शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कॉलरऐवजी पाण्यावर बोलावे

By admin | Updated: January 15, 2017 03:12 IST

‘कुणी कॉलर वर करतंय, कुणी विजार वर करतंय,’ या विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वक्त्यव्याची राज्यभरात खमंग चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कॉलरवर

सातारा : ‘कुणी कॉलर वर करतंय, कुणी विजार वर करतंय,’ या विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वक्त्यव्याची राज्यभरात खमंग चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कॉलरवर बोलण्याऐवजी रामराजेंनी पाणीप्रश्नावर बोलावे, असा टोला भाजपाचे माण-खटावचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी लगावला आहे.राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात रामराजेंनी केलेले वक्तव लक्षवेधी ठरले. नक्कल करीत केलेल्या या सूचक वक्तव्याने अचूक लक्ष्यभेद केल्याने, पवारांसह व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थितांना हसता-हसता पुरेवाट झाली. हा रामबाण ज्यांना वर्मी लागला, त्यांनी सध्या चुप्पी साधणेच पसंद केले आहे, परंतु शनिवारी डॉ. येळगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन रामराजेंवर निशाणा साधला. खासदार उदयनराजेंचे भाजपमध्ये स्वागत करू, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कालच (शुक्रवारी) सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर येळगावकरांच्या या बोलण्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जिल्ह्यातील आमदारांच्या निष्क्रियतेबाबत त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. जिल्ह्यातील नेतेमंडळी जलसंपदा खात्याचे मंत्री होते. मात्र, जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडविण्याची सुबुद्धी त्यांना झाली नाही. जिल्ह्यातल्या धरणांचे पाणी जिल्ह्यातील सिंचनासाठी वापरायचे, असा ठराव जिल्हा परिषदेने मागे केला होता. तो ठराव नेतेमंडळींनी हाणून पाडला. सांगलीतील विविध पक्षांचे नेते पाणीप्रश्नावर एकत्र येतात, तर ते साताऱ्यात का होत नाही? जिल्ह्याचे पाणी जिल्ह्यातच ठेवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे, आम्ही सत्तेत असलो, तरी घाबरणार नाही, असेही येळगावकरांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) अभ्यास काय चुलीत घालायचाय?सातारा जिल्ह्यात धरणे असताना या धरणातील पाण्याचा लाभ जिल्हावासीयांना मिळत नाही. सांगली, सोलापूर या शेजारील जिल्ह्याचे खमके नेते आपल्या जिल्ह्यात पाणी पळवून हा हक्क हिरावून घेत आहेत. रामराजे नाईक-निंबाळकर यांचा पाणीप्रश्नावर मोठा अभ्यास आहे, असे म्हटले जाते. त्यांचा हा अभ्यास काय चुलीत घालायचाय? रामराजेंनी कुणाच्या कॉलरवर बोलण्यापेक्षा पाणीप्रश्नावर बोलावे,’ अशा शब्दात येळगावकर बरसले.