शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

समाजाने गौरवशाली इतिहास जपावा!

By admin | Updated: December 28, 2014 01:23 IST

जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. उलट इतिहासजमा होतो़ म्हणून समाजाने आपला गौरवशाली इतिहास जपला पाहिजे,

लातूर (स्वातंत्र्यसैनिक स्व. जगन्नाथराव कडतणे नगरी) : जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. उलट इतिहासजमा होतो़ म्हणून समाजाने आपला गौरवशाली इतिहास जपला पाहिजे, असे प्रतिपादन शरदचंद्र गांधी यांनी केले. महाराष्ट्र जैन इतिहास परिषद आणि सकल जैन समाज आयोजित दहाव्या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात शनिवारी ते बोलत होते. मंचावर संमेलनाध्यक्ष सुजाता शास्त्री, स्वागताध्यक्ष सुनील कोचेटा, मावळत्या संमेलनाध्यक्षा कविता तातेड, नलिनी जोशी, परिषदेचे अध्यक्ष गजकुमार शहा, ललित शहा, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण शहा, कार्याध्यक्ष डॉ. पी.पी. शहा, श्रेणिक अन्नदाते, सचिव डॉ. महावीर उदगीरकर, सुरेश जैन, संजय चोरडिया, शिवाजी क्षीरसागर आदींची उपस्थिती होती. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेनशनाचे दीपप्रज्ज्वलन करून उद्घाटन झाले. पू. कनकमर मुनी यांनी औसा येथे निवासाला असताना लिहिलेल्या प्रसिद्ध ‘करकंडचरियू’ या ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शरदचंद्र गांधी म्हणाले, जैन समाज हा दाता समाज आहे. आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास अभ्यासला पाहिजे. भारतातील जैन समाजाचे स्थान हे एकूण लोकसंख्येच्या एक टक्केही नाही. परंतु जैनांनी समाजाला खूप दिले. पारशी समाजानंतर समाजाची सर्वाधिक काळजी जैन समाजाने वाहिली आहे. जैन समाजाने आता शाळा, रुग्णालयांच्या उभारणीकडे जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचा पू. विद्यानंद महाराजांचा संदेश अंमलात आणायची गरज असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्र जैन इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य गजकुमार शहा म्हणाले, जैन समाजाने व्यवहाराचा हिशोब व्यवस्थित लिहिला पण, समाजाचा इतिहास लिहिला नाही. याचे उत्तम उदाहरण शिकागोची धर्मपरिषद आहे. या परिषदेचे नाव जरी काढले तरी स्वामी विवेकानंद डोळ्यांसमोर येतात. परंतु याच परिषदेत बॅरिस्टर गांधी हे जैन धर्माचे साधक गेले होते. त्यांनी आपले ३० मिनिटांचे भाषण दिले. त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन अनेकांनी जैन धर्माचा अभ्यास केला हे माहीतच नाही. रोज म्हटल्या जाणाऱ्या णमोकार मंत्रांचे लेखक कोण हे अनेकांना माहीत नाही. त्यामुळे आपल्याच इतिहासाची नव्याने उजळणी करावी लागेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. संमेलनाध्यक्षांचे पॉवर पॉइंटद्वारे भाषण अधिवेशनाच्या अध्यक्षा सुजाता शास्त्री यांनी हिंदीतून भाषण केले. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जैन शिलालेखांचा पट मांडला. अशा अधिवेशन वा परिषदेत संमेलनाध्यक्षांचे मनोगत पॉवर पॉइंट प्रेझेंटशनद्वारे व्यक्त करून त्यांनी तंत्रज्ञानाचा नवा संदेश दिलाच, शिवाय देशभरातील जैन शिलालेखांचे जैन आणि मानवी प्रगतीला कसे पोषक आहे हे सांगून जैन शिलालेख हे समृद्ध जैन इतिहासाचे चिरंतन प्रतीक असल्याचे सांगितले.