शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

'जे संपर्कात होते, ते आजही आहेत; आता खरी मजा येईल'; नितेश राणेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 14:23 IST

बाजारात अनेक आमदार आहेत, काही येणार आहेत काही सीमेवर आहेत. महाराष्ट्रात जे काही घडलं तो भूकंप नसून ही गोष्ट घडणार होती, असे नारायण राणे म्हणाले होते.

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यात अजित पवारांनी केलेलं बंड महाविकासआघाडीच्या सरकार स्थापनेला सुरुंग लावणारं ठरले होते. त्यातच माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी बाजारात अनेक आमदार आहेत, एक दोन आमदार राष्ट्रवादीत गेल्याने फरक पडत नसल्याचे म्हटले होते. यावर आज नितेश राणेंना विचारले असता त्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. 

बीबीसी मराठीशी बोलताना नारायण राणे म्हणाले होते की, बाजारात अनेक आमदार आहेत, काही येणार आहेत काही सीमेवर आहेत. महाराष्ट्रात जे काही घडलं तो भूकंप नसून ही गोष्ट घडणार होती. भाजपा सरकार बनविणार असं मी आठवडाभरापूर्वी सांगितलं होतं. हे सरकार ५ वर्ष टिकेल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार दोघंही अनुभवी नेते, याचा फायदा भाजपाला अन् जनतेला होईल असं त्यांनी सांगितले होते. 

यावर नारायण राणे अपयशी ठरले का, असा प्रश्न बीबीसीकडून विचारण्यात आला. तेव्हा शपथविधीहून विधिमंडळाच्या आवारात आलेल्या नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आधी आम्ही प्रश्न विचारायचो त्याचे उत्तर मातोश्रीवरून येत नव्हते. आता त्यांना उत्तरे द्यावीच लागतील, असा टोला लगावला आहे. याचबरोबर अजित पवार कौटुंबिक दबावामुळे मागे गेले असतील. पण आधी जे संपर्कात होते ते आजही आहेत. पुढील काळात गरज पडेल तेव्हा ते दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

तसेच निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरेंसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या त्यांच्याच वक्तव्याबाबत छेडले असता नितेश यांनी आता खांदा शोधतोय असे मिश्किल उत्तर दिले. खांदा गर्दीत शोधतोय, असे सांगत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तरुण नेत्यांचीही नावे घेतली. इथे विश्वजित कदमांचाही खांदा आहे, सिद्धिकीचाही आहे, रोहित पवारचाही खांदा आहे, ज्याचा मिळेल त्याच्यासोबत काम करेन, असे ते म्हणाले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार