शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नृत्य स्पर्धेऐवजी स्वातीला पासचे २६० रुपये द्यायला हवे होते - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 26, 2015 11:54 IST

राज्य सरकारने बँकॉकला जाणा-या नृत्य पथकाला पैसे देण्याऐवजी लातूरमध्ये बसच्या पासचे पैसे नसल्याने आत्महत्या करणा-या मुलीला मदत करायला हवी होती, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - राज्य सरकारने तिजोरीतून ‘बँकॉक’ला जाणार्‍या नृत्य कलापथकास आठ लाख रुपये दिले, मात्र लातूरमध्ये स्वाती या विद्यार्थीनीने बसच्या पाससाठी २६० रुपये नाहीत, म्हणून आत्महत्या केली, हे राज्यातील अस्वस्थ मानसिकतेचे विदारक चित्र आहे, अशी टीका करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे. राज्यात फडणवीस सरकारला वर्षपूर्ती होत असतानाच मित्रपक्ष शिवसेनेने भाजपवर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे.  अशा किती स्वाती आज महाराष्ट्रात आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत व सरकार त्यांचे जीव वाचविण्यासाठी काय करणार आहे, असा सवालही त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे.  
देवेंद्र सरकार वर्षपूर्ती साजरी करीत असताना भाजप मंत्री वर्षपूर्तीचा सोहळा स्वतंत्रपणे साजरा करण्याच्या विचारात आहेत. सोहळा फार भव्यदिव्य नसला (दुष्काळाच्या कारणामुळे) तरी आमचे आम्ही एकटेच सण साजरा करू अशा भूमिकेत सत्तेतील आमचे मित्र आहेत, अशी टीका त्यांवनी केली. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकार्‍यांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे असे हे स्वातीचे आत्महत्या प्रकरण आहे, असंही लेखात नमूद करण्यात आले आहे. शिवसेनेने पाकिस्तानचे पुढारी कसुरी यांना विरोध केल्याने महाराष्ट्राची बदनामी झाली असे ज्यांना वाटते त्यांनी स्वातीच्या आत्महत्येने महाराष्ट्रावर पुष्पवृष्टी झाली काय ते सांगायला हवे, असा टोला  त्यांनी विरोधकांना हाणला आहे. 
एकेकाळी शिक्षणाचा ‘लातूर पॅटर्न’ महाराष्ट्रात प्रसिद्ध होता व लातूर पॅटर्नवर महाराष्ट्र फिदा होता. आता स्वातीच्या आत्महत्येने दुष्काळ, दारिद्य्र व आत्महत्येचा नवा ‘पॅटर्न’ उदयास येत असेल तर महाराष्ट्राला तो काळिमा आहे, अशी टीकाही लेखातून करण्यात आली आहे.  शेतकर्‍यांना मदत पोहोचावी व त्यांचे प्राण वाचावेत म्हणून शिवसेनेसारखा पक्ष मदत करत असून त्यात रोज सहकार्याच्या समिधा पडत आहेत, पण आत्महत्या रोखण्यात व स्वातीसारख्यांचे प्राण वाचविण्यात सरकार का कमी पडत आहे, असा सवाल उद्धव यांनी सरकारला विचारला आहे.