शहरं
Join us  
Trending Stories
1
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
2
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
3
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
4
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
6
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
7
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
8
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
9
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
10
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
11
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
12
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
13
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
14
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
15
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
16
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
17
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
18
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
19
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
20
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामे फोफावली

By admin | Updated: February 21, 2017 05:59 IST

ठाणे आणि उल्हानसगर महापालिकांचा तापलेला माहोल, त्यात गुंतलेली पालिकेची यंत्रणा पाहून अनधिकृत बांधकामे

ठाणे : ठाणे आणि उल्हानसगर महापालिकांचा तापलेला माहोल, त्यात गुंतलेली पालिकेची यंत्रणा पाहून अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांनी हातपाय पसरले आहेत. ठाणे, दिवा, उल्हासनगर परिसरात भराव टाकून रात्रीचा दिवस करत बांधकामे सुरू आहेत.
मुख्यमंत्र्यांनी शास्ती रद्द केल्याची घोषणा करताच आणि शिवसेनेने मालमत्ता कर रद्द करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या बांधकामांना वेग आला आहे. यापूर्वी अर्धवट अवस्थेत असलेली बांधकामेही आता पूर्ण केली जात आहेत. दिवा परिसरात बेकायदा भराव घालून यापूर्वीच खारफुटी सुकवण्यात आली आहे. तेथे सध्या रात्रभर मातीचे ट्रक फिरत आहेत आणि भराव घातला जात आहे. त्याबाबत स्थानिक नागरिकांनी पालिकांच्या यंत्रणांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या सर्व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगत त्या तक्रारींना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. दिवा परिसरात जाळलेल्या किंवा सुकवलेल्या खारफुटीच्या परिसरात, डम्पिंगच्या भागात सर्रास भरावाचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यातील अनेक बिल्डरांची त्याला फूस असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
उल्हासनगरमध्येही रातोरात बांधकामे उभी करण्याचे सत्र सुरू झाले आहे. यापूर्वी अर्धवट ठेवलेली बांधकामे पूर्ण केली जात आहेत किंवा पालिकेने जी बांधकामे अर्धवट अवस्थेत हातोडा मारून तोडली आहेत, ती पूर्ण केली जात आहेत. (प्रतिनिधी)

केडीएमसीचे कानांवर हात
कल्याण : बेकायदा बांधकामे रोखण्यात अपयश आले असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेने घर खरेदी करताना तुमची तुम्ही चौकशी करून घ्या, असे सांगत जबाबदारीपासून पाठ फिरवत हात वर केले आहेत. २७ गावांमध्ये चौकशी करून मगच घर घ्या. खोट्या व फसव्या जाहिरातींना बळी पडू नका, असे आवाहन करणारे पत्रकच पालिकेने काढले आहे. यातील १० गावे ग्रोथ सेंटर म्हणून जाहीर झाली आहेत. उरलेल्या १७ गावांमधील बेकायदा बांधकामांची यादी एमएमआरडीएने केडीएमसीला सप्टेंबरमध्ये दिली आहे. पण त्या ५५२ बांधकामांवर आजतागायत कारवाई झालेली नाही.