शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

ग्रामपंचायतीतही पक्षांतरबंदीचा विचार, राज्य सरकार अनुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:04 PM

Gram Panchayat, State Government, Proposal, Law and Justice Department, maharastra संसद व विधिमंडळाप्रमाणे ग्रामपंचायतीतही पक्षांतरबंदी कायदा लागू करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे. यासाठी सत्तेतील तिन्ही पक्षांत एकमत झाले असून, हा प्रस्ताव विधि व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतीतही पक्षांतरबंदीचा विचारराज्य सरकार अनुकूल : विधि व न्याय विभागाकडे प्रस्ताव

राजाराम लोंढे 

कोल्हापूर : संसद व विधिमंडळाप्रमाणे ग्रामपंचायतीतही पक्षांतरबंदी कायदा लागू करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे. यासाठी सत्तेतील तिन्ही पक्षांत एकमत झाले असून, हा प्रस्ताव विधि व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला आहे.ग्रामपंचायत हेच राजकारणाचा पाया असून आज संसद व विधिमंडळात दिसणाऱ्या चेहऱ्यांपैकी बहुतांश जणांची सुरुवात ग्रामपंचायतीपासूनच झालेली आहे. त्यात ज्याची गावात सत्ता त्याचे तालुक्याच्या राजकारणात दबदबा असतो. मात्र फोडाफोडीच्या राजकारणामुळे ग्रामपंचायतीमधील सत्तेचा लंबक नेहमी हलता राहतो. त्याचा परिणाम विकासकामांवर होतो.

यासाठी भाजप सरकारने थेट जनतेतून सरपंच निवड करीत अडीच वर्षे सरपंचांवर अविश्वास ठराव आणता येणार नाही, अशी कायद्यात दुरुस्ती केली होती. यामुळे सरपंचांना काम करण्यास मोकळीक मिळाली होती. मात्र राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तातडीने थेट सरपंचपदाचा निर्णय बदलण्यात आला आणि पूर्वीप्रमाणे सदस्यांमधूनच सरपंच निवड कायम ठेवली. याला महाराष्ट्र सरपंच परिषदेने हरकत घेतली होती.

थेट सरपंच निवड कायम ठेवण्याचा आग्रह धरला होता. मात्र थेट सरपंचाला राज्यातील १०० हून अधिक आमदारांचा विरोध असल्याने सरकारने निर्णय घेतल्याचे त्यांना सांगण्यात आले. ग्रामपंचायत पातळीवर पॅनल व पक्षांतर बंदीबाबत कायदेशीर बाबीची चाचपणी करण्यासाठी प्रस्ताव विधि व न्याय विभागाकडे पाठवला आहे.ग्रामपंचायतींना स्थिरता येईल

काठावरचे बहुमत असते, तिथे विकासकामांपेक्षा सत्तेची खुर्ची टिकवण्यासाठीच सगळ्या तडजोडी कराव्या लागतात. पक्षांतर बंदीचा कायदा लागू झाला तर सदस्यांना उड्या मारता येणार नाहीत. परिणामी ग्रामपंचायत स्थिर राहून विकासकामांना गती येऊ शकते.

थेट सरपंच निवडीचा आमचा आग्रह होता; मात्र आमदारांचाच विरोध असल्याने सरकारने तो रद्द केला. किमान पक्षांतरबंदीचा कायदा करून ग्रामपंचायती स्थिर करण्याचा आग्रह आमचा होता. त्यात थोडेफार यश येत आहे.- दत्ता काकडे, अध्यक्ष, सरपंच परिषद, मुंबई 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्रsarpanchसरपंच