शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - हिंदू मुस्लिम ऐक्याची ऐतिहासिक परंपरा

By admin | Updated: October 12, 2016 16:44 IST

पुरंदर तालुक्याच्या दक्षिण टोकाला निरा नदीच्या तीरावर वसलेले तोंडल हे गाव. याठिकाणी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात सामाजिक सलोख्याची सुमारे दोनशे वर्षांची परंपरा आजही

ऑनलाइन लोकमत
परिंचे, दि. 11- पुरंदर तालुक्याच्या दक्षिण टोकाला निरा नदीच्या तीरावर वसलेले तोंडल हे गाव. याठिकाणी  तुळजाभवानी मातेच्या मंदिरात सामाजिक सलोख्याची सुमारे दोनशे वर्षांची परंपरा आजही भक्तीभावाने जपली जात आहे. मोहरमच्या वेळी सर्व  मुस्लिम बांधव याच मंदिरात दोन दिवस ताबूत बसवतात. यावेळी सर्व ग्रामस्थ  ताबूताचे दर्शन घेतात. तर मुस्लिम कुटुंब नवरात्रात देवीचा उपवास करतात. 
              सर्व गावाचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात दीडशेहून अधिक लोक उपवास करतात.   नवरात्रात येथून तुळजापूरला देवीची पालखी घेऊन जातात. तेथे  देवाची पालखी व भक्तांचे विशेष स्वागत करण्यात येते. गावाचे  वैशिष्ट्य असे की देवीच्या सर्वच कार्यक्रमांमध्ये येथील  अहमद इनामदार, रझ्झाक इनामदार, निसार इनामदार, जावेद इनामदार  गुलाब दस्तगीर इनामदार, रमजान इनामदार, रफिक मोकाशी, लतिफ मोकाशी, सोहेल इनामदार,  , फिरोज इनामदार,  व इतर मुस्लिम कुटुंबे मोठ्या  श्रद्धेने व भक्तीभावाने सहभागी होतात. यावेळी नवरात्र संपत असतानाच मोहरम आला आहे. त्यामुळे दोन्ही कार्यक्रमांना भावनिक किनार लाभली आहे. दसऱ्याच्या दिवशी मंदिरात ताबूत बसवले आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन करण्यात येईल. असे काशिनाथ वणवे यांनी सांगितले. 
- तैयद रमजान इनामदार  यांनी सांगितले की अनेक ठिकाणी उपचार घेऊनही डोळ्यांचे  अवघड दुखणे बरे होत नव्हते.  उपचार बंद झाल्यानंतर देवीच्या अाशीर्वादानेच मला पुन्हा दिसू लागले. अशी माझी श्रद्धा आहे. हा माझ्यासाठी चमत्कार होता, असे मी मानतो.   तेव्हापासून गेली अठ्ठावीस वर्षे मी देवीचा उपवास करतो. संपूर्ण नवरात्र काळात मंदिरात असतो. 
-  तोंडल हे गाव पुनर्वसित गाव आहे. वीर धरणामुळे हे गाव सध्याच्या ठिकाणी वसले आहे. जुन्या गावात नदीच्या काठी  तुळजाभवानी मातेचे मंदिर होते,  असे सरपंच रत्नमाला साबळे यांनी सांगितले. गावाच्या विकासाचे सर्व निर्णय याच मंदिरात सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन घेतात असे  दिगंबर वणवे यांनी सांगितले. गावामध्ये  आजही मश्जिद नसून त्याची गरजही  जाणवत नाही असे दस्तगीर  इनामदार यांनी आवर्जून सांगीतले. मंदिरामध्येच  दरवर्षी  ताबूत  बसवण्याचा  कार्यक्रम होतो.