शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

Maharashtra Politics: “अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही; आम्ही ७ लाखांची गर्दी जमवून दाखवली”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 09:34 IST

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Maharashtra Politics: मंत्री, नेते मंडळी आपल्या विधानांमुळे चांगलेच चर्चेत येत असतात. त्यातून मोठा गदारोळही होत असतो. राज्याच्या राजकारण गेल्या काही महिन्यांपासून हाच अनुभव येत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांची भर पडली आहे. एका जाहीर सभेला संबोधित करताना, अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांना जमले नाही. मात्र, आम्ही ७ लाखांची गर्दी जमवून दाखवली, असे विधान तानाजी सावंत यांनी केले आहे. (Tanaji Sawant Controversial Statement)

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एक मोठे विधान केले आहे. ज्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयींना गर्दी जमवता आली नाही, तिथे सावंत बंधूंनी सात लाखांची गर्दी जमवून दाखवली, असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. मोठेपणाच्या ओघात आरोग्यमंत्री बोलून गेले असले तरी त्यांना स्वकीयांच्याच रोषाला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयींपेक्षा आपण मोठे आहोत, हे त्यांनी एका वाक्यात सुचवण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 

सोलापूरचे पालकमंत्री केले तर किती अनुदान मिळते, हे दाखवून दिले असते

वडार समाज मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आले होते. ठरलेल्या वेळेपेक्षा चार तास उशिरा कार्यक्रम सुरु झाला. मात्र आरोग्यमंत्र्यांनी भाषणबाजीत सर्वांत आधी देशाच्या आदरणीय नेत्यांसोबतच आपली तुलना केल्याने उपस्थितीतांमध्ये अस्वस्थता सुरु झाली, असे सांगितले जात आहे. यानंतर आपल्याला सोलापूरचे पालकमंत्रीपद मागत होतो. मला सोलापूरचे पालकमंत्री केले तर किती अनुदान मिळते, हे दाखवून दिले असते, असे सांगत तानाजी सावंतांनी भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावला. तानाजी सावंत यांच्या विधानाचे मोठे पडसाद उमटू शकतात, अशीही चर्चा सुरू झाली असल्याचे सांगितले जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा