शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बँकेला साडेचारशे कोटींचा नफा

By admin | Updated: August 24, 2014 01:11 IST

गेल्या पाच वर्षात शेती कर्जपुरवठय़ाबरोबर व्यावसायिक धोरण स्वीकारल्याने बॅँकेला तब्बल 452 कोटी निव्वळ नफा झाला

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : परिणय फुके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी नागपूर : राज्यातील महावितरणचे वीजदर गेल्या चार- पाच वर्षात सातत्याने वाढत आहेत़ आॅगस्ट २००९ पासून फेब्रुवारी २-१४ पर्यंतच्या ५५ महिन्यात १३ वेळा वीजदर वाढ लादण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व २ कोटी १५ लाख वीजग्राहकांचे दर सरासरीने दुप्पट वा अधिक झाले आहेत. किमान २४०० कोटी रुपयांहून अधिक दरवाढ लागू करण्यात आलेली आहे. या दरवाढीवर नियंत्रण ठेवून सर्वसामान्य वीज ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी नगरसेवक डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.नगरसेवक फुके यांच्या नेतृत्त्वात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांना संबंधित मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, अतिरीक्त वीज आकार संपल्यानंतर आजही राज्यातील औद्योगिक वीजदर शेजारील तसेच देषातील सर्व राज्यांच्या तुलनेत सव्वापट वा अधिक आहेत. यंत्रमागाचे वीजदर केवळ गुजरात वगळता देशात सर्वाधिक आहेत़ शेतीच्या वीजदराचे बाबतीत महाराष्ट्र सर्वाधिक दर असणाऱ्या पहील्या पाच राज्यांमध्ये आहे़ राज्याचा सर्वागीण विकास, राज्याचा महसूल, राज्यातील रोजगार निर्मिती या सर्व दृष्टीने विचार करता उद्योग, शेती व यंत्रमाग या तिन्ही घटाकंचे वीजदर शेजारील व देशातील अन्य राज्यांच्या तुलनेने समपातळीवर व स्पर्धात्मक पातळीवर असणे अत्यंत आवश्यक आहे़ अन्यथा याचे कायमस्वरूपी घातक परिणाम राज्याच्या विकासावर होऊ शकतात. २०१२-१३ मध्ये मध्ये औद्योगिक वीजवापर कमी झाल्याचे महावितरणनेच जाहीर केले आहे़ उद्योग बाहेर जाऊ लागले आहेत़ शेतकरी व यंत्रमागधारकांमध्ये प्रचंड मोठया प्रमाणात आर्थिक कोंडी व असंतोष निर्माण झालेला आहे़ राज्यातील सरकार, वीज आयोग व शासनाच्या मालकीच्या कंपन्या या वीज कायद्याचे उद्दिष्ट व त्यामधील तरतुदी याआधारे प्रामाणिकपणे काम केले, तसेच अकार्यक्षमता, गळती व भ्रष्टाचार या विरोधात कठोरपणे पावले उचलली तर महाराष्ट्रातील वीजवर कोणत्याही अनदानाशिवाय इतर राज्यांच्या तुलनेत स्पर्धात्मक व समपातळीवर येतील़ असे झाले तरच ते राज्य सरकार, वीजग्राहक व कंपन्या या सर्वांच्या हिताचे व विकासाचे ठरेल़ अन्यथा सबसिडी बंद झाल्यांनतरचे प्रश्न सर्वच घटकांसाठी आणखी भयावह होतील़ या सर्व बाबींची गांभीर्याने नोंद घेऊन राज्य सरकार, आयोग व शासकीय कंपन्या या तिन्ही घटकांनी कायद्यानुसार, राज्याच्या विकासाच्या व हिताच्या दृष्टीने कठोर निर्णय घ्यावेत व पारदर्षक कारभार करावा़ पर्यायाने ग्राहकांच्या व राज्याच्या हिताचे सरंक्षण करावे, अशी मागणीही फुके यांनी केली आहे. (प्रतिनिधी)