शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

‘हत्ती मोहीम’ पुस्तकातून देशभरात

By admin | Updated: March 19, 2015 23:51 IST

सिंधुदुर्ग वनविभागाचा उपक्रम : ‘मिशन एलिफंट’ इंग्रजीतून प्रसिद्ध

अनंत जाधव - सावंतवाडी -- महाराष्ट्रात प्रथमच सिंधुदुर्ग वनविभागाने यशस्वीपणे राबवलेली हत्ती पकड मोहीम आता पुस्तकरुपाने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे. यासाठी वनविभागाने ‘मिशन एलिफंट’ या नावाने इंग्रजीतून पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाच्या पहिल्या प्रती देशाचे वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आल्या आहेत. मोहिमेत विशेष लक्ष घालणारे खासदार विनायक राऊत यांनी हे पुस्तक केंद्रीयमंत्री व खासदारांना सुपूर्द केले आहे.जिल्ह्यात मार्च २०१३ मध्ये दाखल झालेल्या उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी जिल्ह्यात तळ ठोकलेल्या चार हत्तींचा अभ्यास केला. उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून हत्ती पकड मोहिमेला परवानगी मिळविली. परवानगी मिळाल्यानंतर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कर्नाटक सरकारशी संपर्क साधला. वनमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार यांचीही मदत घेतली. ८ ते १६ फेबु्रवारी २०१५ या अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत मोहीम यशस्वी झाली. सिंधुदुर्गवासीयांबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यात या यशस्वी मोहीमेची गाथा जावी, यासाठी वनविभागाने या मोहिमेची खास पुस्तकरुपी माहिती तयार केली आहे. या पुस्तकात हत्ती पकड मोहिमेबरोबरच हत्तींनी गेल्या काही वर्षात केलेले नुकसान तसेच हत्तीहल्ल्यात मृत पावलेले व जखमी ग्रामस्थ या माहितीसह मोहिमेसाठी कोणी कसे प्रयत्न केले, कर्नाटकमधून कोणत्या जंगलातून हत्ती आले, तसेच त्यांना लागणारी साधन सामुग्री, येथील हवामान याबाबतची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे. हे पुस्तक उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांच्या कल्पनेतून तयार झाले असून, त्यांना सहाय्यक उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी यांचीही साथ लाभली आहे.सध्या या पुस्तकाच्या प्रती इंग्रजीमधून प्रसिद्ध करण्यात आल्या असून, वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर यांना पुस्तके देण्यात आली आहेत. खासदार विनायक राऊत यांनी हे पुस्तक संसदेत केंद्रीय मंत्री व खासदारांना प्रदान केले.मोहीम स्मरणात राहण्यासाठी पुस्तक : एस. रमेशकुमारमोहीम आमच्यासाठी महत्त्वाची होती आणि ती यशस्वीही झाली. पुस्तकरुपाने ही मोहीम लोकांच्या कायम स्मरणात रहावी, यासाठी पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे, असे मत उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी व्यक्त केले.