शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

विद्यार्थ्यांना मराठी नीट समजेना, गणितही येईना; पायाभूत अध्ययन अभ्यासात राज्याची प्रगती ठीकठाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 11:25 IST

राज्यातील २२ टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही पेपर व पेन्सिलच्या साहाय्याने बेरीज- वजाबाकी येत नाही.

मुंबई : राज्यातील १७ टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही मराठीचे आकलन होत नसल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या लर्निंग फाउंडेशन स्टडीच्या अहवालातून स्पष्ट होत आहे. देशपातळीवर ही टक्केवारी १८ टक्के आहे. इंग्रजी आणि हिंदी विषयांच्या तोंडी आकलनाबाबत राज्य व देशाची सरासरी अनुक्रमे १२ व १५ टक्के अशी आहे. मात्र, शब्दांचे अर्थ उलगडताना किंवा अर्थ समजून घेताना मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या ५० पैकी ४१ विद्यार्थ्यांना ते सहज येते तर इंग्रजी व हिंदी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या ५० पैकी ४० विद्यार्थ्यांना ते समजणे सोपे जाते.  

तीन ते नऊ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा सुरुवातीचा भाषा विकास होण्यासाठी इयत्ता तिसरीपर्यंतच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागामार्फत निपुण भारत (मूलभूत साक्षरता संख्याज्ञान अभियान) अभियान राबविण्यात येत आहे. 

सर्वेक्षणाचे निष्कर्ष -राज्यातील २२ टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही पेपर व पेन्सिलच्या साहाय्याने बेरीज- वजाबाकी येत नाही.

- ८३% विद्यार्थ्यांना हाताच्या साहाय्याने आकडेमोड करता येत नाही. -५४% केवळ विद्यार्थ्यांना घड्याळात किती वाजले आहेत याचे ज्ञान आहे. त्यातील ३९ टक्के विद्यार्थ्यांना त्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागते आहे. - ४१% विद्यार्थ्यांना अपूर्णांकाबद्दलची माहिती नसून त्यांना ते बरोबर ओळखता येतात आणि ४३ टक्के विद्यार्थी ते योग्य पद्धतीने दाखवू शकतात. 

किमान प्रावीण्य पातळीवर पोहोचण्याची आवश्यकताजागतिक पातळीवरील भाषेतील किमान प्रावीण्य मिळविणाऱ्या राज्यातील मराठी भाषेतील विद्यार्थ्यांची टक्केवारी २८ टक्के असून इंग्रजी भाषेतील २२ टक्के तर हिंदी भाषेतील विद्यार्थी संख्या २० टक्के आहे. या प्रावीण्य रेषेच्या खालील विद्यार्थ्यांची संख्या मराठी भाषेत १३ टक्के इंग्रजीत १२ टक्के तर हिंदीमध्ये २५ टक्के आहे.

भाषा आणि गणितावर सर्वेक्षण आधारित२०२६-२७ पर्यंत निपुण भारत  हा कार्यक्रम सर्व राज्यांमध्ये समग्र शिक्षण अभियानाअंतर्गत चालविला जाणार आहे. याचअंतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या सूचनांप्रमाणे एससीईआरटीकडून २६ ते ३१ मार्चदरम्यान पायाभूत अध्ययन अभ्यास हे नमुना सर्वेक्षण राबविण्यात आले. विशेषतः तिसरीच्या प्रमुख भाषा व गणिती आकडेमोड यांच्या अध्ययन निकषपट्टीवर हे सर्वेक्षण आधारित आहे. या सर्वेक्षणातील विद्यार्थ्यांची राज्य स्तरावरील संपादणूक पातळी ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक चांगली असल्याचे दिसून आले आहे.    

 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाTeacherशिक्षकmarathiमराठी