शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मुलांसाठी ‘वारांगना सखी’चा वसा

By admin | Updated: June 9, 2015 02:50 IST

वेश्यांची मुले चोरी, गुन्हेगारीसारख्या विळख्यात अडकू नये नयेत आणि त्यांचे भवितव्य लखलखीत व्हावे यासाठी येथील वारांगना सखी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.

विश्वास पाटील, कोल्हापूरवेश्यांची मुले चोरी, गुन्हेगारीसारख्या विळख्यात अडकू नये नयेत आणि त्यांचे भवितव्य लखलखीत व्हावे यासाठी येथील वारांगना सखी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. गरोदर असल्यापासूनच देहविक्रय करणाऱ्या महिलांचे प्रबोधन करून ही मुले चांगल्या स्वयंसेवी संस्थांमार्फत समाजाच्या मुख्य प्रवाहात यावीत, असे प्रयत्न सुरू केले आहेत.कोल्हापुरात शरीरविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांचे संस्थेकडे अधिकृत नोंदणी झाली आहे. यातील बहुतांश विवाहित आहेत. कौटुंबिक वादातून कुठेच आधार न मिळाल्यास त्या नाइलाजाने या व्यवसायात येतात. भाड्याने खोली घेऊन राहतात. पुरुषांसमवेतच्या संबंधातून जन्माला येणारी मुले सांभाळण्याची जबाबदारी त्या महिलांवरच असते.ही मुले आईसोबतच ‘वेश्येची मुले’ हा शिक्का घेऊन वाढतात व पुन्हा गुन्हेगारीच्या चक्रात येतात. मुली असतील तर त्या पुन्हा याच व्यवसायात येतात. हे चक्र भेदायचे असेल तर मुलांना आईपासून लहानपणीच तोडले पाहिजे, असा विचार करून या संघटनेने पाऊल टाकले आहे.वेश्या गरोदर असल्यापासूनच संघटना त्यांची देखभाल करीत आहे. एखाद्या महिलेस मूल झाल्यावर कोल्हापुरातील स्वयंसेवी संस्थांमध्ये दाखल करून तिथून त्याचे चांगल्या कुटुंबात दत्तक प्रक्रियेमार्फत कसे पुनर्वसन करता येईल, याच्या प्रयत्नात संघटना असते. वेश्यानां अडचणीच्या काळात संस्था मदत करत असल्याने हा विषय चर्चेत आला.चाळीस-बेचाळीस वयानंतर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला रोज पोट भरण्याएवढेही पैसे मिळत नाहीत. अशावेळी पदरी असलेल्या मुलांच्या संगोपनाचे काय करायचे हा मोठा प्रश्न असतो. या मुलांचे आयुष्य चुरगळले जाऊ नये यासाठीच आम्ही संघटनेच्या माध्यमातून या महिलांमध्ये प्रबोधन करून मुलांना दत्तक देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.- शारदा यादव, अध्यक्षा, वारांगना सखी संघटना, कोल्हापूर