शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - वांद्र्यात बेहराम पाड्यात इमारत कोसळली, 6 ठार

By admin | Updated: October 13, 2016 20:02 IST

वांद्र्यातल्या पूर्वेकडच्या बेहरम पाड्यात एक 5 मजल्यांची इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 13 - वांद्र्यातल्या पूर्वेकडच्या बेहराम पाड्यात एक 5 मजल्यांची इमारत कोसळून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगा-याखाली अडकलेल्या 5 जणांची सुटका करण्यात आली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. ढिगा-याखाली अडकलेल्यांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश होता. दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. घटनास्थळी पोलीस आणि एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार बिल्डिंग कोसळून ढिगा-याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी बचावकार्य थांबवलं आहे. घटनास्थळी बचावकार्यासाठी अग्निशामक दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या असून, एक अँब्युलन्सही पोहोचली होती.

वांद्र्यातला बेहराम पाडा हा अवैध बांधकामांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या भागात महापालिकेनं 350 अवैध बांधकामे तोडण्याचे आदेश दिले होते. याआधी भिवंडीतही अशाच प्रकारे तीन मजल्यांची इमारत कोसळली होती. त्या दुर्घटनेत 23 लोक गंभीररीत्या जखमी झाले होते.