शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

विदर्भामधील दुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 06:58 IST

दुष्काळामुळे विदर्भातील दुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. वाशीम व यवतमाळ जिल्ह्यामधून हजारो शेतकरी व शेतमजुरांनी कुटुंबासह मार्च महिन्यापासूनच नवी मुंबईत स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई  - दुष्काळामुळेविदर्भातीलदुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. वाशीम व यवतमाळ जिल्ह्यामधून हजारो शेतकरी व शेतमजुरांनी कुटुंबासह मार्च महिन्यापासूनच नवी मुंबईत स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही जिल्ह्यांमधील कुटुंबांनी सानपाडा येथील दत्त मंदिराजवळील उड्डाणपूल, नेरूळ, जुईनगर, एमआयडीसीमधील मोकळ्या भूखंडावर संसार थाटला आहे.पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल, अशा ठिकाणी निवारा करून उघड्यावरच दगडाची चूल करून त्यावर स्वयंपाक केला जात आहे. ते सकाळी तुर्भे, नेरूळ व वाशीमधील नाक्यावर कामाच्या शोधात उभे राहत आहेत. बहुतांश दुष्काळग्रस्त नाका कामगार म्हणून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.दुष्काळामुळे गावाकडे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. एक ते दोन किलोमीटर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शेतीमध्ये काही पिकत नाही व गावाकडे रोजगाराचे कोणतेच साधन नसल्यामुळे स्थलांतर करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची माहिती त्यांनी दिली.महापालिका प्रशासनाने दुष्काळग्रस्तांसाठी तात्पुरत्या स्वरूपात पाणी, आरोग्य सुविधा, फिरते शौचालय उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी दुष्काळग्रस्तांनी केली आहे.गावामध्ये पाण्याची सोय नाही, मुलाचा ४० वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. नातवाचा अपघात झाल्यामुळे उपचारासाठी कर्ज काढावे लागले. गावाकडे रोजगारही मिळत नसल्यामुळे मुंबईत आलो असून, पावसाळ्यापर्यंत येथेच थांबणार आहोत.- शंकर कालापहाड, बाभूळगाव, वाशिमगावी दोन एकर जमीन आहे; पण दुष्काळामुळे काही पिकत नाही. नाका कामगार म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.- भारत गोविंद महाजन,माळवा, (ता. महागाव, जि. यवतमाळ)दुष्काळामुळे शेती ओस पडली आहे. मजुरीची कामेही मिळत नाहीत. उपासमारीची वेळ आल्यामुळे येथे मिळेल ते काम करून उपजीविका करत आहोत.- अमृत सखाराम गजभार, बोरगाव (ता. मालेगाव, जि. वाशिम)फेब्रुवारी महिन्यापासून गावात पाणीटंचाई सुरू झाली आहे. येथे रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहोत.- वंदना कालापहाड, मांडवा डिब्रस (ता. हरसूल, जि. यवतमाळ)मुंबईतही समस्यांचा डोंगरविदर्भातील दुष्काळग्रस्तांच्या समस्या मुंबई व नवी मुंबईमध्ये आल्यानंतरही संपलेल्या नाहीत. येथे पुलाखाली उघड्यावरच दगडाची चूल करून स्वयंपाक करावा लागत आहे. मंदिर किंवा गळती सुरू असलेल्या जलवाहिनीवरून पाणीभरावे लागत आहे. रात्री पुलाखाली व मोकळ्या भूखंडावर थांबणे धोकादायक असल्याने अनेक जण रेल्वे स्टेशन, पादचारी पुलावर मुक्कामासाठी जात आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रdroughtदुष्काळVidarbhaविदर्भMumbaiमुंबई