शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार शेतकऱ्यांच्या नावे उचलले होते २० कोटींचे कर्ज

By admin | Updated: August 17, 2016 21:23 IST

लोकमंगल अ‍ॅग्रो या कंपनीच्या वतीने लोहारा शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर साखर कारखाना सुरू केला आहे.

ऑनलाइन लोकमतउस्मानाबाद, दि. 17 - राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अ‍ॅग्रो या कंपनीच्या वतीने लोहारा शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर साखर कारखाना सुरू केला आहे. या कारखान्यासाठी शेतकऱ्यांना कसल्याही स्वरूपाची माहिती न देता कंपनीने लोहाऱ्यासह परिसरातील सुमारे दोन हजार शेतकऱ्यांच्या नावे थोडेथोडके नव्हे, तर २० कोटी रूपयांचे कर्ज ‘इको’ या बँकेकडून उचलले होते. काही शेतकऱ्यांना बँकेकडून नोटिसा आल्यानंंतर या प्रकाराचा भांडाफोड झाला. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ‘लोकमंगल’ने या रकमेची परतफेड केली आहे. ‘लोकमंगल’ समुहाचा सोलापूरसह उस्मानाबाद जिल्ह्यातही विविध क्षेत्रात मोठा दबदबा आहे. राज्याचे सहकामंत्री असलेले सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अ‍ॅग्रो या कंपनीने साखर कारखाना उभारण्यासाठी तब्बल ४ हजार ७५१ गुंतवणूकदारांकडून ७४.८२ कोटी रूपये ‘सेबी’च्या नियमांकडे कानाडोळा करून जमविल्याचा ठपका ठेवत सदरील रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह परत करण्याबाबतचे आदेश काढले आहेत. ‘लोकमंगल’कडून ही रक्कम २००९ ते २०१५ या कालावधीत वसूल करण्यात आली होती. ‘लोकमंगल’च्या या कारभाराचे चटके लोहाऱ्यासह परिसरातील एक -दोन नव्हे, तर हजारो शेतकऱ्यांना सोसावे लागले आहेत. लोहारा तालुक्यातील खेड येथे लोकमंगल अ‍ॅग्रो या कंपनीच्या वतीने ‘लोकमंगल माऊली शुगर इंडस्ट्रीज’ या नावाने कारखाना सुरू करण्यात आला आहे. सदरील कारखाना उभारणीसाठी सुमारे दोन हजार शेतकऱ्यांच्या नावे ‘इको’ बँकेकडून कर्ज घेण्यात आले. विशेष म्हणजे सदरील कर्जप्रकरणे करताना शेतकऱ्यांना साधी कल्पनाही दिली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या डोक्यावर कर्ज आहे, याची पुसटशीही कल्पना नव्हती. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी दोन हजार शेतकऱ्यांपैकी काहीजणांना ‘इको’ बँकेकडून कर्जाचा भरणा करण्यासंदर्भात नोटीसा पाठविण्यात आल्या. त्यामुळे कसलेही कर्ज न घेता थेट वसुलीच्या नोटीसाच हातात पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यामुळे धास्तावलेल्या काही शेतकऱ्यांनी थेट ‘इको’ बँक गाठून संबंधित अधिकाऱ्यांकडे या कर्जाबाबत विचारणा केली. त्यानंतर हा सर्व गोंधळ समोर आला. त्यावर शेतकऱ्यांनी याबाबत ‘लोकमंगल’कडे तक्रारी केल्या. तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर ‘लोकमंगल’कडून उपरोक्त कर्ज रकमेची परतफेड करण्यात आल्याचे बँकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, रकमेची परफेड झाली असली तरी संबंधित शेतकऱ्यांना मागील पाच ते सहा महिने प्रचंड मानसिक आणि अर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले.