शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

'जे संपर्कात होते, ते आजही आहेत; आता खरी मजा येईल'; नितेश राणेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 14:23 IST

बाजारात अनेक आमदार आहेत, काही येणार आहेत काही सीमेवर आहेत. महाराष्ट्रात जे काही घडलं तो भूकंप नसून ही गोष्ट घडणार होती, असे नारायण राणे म्हणाले होते.

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यात अजित पवारांनी केलेलं बंड महाविकासआघाडीच्या सरकार स्थापनेला सुरुंग लावणारं ठरले होते. त्यातच माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी बाजारात अनेक आमदार आहेत, एक दोन आमदार राष्ट्रवादीत गेल्याने फरक पडत नसल्याचे म्हटले होते. यावर आज नितेश राणेंना विचारले असता त्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. 

बीबीसी मराठीशी बोलताना नारायण राणे म्हणाले होते की, बाजारात अनेक आमदार आहेत, काही येणार आहेत काही सीमेवर आहेत. महाराष्ट्रात जे काही घडलं तो भूकंप नसून ही गोष्ट घडणार होती. भाजपा सरकार बनविणार असं मी आठवडाभरापूर्वी सांगितलं होतं. हे सरकार ५ वर्ष टिकेल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार दोघंही अनुभवी नेते, याचा फायदा भाजपाला अन् जनतेला होईल असं त्यांनी सांगितले होते. 

यावर नारायण राणे अपयशी ठरले का, असा प्रश्न बीबीसीकडून विचारण्यात आला. तेव्हा शपथविधीहून विधिमंडळाच्या आवारात आलेल्या नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आधी आम्ही प्रश्न विचारायचो त्याचे उत्तर मातोश्रीवरून येत नव्हते. आता त्यांना उत्तरे द्यावीच लागतील, असा टोला लगावला आहे. याचबरोबर अजित पवार कौटुंबिक दबावामुळे मागे गेले असतील. पण आधी जे संपर्कात होते ते आजही आहेत. पुढील काळात गरज पडेल तेव्हा ते दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

तसेच निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरेंसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या त्यांच्याच वक्तव्याबाबत छेडले असता नितेश यांनी आता खांदा शोधतोय असे मिश्किल उत्तर दिले. खांदा गर्दीत शोधतोय, असे सांगत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तरुण नेत्यांचीही नावे घेतली. इथे विश्वजित कदमांचाही खांदा आहे, सिद्धिकीचाही आहे, रोहित पवारचाही खांदा आहे, ज्याचा मिळेल त्याच्यासोबत काम करेन, असे ते म्हणाले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार