शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांचा संदेश जागविण्यासाठी भारतभ्रमण

By admin | Updated: June 8, 2014 00:57 IST

‘माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभु दिसला..’ अशी हाक आपल्या भजनातून देऊन तुकडोजी महाराजांनी माणसं शोधण्याचा आणि जोडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रसंतांचा हा संदेश देशभरात पोहोचविण्यासाठी

भंडारा :  ‘माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभु दिसला..’ अशी हाक आपल्या भजनातून देऊन तुकडोजी महाराजांनी माणसं शोधण्याचा  आणि जोडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रसंतांचा हा संदेश देशभरात पोहोचविण्यासाठी आंधळगावचा ४२ वर्षीय ‘तरुण’ माणसा-माणसातील हरविलेलं  माणूसपण शोधण्यासाठी शनिवारी दुचाकीने भारतभ्रमणावर निघाला आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांंपूर्वीही त्यांनी दुचाकीने भारतभ्रमण केले होते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना अभिप्रेत असलेल्या माणसाला शोधण्यासाठी किरण सातपुते यांनी दुचाकीने भारतभ्रमण  करण्याचा निर्धार केला आहे. समाजातून संपत असलेली परस्परांप्रतीची सहिष्णुता, सद्भावना वाढीस लागावी, हा या प्रवासाचा उद्देश असल्याचे  त्यांनी सांगितले. या प्रवासाचा खर्च कसा करणार? या प्रश्नावर त्यांनी ‘तुकडोजी महाराज, गाडगेबाबांकडे बँक बॅलन्स होता का? असे अंतर्मुख  करणारे उत्तर दिले. दररोज २00 कि.मी. चा प्रवास केल्यानंतर रात्र झाली की त्याच गावातील एखाद्या मंदिरात मुक्काम करायचा. तत्पूर्वी मंदिर परिसराची स्वच्छता  करायची. रात्री कीर्तनातून राष्ट्रसंतांचा संदेश जागवायचा आणि  झोपण्यापूर्वी त्याच गावात हात जोडून पोटापुरते अन्न  मागायचे. दुसर्‍या दिवशी  पुढच्या प्रवासाला निघायचे, असा दिनक्रम आखला असल्याचे त्यांनी सांगितले. ६ जून २0११ रोजी भारतभ्रमणाची तयारी केली. दुचाकीने दिल्ली गाठली. त्यावेळी एक सहकारी सोबत होता. त्याच्या निरुत्साहामुळे माघारी फिरावे  लागले. त्याचदिवशी पुन्हा संकल्प केला. त्यानंतर ६ जून २0१२ रोजी भारतभ्रमण करुन परतलो. मागीलवर्षी रेल्वने अमरनाथला गेलो होतो. तिथे   भगवान शंकराचे अस्त्र ‘त्रिशूल’ दिसले नाही. त्याचवेळी संकल्प केला. दुचाकीने अमरनाथला जायचे. तिथे पितळी ‘त्रिशूल’ अर्पण करायचे ठरविले.  हे त्रिशूल नागपूर येथून आणले असून त्यासाठी २१ हजार रुपयांचा खर्च आला. आता सोबत त्रिशूल घेऊन जात आहे. कुटुंबात आईवडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ आहे. गावात स्वत:चे घर असून मंडप डेकोरेशनचा छोटासा व्यवसाय आहे. आपल्या संदेश यात्रेला  कुटुंबांची सहमती असल्यामुळेच मार्ग सुकर झाल्याचे त्यांनी सांगितले. आपला प्रवास हा सद्भावनेचा संदेश आहे. त्यामुळे  प्रत्येक गावात लोकांशी  गप्पा करणार आहे. आपल्याला मंदिरातील गाभार्‍यात नव्हे! तर माणसात देव शोधायचा आहे, असे सांगून या भारतभेटीत राष्ट्रसंतांना अपेक्षित  असलेला माणूस भेटेल, असा विश्‍वास  त्यांनी व्यक्त केला.  (जिल्हा प्रतिनिधी)