शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

Bjp Leader Kirit Somaiya: संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरेंचा भोंगा अन् हिरेन हत्येमागे माफिया पोलीस; किरीट सोमय्या पुन्हा बरसले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 13:09 IST

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली होती.

ठाणे-

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली होती. हिरेन कुटुंबीयांच्या भेटीनंतर सोमय्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "राज्याच्या 'उद्धट' ठाकरे सरकारनं मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांना यातना दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माफिया पोलिसांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केली आहे. हिरेन कुटुंबीयांचा वेदना अजूनही कमी झालेल्या नाहीत. एनआयएचं महत्वाचं प्रतिज्ञापत्र सादर झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आता किंचितसा दिलासा मिळाला आहे. यापुढे कायदेशीर लढा कसा द्यायचा याबाबत माझी हिरेन कुटुंबीयांची ४० मिनिटं चर्चा झाली. उद्धव ठाकरेंना मनसुख हिरेन कुटुंबीयांची माफी मागवीच लागेल", असा पवित्रा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घेतला आहे. 

"मनसुख हिरेन यांची हत्या करण्यामागे उद्धव ठाकरेंच्या माफिया पोलिसांचाच हात आहे. मी पुढच्या आठवड्यात एनआयची भेट घेणार आहे. ठाकरे सरकारने हिरेन कुटुंबीयांना अतोनात यातना दिल्या आहेत. ते हळूहळू यातून सावरत आहेत. पण याप्रकरणात उद्धव ठाकरेंना हिरेन कुटुंबीयांची माफी मागावीच लागेल. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री कार्यालयानेच गृह विभागाला वसुलीचं टार्गेट दिलं होतं. प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांची उद्धव ठाकरेंच्या निर्णयाने बेकायदेशीरपणे नियुक्ती झाली होती. निर्दोष लोकांच्या सुपाऱ्या देऊन आज या कुटुंबाला अनाथ आणि निराधार करण्याचं पाप ठाकरे सरकारनं केलं आहे", असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. 

संजय राऊत विषय भरकटवणारा भोंगाठाकरे सरकारवरील आरोप समोर यायला लागले की संजय राऊत विषय बदलतात. संजय राऊत म्हणजे विषय बदलण्यासाठी लावलेला उद्धव ठाकरेंचा भोंगा आहे, असा खोचक टोला यावेळी किरीट सोमय्या यांनी लगावला. मनसुख हिरेन यांच्या हत्येमागचा हेतू वसुली हाच होता हे सिद्ध झालं आहे. एनआयएनं मनसुख हिरेन यांना विक्टिम ठरवलं आहे. १०० कोटींच्या वसुलीचं काम उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री कार्यालयानेच अनिल देशमुख यांना दिलं होतं. यातूनच मनसुख हिरेन यांची हत्या झाली आहे", असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाMansukh Hirenमनसुख हिरणUddhav Thackerayउद्धव ठाकरे