शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या शिक्षणासाठी वसुंधरेचे ममत्व

By admin | Updated: December 31, 2014 01:05 IST

समाजात आजही अनेक मुली आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित आहेत. अशा मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीने स्वीकारली आहे.

रद्दी गोळा करून करतात शिक्षणाचा खर्च : २८ मुलींची स्वीकारली जबाबदारीनागपूर : समाजात आजही अनेक मुली आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित आहेत. अशा मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीने स्वीकारली आहे. संवेदनांची जाणीव असणाऱ्या क ाही व्यक्तींनी या संस्थेची स्थापना केली असून, गेल्या चार वर्षापासून मुलींचे निवासी वसतिगृह चालवित आहे. यासाठी काही निधी स्वत:च्या खिशातून तर काही निधी रद्दी गोळा करून भागवित आहे. वैशालीनगर येथे वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीद्वारे संचालित मुलींचे निवासी वसतिगृह आहे. येथे विदर्भातील अतिशय गरीब, आईवडिलांचे छत्र हरविलेल्या, कुणाला आई नाही, कुणाला वडील नाही अशा मुली ज्या शिक्षणापासून वंचित आहे, यांना निवाऱ्याबरोबरच शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या चार वर्षापासून हे वसतिगृह अतिशय जबाबदारीने कर्तव्य बजावत आहे. येथे मुलींना राहण्याची, खाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च संस्था पूर्ण करते. त्यांच्यासाठी बसची सोय, ट्यूशनची सोय करण्यात आली आहे. वर्ग ४ ते वर्ग ११ च्या मुली सध्या येथे निवासाला आहे. या उपक्रमासाठी संस्थेला महिन्याला ५० हजार रुपये खर्च लागतो. १३ हजार रुपये किराया तर वसतिगृहाचा द्यावा लागतो. संस्थेचे सदस्य स्वत:च्या खिशातून हा सर्व खर्च करतात. त्याचबरोबर दर रविवारी घरोघरी फिरून रद्दी गोळा करतात. ही रद्दी विकून आलेल्या पैशातून मुलींच्या शिक्षणावर खर्च करतात. संस्थेने केलेल्या सहकार्यामुळे या मुलींनी परीक्षेत भरघोस यश मिळविले आहे. एक मुलगी तर आयएएसची तयारी करीत आहे. या मुलींना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. वसुंधरा संस्थेचा झुनका भाकरचा स्टॉल उद्योजिक मेळाव्यात लागला आहे. या स्टॉलला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यातून गोळा झालेला निधी मुलींच्या शिक्षणावर खर्च करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)उपक्रमात योगदानसामाजिक कार्यकर्ते नागेश पाटील यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला सुरुवात झाली. सध्या ते संरक्षक म्हणून या उपक्रमाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यांच्यासोबत हर्षा पाटील, मंजुषा गोटेकर, माधुरी रामटेके, मीना पाटील, स्मिता हाडके, सुनिता पाटील, माधुरी रंगारी, सचिन रामटेके, राजेश हाडके, मनीष पाटील यांचे या उपक्रमात संपूर्ण योगदान आहे. समाजानेही खारीचा वाटा स्वीकारावाया निराधार मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वसुंधरा शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे. यासाठी समाजातील काही सज्जनशील, क्रियाशील व्यक्तीच्या सहकार्याची गरज आहे. स्वत:च्या घासातला एक घास या चिमण्यांच्या मुखात घालावा, त्यांना मायेचे उबदार पांघरुण द्यावे. तरच हा आनंदाचा झरा अव्याहतपणे वाहत राहील, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.