शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

वैद्यकीय कोटा वाढवून मराठा आरक्षणावर तोडगा काढावा - मराठा महासंघाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 12:47 IST

मराठा आरक्षणाचा निर्णय राबवण्यात पेचप्रसंग निर्माण झाला आहे...

ठळक मुद्देआरक्षणाचा प्रस्तावित कोटा यंदाच्या प्रवेश प्रक्रियेला लागू होणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेशमराठा आरक्षणावरुन राज्यात पुन्हा एकदा वादाची स्थिती

पुणे : यंदाच्या शैक्षणिक सत्रात खुल्या किंवा एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहू नयेत यासाठी या वर्गातील विद्यार्थ्यांच्या संख्येएवढ्या  जागा इंडियन मेडिकल कौन्सिल आणि संबंधित संस्थांची परवानगी घेऊन वाढवाव्यात, असा तोडगा अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी सुचवला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय राबवण्यात पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यापुर्वीच वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याचे निरीक्षण नोंदवीत या आरक्षणाचा प्रस्तावित कोटा यंदाच्या प्रवेश प्रक्रियेला लागू होणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. राज्याची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यासही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणावरुन राज्यात पुन्हा एकदा वादाची स्थिती उद्भवली आहे.याप्रश्नी वैधानिक मार्ग काढणे शक्य असल्याचे कोंढरे म्हणाले. त्यांनी सांगितले, की नीटची प्रक्रिया आधी सुरु झाली असली तरी राज्याची प्रक्रिया फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु झाली आणि त्यात एसईबीसी आरक्षणाचा निर्णय लागू करण्यात आला. कारण एसईबीसी कायदा आॅक्टोबर 2018 मध्येच राज्यात लागू झाला. त्यामुळे यंदाच्या वर्षी एसईबीसीच्या जागांचा कोटा राहणार नाही, असे मराठा आरक्षण विरोधकांचे मत असले तर एसईबीसीनंतर म्हणजे जानेवारी 2019 मध्ये केंद्रात आणि १२ फेब्रुवारीपासून राज्यात ईड्ब्लूएस आरक्षण लागू करण्यात आले आहे, हेही त्यांनी ध्यानात घ्यावे. एखादा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येत नाही, हे जर बरोबर असेल तर मग ईड्ब्ल्यूएसचे केंद्राचे नोटिफिकेशन हेही नंतरचे आहे. मात्र त्याला कोणीही आव्हान दिले नाही, असे कोंढरे यांनी निदर्शनास आणून दिले. कोंंढरे म्हणाले, की वास्तविक एसईबीसीच्या वैदकीय कोट्याच्या बाबत  मुंबई उच्च न्यायालयात याअगोदर एक याचिका फेटाळली गेली होती. नागपूर खंडपीठात प्रक्रिया अगोदर सुरु झाल्याचा आक्षेप घेत एक याचिका दाखल झाली त्यात न्यायालयाने सुरुवातीला स्थगिती दिली. नंतर सुनावणी घेऊन ही स्थगिती उठवली. त्यानंतरच ही प्रवेश प्रक्रिया पुढे जाऊन मराठा विद्यार्थ्यांनी शुल्क भरुन प्रवेश घेतले. त्यावेळी एसईबीसीचा पर्याय उपलब्ध असल्याने या विद्यार्थ्यांना त्याबद्दल दोष देता येणार नाही. मात्र आताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने प्रश्न गंभीर झाला आहे. .............राज्य सरकारकडून अपेक्षाएसईबीसी कायदा सध्या अस्तित्वात असून सरकारने या कायद्यातील कलम 17 अन्वये जे अधिकार दिले आहेत, त्यात काही दुरुस्ती करता येते का या संदर्भात सरकारने कायदेशीर सल्ला घ्यावा. अशी दुरुस्ती अंमलात आणली तर मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश संरक्षित करता येतील. यासाठी गरज पडल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन सरकारने अध्यादेश काढावा. यंदाच्या शैक्षणिक सत्रात जे खुल्या किंवा एसईबीसी प्रवगार्तील प्रवेशापासून वंचित राहण्याचा धोका असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन तितक्याच जागा वाढवाव्यात. तामिळनाडूतील आयआयटी प्रवेश प्रक्रियेत न्यायालयीन अडचण निर्माण झाली असता, याच मागार्चा अवलंब करुन तोडगा काढला गेल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सरकारने ज्येष्ठ विधीज्ञांचा सल्ला घेऊन मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश त्वरीत संरक्षीत करावेत अन्यथा त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयातील खटल्याची अंतिम सुनावणी पूर्ण झाली असून हा निकाल लवकरात लवकर लागल्यास पुढील अनेक प्रश्न टाळता येतील.  - राजेंद्र कोंढरे, सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा महासंघ

टॅग्स :Puneपुणेmaratha mahasanghमराठा महासंघreservationआरक्षणState Governmentराज्य सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय