शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

कोर्लईतील ठाकरेंची साडे नऊ एकर जमीन पण १९ बंगले कागदावरच; सरपंचांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 12:45 IST

जेव्हा या जागेचा मुद्दा चर्चेत आला, तेव्हा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गेल्यावर्षी तेथे जाऊन पाहणी केली, तेव्हा घरे, जोते पाडून टाकल्याचे आढळून आले असं सरपंचांनी सांगितले.

रायगड :  अलिबागच्या मुरुड-कोर्लई येथे रश्मी ठाकरे, मनीषा वायकर यांच्या नावावर साडेनऊ एकर जमीन असली, तरी त्यावर फक्त झाडे लावलेली आहेत. तेथे एकही घर नाही. या जागेवर ठाकरेंच्या मालकीचे १९ बंगले असल्याचे वृत्त निराधार असून, हे बंगले कागदावरच असल्याचे वास्तव कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी उघड केले आहे.  

येथील जमीन आधी अन्वय नाईक यांनी खरेदी केली होती. या जागेवर रिसॉर्ट उभारण्याची त्यांची कल्पना होती. मात्र जमीन सीआरझेडमध्ये येत असल्याने ती योजना रद्द करून त्यांनी ती रश्मी ठाकरे, मनीषा वायकर यांना विकली. सध्या तेथे नारळाची झाडे, गुरांचा गोठा, पंप शेड, विहीर, पाण्याच्या टाक्या, साठवण तलाव आहे. या  जमिनीवर १८ कच्ची घरे होती. नंतर ती पाडून टाकण्यात आली. मात्र ग्रामपंचायतीला त्याची कल्पना नव्हती. या जागेला कुलूप असल्याने त्याची पाहणी केलेली नव्हती. त्यामुळे घरे अस्तित्वात आहेत, हे गृहीत धरून त्यासाठी साडेतीन हजारांचा कर आकारण्यात आला. तो ऑनलाइन पद्धतीने ठाकरे कुटुंबीयांनी भरला. पण यासंदर्भात रश्मी ठाकरे यांनी कोणताही माफीनामा दिला नसल्याचे व त्याची ग्रामपंचायतीच्या दफ्तरी नोंद नसल्याचे मिसाळ यांनी स्पष्ट केले.

जेव्हा या जागेचा मुद्दा चर्चेत आला, तेव्हा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गेल्यावर्षी तेथे जाऊन पाहणी केली, तेव्हा घरे, जोते पाडून टाकल्याचे आढळून आले. घरे अस्तित्वात नसल्याने त्यांची नोंद रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ठाकरेंच्या नावावर अलिबागमध्ये कोर्लेई गावात १९ बंगले असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारच्या पत्रकार परिषदेत हा दावा खोडून काढला. तुम्हाला जर ते बंगले दिसले, तर मी राजकारण सोडेन आणि दिसले नाहीत, तर त्या सोमय्यांना जोड्याने मारा, असे विधान राऊत यांनी केले होते. 

रश्मी ठाकरे यांचा माफीनामा नाहीघरे अस्तित्वात आहेत, हे गृहीत धरून त्यासाठी साडेतीन हजारांचा कर आकारण्यात आला. तो ऑनलाइन पद्धतीने ठाकरे कुटुंबीयांनी भरला. पण यासंदर्भात रश्मी ठाकरे यांनी कोणताही माफीनामा दिला नसल्याचे व त्याची ग्रामपंचायतीच्या दफ्तरी नोंद नाही असे मिसाळ म्हणाले. 

कोणत्याही ठाकरेंनी कधीही भेट दिली नाही!

अन्वय नाईक यांनी २००९ मध्ये रिसॉर्टसाठी परवानगी मागितली होती. त्या काळात त्यांनी काही बांबूची घरे, जोते बांधले होते. मात्र त्यांना रिसॉर्टची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी रिसॉर्टचा प्लॅन रद्द करून तेथे झाडे लावली. पुढे २०१४ ला त्यांनी ही जागा रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांना विकली. त्यानंतर २०१५ ते २०१९ या काळात त्यांच्यापैकी कुणीही इथे आले नाही. २०१९ मध्ये आम्ही पत्र पाठवून २०१४ पासून ते २०१९ पर्यंतची घरपट्टीची थकबाकी भरावी, अशी रीतसर नोटीस पाठवली. त्यानंतर २०१९ ला आरटीजीएसने ही घरपट्टी भरण्यात आली. 

घरपट्टी भरल्यानंतर पुढील काळात ही जागा चर्चेत आल्यावर आम्ही त्या फार्महाऊसवर गेलो, तेव्हा आमच्या लक्षात आले की, तेथे अशा प्रकारची कुठलीही घरे नसताना त्यांच्याकडून कर आकारणी झाली आहे. त्यासंदर्भात माहिती घेतल्यावर कळले की, २०१३-१४ ला तेथील बांबूची घरे तोडून झाडे लावण्यात आली आहेत. 

२०१९ ला जी घरे नावावर होती, त्या घरांचा कर ग्रामपंचायतीने २०२१ पर्यंत घेतला. पाहणी केल्यावर आम्ही त्या घरांची नोंद रद्द केली. - प्रशांत मिसाळ, सरपंच कोर्लई 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतKirit Somaiyaकिरीट सोमय्या