शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

विद्यार्थ्यांना दिवाळी भेट !

By admin | Updated: October 14, 2016 03:56 IST

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सर्व समाजघटकांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य सरकारने आज विविध निर्णय घेत दिवाळीभेट दिली.

मुंबई : आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सर्व समाजघटकांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य सरकारने आज विविध निर्णय घेत दिवाळीभेट दिली. वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत असलेल्या समाजाच्या सर्व घटकांतील पालकांच्या पाल्यांची उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठीची शुल्क प्रतिपूर्ती आता राज्य शासन भरणार आहे. त्यासाठी राजर्षी शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा यासाठी काही मूठभर लोक प्रयत्न करीत आहेत.

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध शैक्षणिक सवलतींचे निर्णय घेण्यात आले. ईबीसीची मर्यादा वार्षिक एक लाख रुपये उत्पन्नावरून २.५० लाख इतकी करण्यात आली. या योजनेमुळे मराठा समाजाबरोबरच इतरही विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षण घेताना आर्थिक भार पडणार नाही. एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांनाच आतापर्यंत ही सवलत होती. आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणे ५० टक्के शुल्क प्रतिपूर्ती मिळेल. या योजनेचा लाभ शासकीय, शासन अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांना यावर्षीपासूनच मिळेल. अल्पभूधारक शेतकरी आणि मजुरांच्या मुलांना शहरात शिक्षण घेण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये (मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद) निवास व्यवस्थेसाठी वर्षाकाठी ३० हजार रुपये (दरमहा तीन हजार) तर जिल्ह्याच्या ठिकाणी २० हजार रु पये (दरमहा २ हजार रु.) यासाठी भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख योजना राबविण्यात येईल. साडेतीन लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. वसतिगृहांमधील प्रवेशापासून वंचित आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात राहणे, जेवण आदीसाठी सहा हजार रुपये, मध्यम शहरात पाच हजार व लहान शहरात तीन हजार रुपये महिन्याकाठी देणारी पं.दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येईल. पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील. येत्या मार्चपर्यंत तिन्ही योजनांसाठी १ हजार कोटींची तरतूद केली आहे.

समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी चुकीचे संदेश सोशल मीडियामध्ये पाठविले जात आहेत. एका समाजाने दुसऱ्या समाजाविरुध्द भूमिका घेऊ नये. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेले वर्तन सर्व समाज घटकांकडून झाले पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.(विशेष प्रतिनिधी)