शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
2
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
3
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
4
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
5
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
6
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?
7
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
8
पत्नीचं परपुरुषासोबत सुरू होत अफेयर, पतीला लागली कुणकुण अन् कांड झाला!
9
Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
10
Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत ईव्हीएमचा वापर का केला जात नाही?
12
"ते मला मराठीत म्हणाले...", उपेंद्र लिमयेने सांगितला रजनीकांत यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
14
Nepal Currency Value: भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
15
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
16
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
17
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."
18
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
19
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी
20
Shantanu Naidu: रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर

विद्यार्थ्यांना दिवाळी भेट !

By admin | Updated: October 14, 2016 03:56 IST

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सर्व समाजघटकांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य सरकारने आज विविध निर्णय घेत दिवाळीभेट दिली.

मुंबई : आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सर्व समाजघटकांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य सरकारने आज विविध निर्णय घेत दिवाळीभेट दिली. वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत असलेल्या समाजाच्या सर्व घटकांतील पालकांच्या पाल्यांची उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठीची शुल्क प्रतिपूर्ती आता राज्य शासन भरणार आहे. त्यासाठी राजर्षी शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा यासाठी काही मूठभर लोक प्रयत्न करीत आहेत.

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध शैक्षणिक सवलतींचे निर्णय घेण्यात आले. ईबीसीची मर्यादा वार्षिक एक लाख रुपये उत्पन्नावरून २.५० लाख इतकी करण्यात आली. या योजनेमुळे मराठा समाजाबरोबरच इतरही विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षण घेताना आर्थिक भार पडणार नाही. एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांनाच आतापर्यंत ही सवलत होती. आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणे ५० टक्के शुल्क प्रतिपूर्ती मिळेल. या योजनेचा लाभ शासकीय, शासन अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांना यावर्षीपासूनच मिळेल. अल्पभूधारक शेतकरी आणि मजुरांच्या मुलांना शहरात शिक्षण घेण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये (मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद) निवास व्यवस्थेसाठी वर्षाकाठी ३० हजार रुपये (दरमहा तीन हजार) तर जिल्ह्याच्या ठिकाणी २० हजार रु पये (दरमहा २ हजार रु.) यासाठी भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख योजना राबविण्यात येईल. साडेतीन लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. वसतिगृहांमधील प्रवेशापासून वंचित आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात राहणे, जेवण आदीसाठी सहा हजार रुपये, मध्यम शहरात पाच हजार व लहान शहरात तीन हजार रुपये महिन्याकाठी देणारी पं.दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येईल. पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील. येत्या मार्चपर्यंत तिन्ही योजनांसाठी १ हजार कोटींची तरतूद केली आहे.

समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी चुकीचे संदेश सोशल मीडियामध्ये पाठविले जात आहेत. एका समाजाने दुसऱ्या समाजाविरुध्द भूमिका घेऊ नये. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेले वर्तन सर्व समाज घटकांकडून झाले पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.(विशेष प्रतिनिधी)