शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर पाणीप्रश्न

By admin | Updated: April 4, 2017 03:29 IST

पनवेल महानगरपालिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून, राजकीय पक्षांकडून वातावरण निर्मिती करण्यात येत आहे.

अरुणकुमार मेहत्रे,

कळंबोली- पनवेल महानगरपालिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून, राजकीय पक्षांकडून वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. शहरातील काही भागात अल्पदाबाने, दिवसभरातून एकदाच तासभरासाठी पाणी येत असल्याने नागरिक हैराण आहेत. त्यामुळे शेकाप आघाडीने हाच प्रश्न अजेंड्यावर ठेवला आहे. ‘दिवसाआड पाणी... किती दिवस तीच कहाणी...’ अशी बॅनरबाजी शेतकरी कामगार पक्षाने सुरू केली असून अशा आशयाचे बॅनर्स शहरात, रेल्वेस्थानकात लावले आहेत. मनसे आणि शिवसेनेकडूनही पाण्याचेच भांडवल करण्यात येत आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीचा विचार करता, शहराला देहरंग धरणातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी असल्याने मागणीप्रमाणे पाणी मिळत नाही. त्यामुळे एमजेपी आणि एमआयडीसीकडून पाणी विकत घ्यावे लागते. मे महिन्यापर्यंत पिण्याचे पाणी मिळावे यासाठी काही भागात आतापासूनच पाणीकपात करण्यात आली आहे. त्यासाठी देहरंग धरणातून अतिशय कमी पाण्याचा उपसा करण्यात येत आहे, तर इतर प्राधिकरणाकडून येणारे पाणी दिवसाआड पनवेलकरांना पुरवले जात आहे. यामुळे पाणीटंचाई भासत असून गतवर्षीही हीच स्थिती होती. नवीन पनवेल, कळंबोली या वसाहतींना एमजेपीकडून मागणीप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. कामोठे नोडलाही नवी मुंबई महापालिकेकडून कमी पाणी दिले जाते. खारघरमधील परिस्थिती फारशी वेगळी नाही. समाविष्ट केलेल्या गावांचा प्रश्नच आणखीनच बिकट आहे. दरवर्षी भेडसावणाऱ्या पाणीसमस्येवर खरेतर सर्वपक्षांनी एकत्र येऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र राजकीय पक्षांकडून पाणीप्रश्नाचे भांडवल करण्यात येत आहे. रेल्वे स्थानक, चौकाचौकात, एनएमएमटी, रिक्षांवर सुध्दा स्टिकर लावले आहे. माजी नगराध्यक्ष संदीप पाटील आणि माजी नगरसेवक सुनील बहिरा यांनी प्रभाग क्र मांक १७ आणि २० मध्ये पाण्याचा मोफत टँकर सुरू केला आहे. त्या टँकरवर सुध्दा ‘दिवसाआड पाणी, किती दिवस तीच कहाणी’ असा बॅनर लावण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्र मांक १७ आणि १८ मधील उमेदवार अतुल चव्हाण आणि यतीन देशमुख यांच्याकडून किती वर्षे पाणीप्रश्न प्रलंबित, आता बदल हवा अशा आशयाचा संदेश सोशल मीडियात फिरत आहे.