शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमुळे सहिष्णुतेला धोका

By admin | Updated: July 27, 2014 01:43 IST

खोटी आश्वासने, भूलथापा देऊन केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचे पहिल्या 50 दिवसांतच खरे स्वरूप समोर आले.

औरंगाबाद : खोटी आश्वासने, भूलथापा देऊन केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचे पहिल्या 50 दिवसांतच खरे स्वरूप समोर आले. या सरकारमुळे देशातील बंधुभाव, सहिष्णुतेला धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील सुज्ञ जनता राज्यात त्यांना थारा देणार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी मोदी सरकारवर केला. 
काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे अध्यक्षस्थानी होते. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण, राज्यमंत्री डी. पी. सावंत, दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री अमित देशमुख, युवक काँग्रेसचे अध्यक्ष खा. राजीव सातव, खा. रजनी पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा कमल व्यवहारे यांची या वेळी मंचावर प्रमुख उपस्थिती होती. 
मुख्यमंत्री म्हणाले, की लोकसभेचा निकाल अनपेक्षित होता. आम्ही परंपरागतपणो लढलो व त्यांनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्याविरुद्ध नकारात्मक प्रचार केला. परंतु पहिल्या 5क् दिवसांत लोकांना चूक उमगली आहे. ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ म्हणत सत्तेवर आलेल्या सरकारने सर्वच क्षेत्रंत महागाई करून जनतेला फसविले आहे. देशाचे विघटन करणा:या प्रवृत्तीला वेळीच रोखा, असे आवाहन  मोहन प्रकाश यांनी केले. सत्तेवर येताच 1क्क् दिवसांत महागाई कमी करू, असे आश्वासन देऊन मतदारांना भूलथापा देणा:या मोदी सरकारने प्रचारात देशी-विदेशी कंपन्या व उद्योगपतींना उतरविले होते, असा आरोप प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी केला.
 लोकसभेच्या वेळची लाट आता  ओसरेल, असा विश्वास महसूलमंत्री थोरात यांनी व्यक्त केला, तर कारगील विजयी दिनानिमित्त कारगील शहिदांना अभिवादन करून शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले, 574 सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावून हा विजय आम्हाला मिळवून दिला. देशाची एकात्मता, बंधुभाव टिकणार की नाही, सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र राहणार की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 
या वेळी परिवहन मंत्री मधुकर चव्हाण, दुग्ध, पशुसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री डी. पी. सावंत, राज्यमंत्री अमित देशमुख यांचीही भाषणो झाली. (प्रतिनिधी)