शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘अनलॉक लर्निंग’ उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 07:24 IST

गावोगावी समन्वय समिती; पाड्यांपर्यंत पोहोचविले शिक्षण

- यदु जोशीमुंबई : लॉकडाऊनमध्ये बंद असलेल्या शहरी किंवा ग्रामीण भागातील शाळांच्या मुलांपर्यंत ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण पोहोचविण्यासाठी धडपड सुरू असली तरी ते प्रत्यक्ष किती टक्के मुलांपर्यंत पोहोचतेय या विषयी अजूनही शंका असतानाच दुसरीकडे आदिवासी विकास विभागाने आपले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सुशिक्षित युवक, पालकांच्या मदतीने गाव/पाड्यांवर शिक्षणाची गंगा पोहोचविणारा ‘अनलॉक लर्निंग’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला असून तो मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे.आदिवासी विकास विभागाने त्यासाठीचा कार्यक्रम तयार केला आणि जुलैच्या मध्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू केली. आश्रमाशाळांची मुले लॉकडाऊनमुळे दुर्गम भागातील आपापल्या गावी असताना त्यांना शिकवणे हे अतिशय मोठे आव्हान एकीकडे आणि वायफाय, ई-लर्निंगच्या सुविधा त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत हे वास्तव दुसरीकडे अशी स्थिती असताना आदिवासी मुले शिक्षणापासून कोणत्याही परिस्थितीत वंचित राहता कामा नयेत, या एकमेव ध्यासातून हजारो हात पुढे आले आणि ई-संवादाची साधने नसली तरी फारसे काही अडत नाही, हेही या निमित्ताने सिद्ध झाले. इयत्ता बारावीनंतरच्या शिक्षणासाठी राज्यातील विविध वसतिगृहांमध्ये राहणारे ५४ हजार विद्यार्थीही सध्या त्यांच्या गावीच आहेत. त्यांचीही अध्यापन आणि शिक्षणपूरक उपक्रमांसाठी मदत घेतली जात आहे. त्यांच्या वसतिगृहांच्या गृहपालांनी त्यांचे व्हॉटस्अ‍ॅप ग्रूप तयार केले असून त्या माध्यमातून त्यांच्या योगदानाचा नियमित आढावा घेतला जातो.मोफत पुस्तके पोहोचविण्यात...शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि एकलव्य शाळा या सर्वच निवासी आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे तेथील मुले आपापल्या गावी गेली. अशावेळी त्यांना शिक्षणाशी जोडण्यासाठीचा कार्यक्रम आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांनी विभागाचे अधिकारी आणि तज्ज्ञ यांच्या मदतीने आखला.प्रत्येक शाळेच्या पाच ते आठ किमीच्या परिसरातील गावे/पाड्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पोहोचविण्यात आली. शिक्षक त्या-त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना फिजिकल डिस्टंन्सिंगचे भान राखत शिकवू लागले. पावसाळ्यात हे काम किती कठीण आहे हे आदिवासी भागात गेल्याशिवाय कळत नाही. नियमित शिक्षणाबरोबरच पूरक शिक्षणासाठी वर्कबूक, अ‍ॅक्टिव्हिटी बूक पुरविण्यात आले.गावोगावी समन्वय समित्या स्थापून गावातील सुशिक्षित लोक, पालकही शिक्षणाची गंगा मुलांपर्यंत पोहोचवित आहेत. पाड्यांपर्यंत यंत्रणा पोहोचविली जात आहे.