढा वाचण्यापेक्षा, जे आहे त्याचा सर्वोत्तम वापर करून नवनिर्मिती करण्यातच आपले व देशाचे आर्थिक हित आहे.