शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

'वंचित'च्या ताठर भूमिकेमुळे भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्याला पाठबळ ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 5:01 PM

लोकसभा निवडणुकीत वंचितने आघाडीकडे महाराष्ट्रातील ४८ पैकी २४ जागांची मागणी केली होती. ही मागणी नक्कीच स्वीकार्ह नव्हती. त्यामुळे आघाडी होऊ शकली नाही. वंचितने तीच भूमिका विधानसभा निवडणुकीतही घेतल्याचे दिसून येते.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यश, मराठा आरक्षणाचा लागलेला निकाल आणि सध्या विरोधी पक्षातील नेत्यांचं सत्ताधारी पक्षांमध्ये होत असलेलं पक्षांतर यामुळे भारतीय जनता पक्ष राज्यात मजबूत झाला आहे. तर विरोधकांपुढे पक्षातील नेते टिकवून निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीने विरोधकांचे राहिलेले अवसानही गळून गेले आहे. वंचितने लोकसभेप्रमाणेच जागा वाटपाच्या बाबतीत ताठर भूमिका घेतल्यामुळे आघाडीत त्यांचा समावेश कठिण दिसत आहे. तस झाल्यास, याचा सत्ताधारी भाजपला स्वबळावर लढण्यास फायदाच होणार आहे.

२०१४ मध्ये भाजपचे स्वबळावर १२२ आमदार निवडून आले होते. यात नक्कीच भर पडणार अशी राज्यात आहे. शिवसेना भाजप युती झाल्यास भाजपला बहुमताला हव्या त्यापेक्षा कमी जागा लढविण्यासाठी मिळतील. बहुमतासाठी भाजपला २०१४ मध्ये मिळवलेल्या जागांमध्ये ३३ आमदारांची भर घालावी लागणार आहे. त्यामुळे भाजपकडून स्वबळावर निवडणुकीला सामोर जाण्याची चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच वंचित पक्ष आघाडीसोबत न गेल्यास याचा लाभ भाजपलाच होणार हे स्पष्टच आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचितने आघाडीकडे महाराष्ट्रातील ४८ पैकी २४ जागांची मागणी केली होती. ही मागणी नक्कीच स्वीकार्ह नव्हती. त्यामुळे आघाडी होऊ शकली नाही. वंचितने तीच भूमिका विधानसभा निवडणुकीतही घेतल्याचे दिसून येते. वंचितने काँग्रेसला ४० जागांची ऑफर दिली आहे. मुळातच गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ४० जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसमधून वंचितशी चर्चा करण्यास कुणी इच्छूक दिसत नाही. तर वंचितही आघाडीसाठी नवनवीन अटी घालत आहे. त्यामुळे वंचित आघाडीत येणे अशक्यप्राय दिसत आहे.

दरम्यान वंचितने स्वबळावर निवडणूक लढविल्यास भाजपही पुन्हा एकदा स्वबळावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे, आघाडीला मिळणारी मतं वंचितमुळे विभागली जाणार आहे. तर राज्यात भाजपची ताकत शिवसेनापेक्षा नक्कीच अधिक आहे. त्यामुळे स्वबळावर लढल्यास भाजपला बहुमताचा आकडा गाठणे कठिण होणार नाही. त्यामुळे वंचित फॅक्टर विधानसभेला भाजपला स्वबळावर लढण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.