शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

‘...तर सरकारसोबत राहण्याबाबत विचार करू’

By admin | Updated: December 30, 2014 01:12 IST

तर आम्ही सरकारसोबत राहण्याबाबत विचार करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला.

सोलापूर : आमच्या आंदोलनामुळेच पाचशेचा दर अडीच हजार झाला. सर्व बाजूंनी शेतकरी भरडत असताना शासनाने शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका घेतली नाही, तर आम्ही सरकारसोबत राहण्याबाबत विचार करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला.ऊस दर व अन्य शेतकरी प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खा़ राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ मोर्चानंतर शेट्टी म्हणाले, मागील १५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमची लढाई सुरू आहे. आम्ही आजवर आंदोलनेच केल्यामुळेच साखर कारखानदारांना उसाला भाव द्यावा लागला आहे. दूध व उसाची परवड होत असताना आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही. उसाला एफआरपीप्रमाणे दर देणे साखर कारखानदारांना बंधनकारक आहे. दर न दिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार शेतकऱ्यांनी उलथून टाकले आहे. ही वेळ शिवसेना-भाजपाच्या सरकारवर येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. तसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील तसेच साखर आयुक्तांसोबत चर्चा झाली आहे. एफआरपीची तोडफोड करून १५०० रुपयांचा दर देणे चुकीचे आहे. ऊस गेल्यानंतर १४ दिवसांत एफआरपीनुसार विनाकपात उसाला दर देणे कायद्याने कारखानदारांवर बंधनकारक आहे. तसे होत नसल्यानेच मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. आता कारखानदारांच्या दबावापुढे न झुकता कायद्याचे पालन शासनाने केले पाहिजे. तसे झाले नाही, तर आम्हाला सरकार सोबत राहण्याबाबत विचार करावा लागेल, असा इशारा खा. शेट्टी यांनी दिला़