शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सर्व महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांना अभय

By admin | Updated: March 23, 2015 02:33 IST

राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे नियमित करण्याबाबतचा सीताराम कुंटे समितीचा अहवाल तत्त्वत: स्वीकारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

संदीप प्रधान - मुंबईराज्यातील सर्व महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे नियमित करण्याबाबतचा सीताराम कुंटे समितीचा अहवाल तत्त्वत: स्वीकारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक सर्वप्रथम होत असून, त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयाचा लाभ मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड यांसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या हद्दीतील बेकायदा बांधकामांना होणार आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री व औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांना कुंटे समितीचा अहवाल तत्त्वत: स्वीकारल्याचे पत्र दिले आहे. कदम म्हणाले की, केवळ औरंगाबाद महापालिका हद्दीत सुमारे २५ हजार बेकायदा बांधकामे असून, राज्य मंत्रिमंडळाने हा अहवाल स्वीकारल्यानंतर त्यापैकी बहुतांश बांधकामे नियमित केली जातील. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक सर्वप्रथम होत असून, तेथे त्याचे पडघम वाजू लागले असताना सरकारचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे नियमित करण्याबाबत मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीमध्ये नगररचना तज्ज्ञ, अन्य काही महापालिकांचे आयुक्त यांचा समावेश होता. समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा अहवाल विधि व न्याय विभाग आणि महसूल खात्याकडे अभ्यासाकरिता धाडला आहे. महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेले आदेश व अहवालातील शिफारशी यांचा अभ्यास केल्यानंतर कायद्याच्या चौकटीत बसवून जी बांधकामे नियमित करणे शक्य आहे ती केली जातील, असे सांगण्यात आले.विमानतळ, संरक्षण दल, बफर आणि इकॉलॉजिकली सेन्सेटीव्ह झोनमधील बेकायदा बांधकामे नियमित होऊ शकत नसल्याचे कुंटे समितीने नमूद केले आहे. राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यावर प्रत्येक बेकायदा बांधकामाचे प्रकरण तपासून निर्णय घ्यावा लागेल, असे जाणकारांचे मत आहे. हरित पट्ट्यातील बेकायदा बांधकामे आरक्षण बदलून नियमित केली जाऊ शकतात. पूर्वपरवानगी न घेता केलेली बेकायदा बांधकामे दंड आकारून नियमित केली जाऊ शकतात.