शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला सकारात्मकतेची गरज

By admin | Updated: June 21, 2014 01:17 IST

कोणताही नवीन प्रकल्प हाती घेतला तर टीका सहन करावी लागते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरताना मलाही ती सहन करावी लागलीच; पण मी ती सहन केली.

मुंबई : कोणताही नवीन प्रकल्प हाती घेतला तर टीका सहन करावी लागते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरताना मलाही ती सहन करावी लागलीच; पण मी ती सहन केली. मात्र आता महाराष्ट्राने हा नकारात्मकपणा सोडला पाहिजे आणि चांगल्या बाबींना प्रोत्साहन देत सकारात्मक झाले पाहिजे, अशी अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
मॅक्सेल फाउंडेशनच्या वतीने उद्योगधंद्यात भरारी घेणा:या उद्योजकांना वरळी येथील नेहरू सेंटरच्या सभागृहात शरद पवार यांच्या हस्ते ‘मॅक्सेल पुरस्कारा’ने शुक्रवारी गौरविण्यात आले; त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, लार्सन अँड टुब्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाय.एम. देवस्थळी, निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत आणि मॅक्सेल फाउंडेशनचे सर्वेसर्वा नितीन पोदार उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, मी गेल्या 48 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात वावरतो आहे. या काळात राज्याच्या विधिमंडळाचे राजकारण पाहिले आहे. विरोधकांच्या टीका सहन केल्या आहेत. मात्र राजकारण आणि समाजकारणात टीका सहन करावी लागतेच. तशी मी सहन केली. उदाहरणच द्यायचे झाले तर एकेकाळी राज्याला विजेची खूप गरज होती तेव्हा मी विदेशी गुंतवणुकीच्या दाभोळ प्रकल्पासाठी प्रयत्न केले. मात्र विरोधकांनी टीका केली आणि तो प्रकल्प बंद पडला. परंतु पुन्हा चार वर्षानी तो सुरू झाला. शिवाय लवासाबाबतही तेच झाले. लवासावरही खूप टीका झाली. मात्र आजघडीला लवासाला कित्येक हजारो कुटुंबे भेटी देत आहेत. परंतु एका अर्थाने विचार करता नव्या उपक्रमांना टीका सहन करावी लागतेच. मात्र आता अशा नव्या उपक्रमांना, नव्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणो गरजेचे आहे. म्हणून महाराष्ट्राने आता नकारात्मकपणा सोडत सकारात्मक झाले पाहिजे. शिवाय संशोधन क्षेत्रत उल्लेखनीय कामगिरी करत नव्या पिढीला वाचनाची गोडी लावली पाहिजे. 
डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, आयआयटी मुंबईमध्ये आता कुठे दुसरा रिसर्च पार्क उभा राहतो आहे. चीनमध्ये आजघडीला असे तीनशे रिसर्च पार्क आहेत. म्हणजे आपण कुठे आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. विकासासाठी संशोधन करणा:या संस्थांना एकत्र आणण्याची गरज आहे. त्यांचे जाळे उभे केले पाहिजे. त्यांना बळ देण्याची गरज आहे. असे केले तरच ग्लोबल महाराष्ट्राचे स्वप्न साक्षात उतरेल. (प्रतिनिधी)
 
कुमार केतकर म्हणाले, आपली क्षेत्रे, आपल्या कक्षा आणि विकासाच्या व्याख्या आता बदलल्या आहेत. आपण आता हे समजावून घेण्याची गरज आहे. आजवर सजर्नशील प्रयत्नांना दिशा मिळाली नाही. 
परंतु आता ती देण्याची गरज आहे. महाराष्ट्राची ओळख आता जोपासण्याची आणि जपण्याची गरज आहे. शिवाय विकास म्हणजे नुसता जीडीपी नाही हेदेखील आपण ध्यानात ठेवले पाहिजे.
दरम्यान, शरद पवार यांच्या हस्ते अमेरिकेतील प्रख्यात भारतीय उद्योजक अशोक जोशी यांना या वेळी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
शिवाय परशुराम जाधव, सीमा वैद्य-मोदी, संजय गायकवाड, निर्मला कांदळगावकर, प्रदीप लोखंडे, रवी पंडित आणि किशोर पाटील यांना मॅक्सेल पुरस्काराने गौरविण्यात आले.