शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादची शान वाढविणाऱ्या दरवाजांचे विद्रुपीकरण

By admin | Updated: February 7, 2017 00:40 IST

ऐतिहासीक वारसा लाभलेल्या पर्यटन स्थळांची राजधानी आणि जागतिक पातळीवर '५२ दरवाजांचे शहर' म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे.

सोमनाथ खताळ

औरंगाबाद, दि. 7 - ऐतिहासीक वारसा लाभलेल्या पर्यटन स्थळांची राजधानी आणि जागतिक पातळीवर '५२ दरवाजांचे शहर' म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. शहराभोवती ५२ दरवाजे व तटबंदी उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे औरंगाबादची वेगळी ओळख आहे. हे दरवाजे आकर्षक असून शहराच्या सौंदर्यात भर घालणारे आहेत. परंतु मागील काही वर्षांपासून यातील काही दरवाजांचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसून येत आहे. तर काही दरवाजांची पडझड झाली आहे. त्यामुळे या दरवाजांचे अस्तीत्व तर धोक्यात आलेच आहे शिवाय पोस्टरबाजी आणि परिसरातील घाणीच्या साम्राज्यामुळे दरवाजांचे विद्रुपीकरण झाले आहे. ऐतिहासिक, प्राचीन आणि विविध पर्यटनस्थळांचा वारसा औरंगाबाद शहराला लाभला आहे. मागील काही वर्षांत शहराचा झपाट्याने विस्तार झाला आहे. कधी काळी दरवाजांच्या आत असणारे हे शहर सद्यस्थितीत ऐतिहासिक तटबंदीच्या बाहेर विस्तारले आहे. शहराची ऐतिहासीक ओळख निर्माण करणाऱ्या या दरवाजांची पुरातत्व विभागाने वेळोवेळी सुरक्षा आणि दुरूस्ती करणे गरजेचे होते. परंतु असे झाले नाही. प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष ऐतिहासीक स्थळांसाठी धोकादायक बनत आहे. त्यामुळे त्यांची दिवसेंदिवस दुरवस्था होत चालली आहे.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात विविध पर्यटन आणि ऐतिहासीक स्थळ आहेत. हे पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. औरंगाबाद शहरात कोणत्याही मार्गाने ‘एन्ट्री’ करायची असेल तर त्यांना ऐतिहासीक ५२ दरवाजांपैकी एका दरवाजाचे दर्शन होते. परंतु ज्या दरवाजांजवळ पूर्वी पर्यटक मुद्दामहून थांबून फोटो काढायचे, आज त्याच दरवाजांना पर्यटक केवळ दुरून पाहणे पसंत करीत असल्याचे दिसून येत आहे.

पैठण गेट नावालाचइतर दरवाजांपेक्षा पैठण गेटीच अवस्था बऱ्यापैकी चांगली आहे. परिसरात रंगरंगोटी केल्यामुळे इथे सर्वांच्या नजरा क्षणभर थांबतात. परंतु अपेक्षेप्रमाणे येथे सुविधा नाहीत किंवा दुरूस्ती झालेली नाही. तसेच पुर्ण गेटला रंगरंगोटी केलेली नाही. संबंधित विभागाचे लोक इकडे फिरकत नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. रात्रीच्यावेळी या गेटच्या परिसरातील भिकारी किंवा गरीब लोक आश्रय घेत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

महमंद दरवाजाला पडल्या भेगाऐतिहासीक पाणचक्कीजवळ हा दरवाजा आहे. परंतु या दरवाजाची सद्यस्थितीतील अवस्था पाहिली तर हा दरवाजा कोणत्याही क्षणी कोसळण्याची भिती आहे. या दरवाजाला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. तर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते. दरवाजाच्याा आतील भागातही भेगा पडल्याचे दिसून येते. त्यामुळे या दरवाजाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

बारापुल्ला दरजाजवळ घाणीचे साम्राज्यमील कॉर्नरच्या परिसरात हा दरवाजा आहे. या दरजाजवळूनच एक छोटी नदी गेलेली आहे. या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. तसेच या दरवाजाच्या परिसरातही घाणीचे साम्राज्य दिसून आले. यामुळे दुर्गंधी पसरते. या दुर्गंधीमुळे पर्यटकांमधून नाराजीचा सुर निघत आहे.

दुर्लक्ष आणि हालगर्जीपणापुरातत्व विभाग व महापालिकेच्यावतीने या दरवाजांची वेळच्यावेळी दुरूस्ती आणि रंगरंगोटी करून परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. परंतु संबंधित दोन्ही विभाग याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय ज्या दरवाजांना रंग देण्यात आला, तो रंग अवघ्या काही महिन्यांतच निघून गेला आहे. यावरून या विभागाचा हालगर्जीपणाही समोर येतो. ऐतिहासीक वास्तुंचा ठेवा जपण्यासाठी या विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी औरंगाबादकरांसह पर्यटकांमधून केली जात आहे.

हा आहे अधिनियममहाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० अन्वये हे स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. जो कोणी सदर संरक्षित स्मारकाचा नाश करील, काढून घेईल, त्याचे नुकसान करील, त्यात फेरफार करील, खराब करील, तो या अधिनियमानुसार ३ महिने कारावास किंवा ५ हजार रुपयांपर्यंत दंडास किंवा दोन्हीस पात्र होतो. परंतु कारवाई होत नसल्याने बिनधास्त पोस्टरबाजी केली जात आहे.