शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटींसाठी स्थानिक नेतृत्व स्मार्ट हवे

By admin | Updated: June 7, 2015 01:44 IST

स्मार्ट सिटींसारख्या योजना यशस्वी करण्यासाठी स्थानिक नेतृत्वही स्मार्ट हवे, असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी केले.

मुंबई : स्मार्ट सिटींसारख्या योजना यशस्वी करण्यासाठी स्थानिक नेतृत्वही स्मार्ट हवे, असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी केले. विज्ञान भारती आयोजित ‘स्मार्ट सिटी - डिलिव्हरी आॅफ सिव्हिक सर्व्हिसेस’ या दोन दिवसीय परिसंवादाचे उद्घाटन करताना ते वेलिंगकर इन्स्टिट्यूट येथे बोलत होते.ते म्हणाले की, स्मार्ट सिटीसारख्या योजना राबविताना लोकांची मानसिकता आधी बदलली पाहिजे, असे सांगत त्यांनी या योजना लोकसहभागाशिवाय यशस्वी होणार नाहीत याची जाणीव दिली. सर्व काही सरकार करेल, असा विचार करण्याची सामान्य माणसाला सवय लागली आहे, ती बदलावी लागेल, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. स्थानिक व्यवस्थापन सुधारण्यावर भर दिला पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.पाण्याचा पुनर्वापर, एलईडी दिव्यांसारख्या माध्यमातून ऊर्जेचा स्मार्ट वापर हे कळीचे मुद्दे असतील, पाण्याची उपलब्धता व स्वच्छ पाणी हे यापुढील देशासमोरचे आव्हान असेल, याची जाणीव नायडू यांनी करून दिली. या परिसंवादाचे बीजभाषण करताना डॉ. माधवराव चितळे यांनी भारताच्या इतिहासातून नागरी नियोजनासंदर्भात व सामाजिक जीवनासंदर्भात शिकण्याची गरज प्रतिपादित केली. ते पुढे म्हणाले की, सामाजिक अस्मिता हा स्मार्ट सिटीचा पाया असेल, भारत प्राचीन काळाप्रमाणे पुन्हा एकदा जागतिक नागरी जीवनाच्या केंद्रस्थानी येईल, असे डॉ. चितळे म्हणाले. स्मार्ट सिटी नियोजनात जनसहभाग वाढविण्यास नागरी मंच स्थापन करण्याचे आवाहन डॉ. चितळे यांनी केले. उद्घाटन सत्रात प्रा.सुहास पेडणेकर, उद्योजक व या परिसंवादाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष अरुण नंदा, डॉ.एस. रामदुराई, प्रा. उदय साळुंके आणि विज्ञान भारतीचे राष्ट्रीय सचिव डॉ.विवेकानंद पै उपस्थित होते.स्मार्ट सिटीजमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर दिला पाहिजे. आज शहरांमधे रोज कामावर जाताना लांबचा प्रवास करावा लागतो, हे चुकीच्या नियोजनाचे फलित आहे. स्मार्ट सिटींचा विचार करताना निसर्ग संवर्धन, संस्कृती यांचा विचार करून भविष्यकालीन नियोजन केले पाहिजे. - वेंकय्या नायडू