शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींच्या गळतीचे प्रमाण शून्यावर आणणार : तावडे

By admin | Updated: December 2, 2014 00:12 IST

अडीच वर्षांत राज्यावरील कर्ज फेडू : तावडे

राजापूर : शाळांमधील स्वच्छतागृहांचा अभाव तसेच शैक्षणिक व्यवस्थेतील इतर अडचणी दूर करून विद्यार्थिनींच्या शाळा सोडण्याचे प्रमाण येत्या पाच वर्षांत शून्यावर आणण्यात येईल, असा निर्धार शालेय शिक्षण, क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज, सोमवारी आडिवरे (ता. राजापूर) येथे व्यक्त केला. कोकणातील शैक्षणिक गुणवत्तेला संधी देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी ठोस प्रस्ताव घेऊन पुढे यावे. त्यांच्या प्रस्तावांचा सकारात्मक विचार केला जाईल, असा विश्वासही त्यांनी कोकणवासीयांना दिला.क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या आडिवरे येथील तावडे अतिथी भवनाचे भूमिपूजन आज मंत्री तावडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामदैवत किंवा कुलदैवत हा आपल्या श्रद्धेचा, इतिहासाचा आणि संस्कृतीचा भाग आहे. ज्या मातीतून आपण जन्माला आलो, त्या मातीचा अभिमान बाळगणे आणि तिथली मुळे घट्ट करणे, ही परंपरा जपणारी तसेच बळ देणारी गोष्ट आहे. यश आणि पदाच्या बरोबरीने येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हे बळ उपयोगी पडते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. येत्या पाच वर्षांत राज्याचा विकास करताना कोकणच्या सर्वांगीण विकासावर आपला विशेष भर राहणार असल्याचे सांगतानाच कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.मंडळाचे अध्यक्ष इंद्रनील तावडे, सचिव सतीश तावडे, उपाध्यक्ष दिनकर तावडे, माजी आमदार प्रमोद जठार, संजय यादवराव, आदींसह राज्याच्या सर्वदूर भागातून आलेले मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी विनोद तावडे यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांशी विकासकामांची सद्य:स्थिती आणि त्यांच्या अंमलबजावणीतील अडचणी सोडविण्याबाबत चर्चा केली. शासकीय कार्यालयांसाठी आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करणे, रस्त्यांच्या विकास प्रक्रियेला गती देणे, शैक्षणिक उपक्रमांसाठी प्रलंबित मंजुरी तातडीने देणे, पर्यावरणाचे प्रलंबित प्रश्न सोडविणे, आदींबाबतही यावेळी चर्चा झाली. जिल्हा पोलीस प्रमुखांकडून त्यांनी यावेळी कायदा-सुव्यवस्थेचाही आढावा घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे, आदी अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) अडीच वर्षांत राज्यावरील कर्ज फेडू : तावडेकणकवली : शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेईन आणि मग राज्याचे शैक्षणिक धोरण ठरवेन, असे सांगून राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. भ्रष्टाचारामुळे यातील बरेचसे कर्ज झाले आहे. आम्ही आहोत तर भ्रष्टाचार होणार नाही आणि विकासही गतिमान होईल. त्यामुळे हे कर्ज येत्या अडीच वर्षांत फेडणे शक्य होईल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जानवली येथे प्रतिनिधींशी संवाद कार्यक्रमात व्यक्त केला. ‘शिवसेना सत्तेत सहभागी होणारच’दरम्यान, स्थिर सरकारसाठी युतीतील गुंता अद्याप सुटला नसला तरी भविष्यात शिवसेना सत्तेत नक्की सहभागी होऊन अभेद्य युतीचे सरकार पाच वर्षे स्थिर राहील, असा विश्वास राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आडिवरे येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राज्यातील विद्यमान सरकार हे राष्ट्रवादीच्या टेकूवर असल्यामुळे ते पाच वर्षे काढील, याची खात्री भाजपला नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्तेत सहभागी करता यावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना सत्तेत येईल आणि सरकार स्थिर असल्याचा दावाही तावडे यांनी केला.