शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

कोर्लईतील ठाकरेंची साडे नऊ एकर जमीन पण १९ बंगले कागदावरच; सरपंचांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 12:45 IST

जेव्हा या जागेचा मुद्दा चर्चेत आला, तेव्हा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गेल्यावर्षी तेथे जाऊन पाहणी केली, तेव्हा घरे, जोते पाडून टाकल्याचे आढळून आले असं सरपंचांनी सांगितले.

रायगड :  अलिबागच्या मुरुड-कोर्लई येथे रश्मी ठाकरे, मनीषा वायकर यांच्या नावावर साडेनऊ एकर जमीन असली, तरी त्यावर फक्त झाडे लावलेली आहेत. तेथे एकही घर नाही. या जागेवर ठाकरेंच्या मालकीचे १९ बंगले असल्याचे वृत्त निराधार असून, हे बंगले कागदावरच असल्याचे वास्तव कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी उघड केले आहे.  

येथील जमीन आधी अन्वय नाईक यांनी खरेदी केली होती. या जागेवर रिसॉर्ट उभारण्याची त्यांची कल्पना होती. मात्र जमीन सीआरझेडमध्ये येत असल्याने ती योजना रद्द करून त्यांनी ती रश्मी ठाकरे, मनीषा वायकर यांना विकली. सध्या तेथे नारळाची झाडे, गुरांचा गोठा, पंप शेड, विहीर, पाण्याच्या टाक्या, साठवण तलाव आहे. या  जमिनीवर १८ कच्ची घरे होती. नंतर ती पाडून टाकण्यात आली. मात्र ग्रामपंचायतीला त्याची कल्पना नव्हती. या जागेला कुलूप असल्याने त्याची पाहणी केलेली नव्हती. त्यामुळे घरे अस्तित्वात आहेत, हे गृहीत धरून त्यासाठी साडेतीन हजारांचा कर आकारण्यात आला. तो ऑनलाइन पद्धतीने ठाकरे कुटुंबीयांनी भरला. पण यासंदर्भात रश्मी ठाकरे यांनी कोणताही माफीनामा दिला नसल्याचे व त्याची ग्रामपंचायतीच्या दफ्तरी नोंद नसल्याचे मिसाळ यांनी स्पष्ट केले.

जेव्हा या जागेचा मुद्दा चर्चेत आला, तेव्हा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गेल्यावर्षी तेथे जाऊन पाहणी केली, तेव्हा घरे, जोते पाडून टाकल्याचे आढळून आले. घरे अस्तित्वात नसल्याने त्यांची नोंद रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ठाकरेंच्या नावावर अलिबागमध्ये कोर्लेई गावात १९ बंगले असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारच्या पत्रकार परिषदेत हा दावा खोडून काढला. तुम्हाला जर ते बंगले दिसले, तर मी राजकारण सोडेन आणि दिसले नाहीत, तर त्या सोमय्यांना जोड्याने मारा, असे विधान राऊत यांनी केले होते. 

रश्मी ठाकरे यांचा माफीनामा नाहीघरे अस्तित्वात आहेत, हे गृहीत धरून त्यासाठी साडेतीन हजारांचा कर आकारण्यात आला. तो ऑनलाइन पद्धतीने ठाकरे कुटुंबीयांनी भरला. पण यासंदर्भात रश्मी ठाकरे यांनी कोणताही माफीनामा दिला नसल्याचे व त्याची ग्रामपंचायतीच्या दफ्तरी नोंद नाही असे मिसाळ म्हणाले. 

कोणत्याही ठाकरेंनी कधीही भेट दिली नाही!

अन्वय नाईक यांनी २००९ मध्ये रिसॉर्टसाठी परवानगी मागितली होती. त्या काळात त्यांनी काही बांबूची घरे, जोते बांधले होते. मात्र त्यांना रिसॉर्टची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी रिसॉर्टचा प्लॅन रद्द करून तेथे झाडे लावली. पुढे २०१४ ला त्यांनी ही जागा रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांना विकली. त्यानंतर २०१५ ते २०१९ या काळात त्यांच्यापैकी कुणीही इथे आले नाही. २०१९ मध्ये आम्ही पत्र पाठवून २०१४ पासून ते २०१९ पर्यंतची घरपट्टीची थकबाकी भरावी, अशी रीतसर नोटीस पाठवली. त्यानंतर २०१९ ला आरटीजीएसने ही घरपट्टी भरण्यात आली. 

घरपट्टी भरल्यानंतर पुढील काळात ही जागा चर्चेत आल्यावर आम्ही त्या फार्महाऊसवर गेलो, तेव्हा आमच्या लक्षात आले की, तेथे अशा प्रकारची कुठलीही घरे नसताना त्यांच्याकडून कर आकारणी झाली आहे. त्यासंदर्भात माहिती घेतल्यावर कळले की, २०१३-१४ ला तेथील बांबूची घरे तोडून झाडे लावण्यात आली आहेत. 

२०१९ ला जी घरे नावावर होती, त्या घरांचा कर ग्रामपंचायतीने २०२१ पर्यंत घेतला. पाहणी केल्यावर आम्ही त्या घरांची नोंद रद्द केली. - प्रशांत मिसाळ, सरपंच कोर्लई 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतKirit Somaiyaकिरीट सोमय्या