शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

विदर्भामधील दुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 06:58 IST

दुष्काळामुळे विदर्भातील दुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. वाशीम व यवतमाळ जिल्ह्यामधून हजारो शेतकरी व शेतमजुरांनी कुटुंबासह मार्च महिन्यापासूनच नवी मुंबईत स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई  - दुष्काळामुळेविदर्भातीलदुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. वाशीम व यवतमाळ जिल्ह्यामधून हजारो शेतकरी व शेतमजुरांनी कुटुंबासह मार्च महिन्यापासूनच नवी मुंबईत स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही जिल्ह्यांमधील कुटुंबांनी सानपाडा येथील दत्त मंदिराजवळील उड्डाणपूल, नेरूळ, जुईनगर, एमआयडीसीमधील मोकळ्या भूखंडावर संसार थाटला आहे.पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल, अशा ठिकाणी निवारा करून उघड्यावरच दगडाची चूल करून त्यावर स्वयंपाक केला जात आहे. ते सकाळी तुर्भे, नेरूळ व वाशीमधील नाक्यावर कामाच्या शोधात उभे राहत आहेत. बहुतांश दुष्काळग्रस्त नाका कामगार म्हणून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.दुष्काळामुळे गावाकडे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. एक ते दोन किलोमीटर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शेतीमध्ये काही पिकत नाही व गावाकडे रोजगाराचे कोणतेच साधन नसल्यामुळे स्थलांतर करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची माहिती त्यांनी दिली.महापालिका प्रशासनाने दुष्काळग्रस्तांसाठी तात्पुरत्या स्वरूपात पाणी, आरोग्य सुविधा, फिरते शौचालय उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी दुष्काळग्रस्तांनी केली आहे.गावामध्ये पाण्याची सोय नाही, मुलाचा ४० वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. नातवाचा अपघात झाल्यामुळे उपचारासाठी कर्ज काढावे लागले. गावाकडे रोजगारही मिळत नसल्यामुळे मुंबईत आलो असून, पावसाळ्यापर्यंत येथेच थांबणार आहोत.- शंकर कालापहाड, बाभूळगाव, वाशिमगावी दोन एकर जमीन आहे; पण दुष्काळामुळे काही पिकत नाही. नाका कामगार म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.- भारत गोविंद महाजन,माळवा, (ता. महागाव, जि. यवतमाळ)दुष्काळामुळे शेती ओस पडली आहे. मजुरीची कामेही मिळत नाहीत. उपासमारीची वेळ आल्यामुळे येथे मिळेल ते काम करून उपजीविका करत आहोत.- अमृत सखाराम गजभार, बोरगाव (ता. मालेगाव, जि. वाशिम)फेब्रुवारी महिन्यापासून गावात पाणीटंचाई सुरू झाली आहे. येथे रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहोत.- वंदना कालापहाड, मांडवा डिब्रस (ता. हरसूल, जि. यवतमाळ)मुंबईतही समस्यांचा डोंगरविदर्भातील दुष्काळग्रस्तांच्या समस्या मुंबई व नवी मुंबईमध्ये आल्यानंतरही संपलेल्या नाहीत. येथे पुलाखाली उघड्यावरच दगडाची चूल करून स्वयंपाक करावा लागत आहे. मंदिर किंवा गळती सुरू असलेल्या जलवाहिनीवरून पाणीभरावे लागत आहे. रात्री पुलाखाली व मोकळ्या भूखंडावर थांबणे धोकादायक असल्याने अनेक जण रेल्वे स्टेशन, पादचारी पुलावर मुक्कामासाठी जात आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रdroughtदुष्काळVidarbhaविदर्भMumbaiमुंबई