शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

'जे संपर्कात होते, ते आजही आहेत; आता खरी मजा येईल'; नितेश राणेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 14:23 IST

बाजारात अनेक आमदार आहेत, काही येणार आहेत काही सीमेवर आहेत. महाराष्ट्रात जे काही घडलं तो भूकंप नसून ही गोष्ट घडणार होती, असे नारायण राणे म्हणाले होते.

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यात अजित पवारांनी केलेलं बंड महाविकासआघाडीच्या सरकार स्थापनेला सुरुंग लावणारं ठरले होते. त्यातच माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी बाजारात अनेक आमदार आहेत, एक दोन आमदार राष्ट्रवादीत गेल्याने फरक पडत नसल्याचे म्हटले होते. यावर आज नितेश राणेंना विचारले असता त्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. 

बीबीसी मराठीशी बोलताना नारायण राणे म्हणाले होते की, बाजारात अनेक आमदार आहेत, काही येणार आहेत काही सीमेवर आहेत. महाराष्ट्रात जे काही घडलं तो भूकंप नसून ही गोष्ट घडणार होती. भाजपा सरकार बनविणार असं मी आठवडाभरापूर्वी सांगितलं होतं. हे सरकार ५ वर्ष टिकेल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार दोघंही अनुभवी नेते, याचा फायदा भाजपाला अन् जनतेला होईल असं त्यांनी सांगितले होते. 

यावर नारायण राणे अपयशी ठरले का, असा प्रश्न बीबीसीकडून विचारण्यात आला. तेव्हा शपथविधीहून विधिमंडळाच्या आवारात आलेल्या नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आधी आम्ही प्रश्न विचारायचो त्याचे उत्तर मातोश्रीवरून येत नव्हते. आता त्यांना उत्तरे द्यावीच लागतील, असा टोला लगावला आहे. याचबरोबर अजित पवार कौटुंबिक दबावामुळे मागे गेले असतील. पण आधी जे संपर्कात होते ते आजही आहेत. पुढील काळात गरज पडेल तेव्हा ते दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

तसेच निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरेंसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या त्यांच्याच वक्तव्याबाबत छेडले असता नितेश यांनी आता खांदा शोधतोय असे मिश्किल उत्तर दिले. खांदा गर्दीत शोधतोय, असे सांगत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तरुण नेत्यांचीही नावे घेतली. इथे विश्वजित कदमांचाही खांदा आहे, सिद्धिकीचाही आहे, रोहित पवारचाही खांदा आहे, ज्याचा मिळेल त्याच्यासोबत काम करेन, असे ते म्हणाले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार